पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या समृद्ध घरांतील बहुतांश सदस्य सवयींनी गरीब झालेत

भारतातील श्रीमंत कुटुंबांत कोणत्या गोष्टीची गरिबी आहे? सखोल विचार करता आपल्या समृद्ध घरांतील बहुतांश सदस्य सवयींनी गरीब झाले आहेत. हा एक भीतिदायक आकडा आहे की, 60% तरुण दिवसातून सुमारे तीन तास ऑनलाइन गेमिंगमध्ये आहेत आणि हा आकडा जगात सर्वाधिक आहे. डिजिटल मीडियाने तरुणांना, महिलांना आपल्या विळख्यात घेतले आहे. चरबी वाढत आहे, लठ्ठपणा पसरला आहे. खाणे आणि पचवणे यातील अंतर संपले आहे. जुगार तर कोणत्याही परिस्थितीत वाईटच आहे. जुगार खेळण्याच्या सवयीबद्दल एक धडा घ्या की, युधिष्ठिरासारखा धर्मराजही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नव्हता. पंधराव्या डावावर त्याने द्रौपदीला पणाला लावले. ते सर्वकाही हरले, कारण जुगार खेळणाऱ्याला अपराध बोध तर होतेच, पण हीच गुन्हेगारीची जाणीव पुन्हा त्याची प्रेरणा वाढवून देते. आपल्याला घरांमध्ये मुलांवर हे लक्ष ठेवावे लागेल की, ते कुठे या मायाजालात तर अडकत नाहीत ना? युधिष्ठिर बनून सर्वकाही तर गमावून बसणार नाहीत ना?

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *