भारतीय चित्रपटसृष्टीत सिक्वेल क्वचितच यशस्वी होतात. सहसा प्रेक्षकांनी मूळ चित्रपट पाहिलेला असतो, त्यामुळे त्यातील नावीन्य संपून जाते आणि कथा शिळी वाटू लागते. म्हणूनच ‘इंडिया-2.0’ चे पुन्हा एकत्र येणे हा विश्वास कष्टानेच निर्माण करते की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अनपेक्षित आव्हान देणारी आघाडी तशीच कामगिरी पुन्हा करू शकेल. गेल्या दोन वर्षांत बरेच काही बदलले आहे. काँग्रेसला अनेक मोठ्या राज्यांमध्ये निवडणुकीत धक्के बसले आहेत. आघाडीची ताकद असलेले अनेक प्रादेशिक पक्ष कमकुवत झाले आहेत. बंगालमधील पराभवानंतर टीएमसी विखुरण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात शिवसेना (उबाठा) आणि एनसीपी (शरद पवार गट) देखील फुटले आहेत. दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. अशा स्थितीत ‘इंडिया’ ही सामायिक दृष्टिकोनावर एकत्र आलेल्या शक्तींची एकजूट वाटण्यापेक्षा, 2029 मध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखण्यासाठी जमलेल्या गर्दीसारखी अधिक वाटते. अडचण अशी आहे की, बंद खोलीत आघाड्या तयार केल्या जाऊ शकत असल्या तरी मतदार त्यातील संधीसाधूपणा ओळखतात. दोन महिन्यांपूर्वी राहुल गांधी टीएमसीवर भ्रष्टाचार आणि पडद्याआडून भाजपशी तडजोड केल्याचे आरोप करत होते. आता तेच नेते एका मंचावर येताना मतदार या विरोधाभासांकडे दुर्लक्ष करतील का? असे विरोधाभास सर्वत्र आहेत. तामिळनाडूतील पराभवानंतर आपल्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे डीएमके काँग्रेसवर नाराज आहे. आम आदमी पक्षदेखील पंजाबममध्ये काँग्रेससोबत मंच सामायिक करण्यासाठी फारसा उत्सुक दिसत नाही. केरळ निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या हल्ल्यांमुळे डावे पक्षही नाराज आहेत. अशा स्थितीत यातून एखाद्या एकजूट राजकीय पर्यायाचे चित्र क्वचितच समोर येते. याच्या उलट, भाजपमध्ये स्पष्टता आहे. मतदारांना माहीत आहे की पक्षाची तत्त्वे काय आहेत आणि अंतिम निर्णयाचा अधिकार कुणाकडे आहे. भाजपचे वर्चस्व या कारणामुळेही प्रस्थापित झाले आहे की, विरोधी पक्ष विखुरलेला, अनिश्चित आणि अंतर्गत संघर्षात गुंतलेला दिसतो. भारतीय राजकारणातील सर्वात मनोरंजक गोष्टींपैकी एक म्हणजे अनेक विद्यमान प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत. टीएमसी, एनसीपी आणि वायएसआर काँग्रेस- या सर्वांची मुळे काँग्रेसमध्येच आहेत. यांचे नेते नेतृत्वाचा वाद, राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा प्रादेशिक गरजांमुळे काँग्रेसपासून वेगळे झाले. परंतु हे पक्ष आजही आपल्या नावात आणि राजकीय ओळखीमध्ये काँग्रेसची छाप बाळगून आहेत. गेल्या चार दशकांत काँग्रेसचे कुटुंब अनेक प्रादेशिक पक्षांत विखुरले गेले. परिणामी, भाजपविरोधी मतांचे विभाजन होत गेले. तर मग, आणखी एक विखुरलेली भाजपविरोधी आघाडी बनवण्याऐवजी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या या शाखांना राजकीयदृष्ट्या पुन्हा संघटित करण्याचे मार्ग का शोधले जाऊ नयेत? विलीनीकरण किंवा किमान परस्पर समन्वयावर आधारित पद्धतशीर एकजूट, निवडणुकीच्या काही महिने आधी घाईघाईत बनवलेल्या कोणत्याही नवीन आघाडीच्या तुलनेत काँग्रेसला अधिक ऊर्जा देऊ शकते. यामुळे विरोधी पक्षांच्या राजकारणात एक मजबूत केंद्रीय धुरा तयार होईल आणि काँग्रेस लहान मित्रपक्षांसमोर कमकुवत स्थितीत नव्हे, तर ताकदीने आपली बाजू मांडू शकेल. आज हा विचार अव्यावहारिक वाटू शकतो. परंतु राजकारणाचा इतिहास अपेक्षेबाहेर वाटणाऱ्या अशा री-युनियनच्या घटनांनी भरलेला आहे. स्वतः भाजप हे व्यापक संघ परिवाराच्या दशके चाललेल्या एकत्रीकरणाचाच परिणाम आहे. मग काँग्रेस कुटुंब कायमचे विखुरलेले का राहावे? तथापि, अशा कोणत्याही यशासाठी काँग्रेसलाही बदलावे लागेल. प्रादेशिक नेत्यांच्या वापसीसाठी हे काँग्रेस नेतृत्वाने सत्ता, अधिकार सामायिक करण्याची मानसिकता दाखवावी. प्रादेशिक नेत्यांनाही वैयक्तिक अहंकार, कौटुंबिक हितसंबंध आणि अल्पकालीन राजकीय गणितांच्या पलीकडे जावे लागेल. एखादा नेता आपली दशकांची जुनी ओळख गमावून दिल्लीचा निव्वळ दरबारी बनून राहील हे शक्य नाही, पण प्रत्येक प्रादेशिक नेत्याने आपला घटता जनाधार असूनही राष्ट्रीय राजकारणात ‘किंगमेकर’ राहण्याची अपेक्षा करणेदेखील अवास्तव ठरेल.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एक विखुरलेली आघाडी बनवण्याऐवजी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शाखांना राजकीयदृष्ट्या पुन्हा संघटित करण्याचे मार्ग का शोधले जाऊ नयेत? विलीनीकरण, समन्वयावर आधारित एकजूट काँग्रेसला नवी ऊर्जा देऊ शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- दिल्ली जंतर-मंतरवरील 'सीजेपी' आंदोलन: आंदोलनादरम्यान कोणतीही अनधिकृत घोषणाबाजी नको; केवळ 'या' चार घोषणा देण्याचे आशुतोष रांका यांचे आवाहन"
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये हादरवणारी घटना! संपत्तीच्या वादातून मित्रानेच केली शिक्षिकेची निर्घृण हत्या; एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले, दोन आरोपी जेरबंद!
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
गुन्हा
- डेहराडूनमधील संतापजनक घटना! नामांकित शाळेच्या प्रिन्सिपालाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत अटक
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
राजकीय
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- बिहार: पाटण्यात विद्यार्थ्यांवर खाकीचा उर्मटपणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून-पळवून मारले, फरफटत नेले!
- "जंतर-मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'! नीट आंदोलनासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही येत आहेत पिझ्झा, बर्गरच्या ऑनलाइन ऑर्डर"
- उत्तर प्रदेश: सकाळी लेकाच्या दीर्घायुष्यासाठी कीर्तन, वाढदिवस; रात्री संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलांनीच घेतला जन्मदात्या आई-वडिलांचा जीव
- जम्मू-कश्मीरमध्ये थरारक दहशतवादी हल्ला! अनंतनागच्या लाल चौक भागात पोलिसावर ताशेरेबाज गोळीबार, आयआरपीएफचा जवान शहीद; टीआरएफने स्वीकारली जबाबदारी"


























Subscribe to my channel


