भारतीय चित्रपटसृष्टीत सिक्वेल क्वचितच यशस्वी होतात. सहसा प्रेक्षकांनी मूळ चित्रपट पाहिलेला असतो, त्यामुळे त्यातील नावीन्य संपून जाते आणि कथा शिळी वाटू लागते. म्हणूनच ‘इंडिया-2.0’ चे पुन्हा एकत्र येणे हा विश्वास कष्टानेच निर्माण करते की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अनपेक्षित आव्हान देणारी आघाडी तशीच कामगिरी पुन्हा करू शकेल. गेल्या दोन वर्षांत बरेच काही बदलले आहे. काँग्रेसला अनेक मोठ्या राज्यांमध्ये निवडणुकीत धक्के बसले आहेत. आघाडीची ताकद असलेले अनेक प्रादेशिक पक्ष कमकुवत झाले आहेत. बंगालमधील पराभवानंतर टीएमसी विखुरण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात शिवसेना (उबाठा) आणि एनसीपी (शरद पवार गट) देखील फुटले आहेत. दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. अशा स्थितीत ‘इंडिया’ ही सामायिक दृष्टिकोनावर एकत्र आलेल्या शक्तींची एकजूट वाटण्यापेक्षा, 2029 मध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखण्यासाठी जमलेल्या गर्दीसारखी अधिक वाटते. अडचण अशी आहे की, बंद खोलीत आघाड्या तयार केल्या जाऊ शकत असल्या तरी मतदार त्यातील संधीसाधूपणा ओळखतात. दोन महिन्यांपूर्वी राहुल गांधी टीएमसीवर भ्रष्टाचार आणि पडद्याआडून भाजपशी तडजोड केल्याचे आरोप करत होते. आता तेच नेते एका मंचावर येताना मतदार या विरोधाभासांकडे दुर्लक्ष करतील का? असे विरोधाभास सर्वत्र आहेत. तामिळनाडूतील पराभवानंतर आपल्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे डीएमके काँग्रेसवर नाराज आहे. आम आदमी पक्षदेखील पंजाबममध्ये काँग्रेससोबत मंच सामायिक करण्यासाठी फारसा उत्सुक दिसत नाही. केरळ निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या हल्ल्यांमुळे डावे पक्षही नाराज आहेत. अशा स्थितीत यातून एखाद्या एकजूट राजकीय पर्यायाचे चित्र क्वचितच समोर येते. याच्या उलट, भाजपमध्ये स्पष्टता आहे. मतदारांना माहीत आहे की पक्षाची तत्त्वे काय आहेत आणि अंतिम निर्णयाचा अधिकार कुणाकडे आहे. भाजपचे वर्चस्व या कारणामुळेही प्रस्थापित झाले आहे की, विरोधी पक्ष विखुरलेला, अनिश्चित आणि अंतर्गत संघर्षात गुंतलेला दिसतो. भारतीय राजकारणातील सर्वात मनोरंजक गोष्टींपैकी एक म्हणजे अनेक विद्यमान प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत. टीएमसी, एनसीपी आणि वायएसआर काँग्रेस- या सर्वांची मुळे काँग्रेसमध्येच आहेत. यांचे नेते नेतृत्वाचा वाद, राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा प्रादेशिक गरजांमुळे काँग्रेसपासून वेगळे झाले. परंतु हे पक्ष आजही आपल्या नावात आणि राजकीय ओळखीमध्ये काँग्रेसची छाप बाळगून आहेत. गेल्या चार दशकांत काँग्रेसचे कुटुंब अनेक प्रादेशिक पक्षांत विखुरले गेले. परिणामी, भाजपविरोधी मतांचे विभाजन होत गेले. तर मग, आणखी एक विखुरलेली भाजपविरोधी आघाडी बनवण्याऐवजी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या या शाखांना राजकीयदृष्ट्या पुन्हा संघटित करण्याचे मार्ग का शोधले जाऊ नयेत? विलीनीकरण किंवा किमान परस्पर समन्वयावर आधारित पद्धतशीर एकजूट, निवडणुकीच्या काही महिने आधी घाईघाईत बनवलेल्या कोणत्याही नवीन आघाडीच्या तुलनेत काँग्रेसला अधिक ऊर्जा देऊ शकते. यामुळे विरोधी पक्षांच्या राजकारणात एक मजबूत केंद्रीय धुरा तयार होईल आणि काँग्रेस लहान मित्रपक्षांसमोर कमकुवत स्थितीत नव्हे, तर ताकदीने आपली बाजू मांडू शकेल. आज हा विचार अव्यावहारिक वाटू शकतो. परंतु राजकारणाचा इतिहास अपेक्षेबाहेर वाटणाऱ्या अशा री-युनियनच्या घटनांनी भरलेला आहे. स्वतः भाजप हे व्यापक संघ परिवाराच्या दशके चाललेल्या एकत्रीकरणाचाच परिणाम आहे. मग काँग्रेस कुटुंब कायमचे विखुरलेले का राहावे? तथापि, अशा कोणत्याही यशासाठी काँग्रेसलाही बदलावे लागेल. प्रादेशिक नेत्यांच्या वापसीसाठी हे काँग्रेस नेतृत्वाने सत्ता, अधिकार सामायिक करण्याची मानसिकता दाखवावी. प्रादेशिक नेत्यांनाही वैयक्तिक अहंकार, कौटुंबिक हितसंबंध आणि अल्पकालीन राजकीय गणितांच्या पलीकडे जावे लागेल. एखादा नेता आपली दशकांची जुनी ओळख गमावून दिल्लीचा निव्वळ दरबारी बनून राहील हे शक्य नाही, पण प्रत्येक प्रादेशिक नेत्याने आपला घटता जनाधार असूनही राष्ट्रीय राजकारणात ‘किंगमेकर’ राहण्याची अपेक्षा करणेदेखील अवास्तव ठरेल.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एक विखुरलेली आघाडी बनवण्याऐवजी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शाखांना राजकीयदृष्ट्या पुन्हा संघटित करण्याचे मार्ग का शोधले जाऊ नयेत? विलीनीकरण, समन्वयावर आधारित एकजूट काँग्रेसला नवी ऊर्जा देऊ शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- पुणे: हट्टीपणा जीवावर बेतला! मित्र अन् पालकांचे कोणाचेही ऐकले नाही, भयंकर अपघातात चौघांनी गमावला जीव
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
- मुंबई: घाटकोपरमध्ये दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- पुणे: हट्टीपणा जीवावर बेतला! मित्र अन् पालकांचे कोणाचेही ऐकले नाही, भयंकर अपघातात चौघांनी गमावला जीव
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
- सोलापूर: अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळल्याने १३ विद्यार्थी आणि २ शिक्षक जखमी
गुन्हा
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
























Subscribe to my channel



