पुणे: हायवेवरील एका ठिकाणी नाश्तानंतर एका मित्राने स्टेअरिंग घेतले, त्यामुळे इतरांनी "तू रात्री कार चालवू नकोस" असे बजावले. मात्र, त्याने ऐकले नसल्याने पुढे भयावह दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चारही मित्रांना जीव गमवावा लागला. जणूकाही मृत्यूची चाहूल त्यांना लागली होती.
नेहमीप्रमाणे माथेरानची पावले ओळखणारे हे तरुण या वेळी महाबळेश्वरकडे मोर्चा वळवत होते. पुणे जिल्ह्यातील मावळ व कामशेत येथील १३ मित्रांनी महाबळेश्वरची वारी आखली होती. एका मुलाच्या पालकांनी इतक्या लांब जाऊ नका, असे सांगून गाडी नाकारली होती. मात्र, त्या मुलाने ऐकले नाही आणि दोन्ही कारमधून १३ जण महाबळेश्वरकडे निघाले. गाडीत आनंदाच्या लहरी झुलत असताना कापूरव्होळला त्यांनी रात्री नाश्ता केला. नाश्त्यानंतर मयूर शिंदेने स्टेअरिंग हाती घेतले. मित्रांनी त्याच्या रात्री गाडी चालवण्यास नकार दिला होता, पण तो ऐकलाच नाही. भरधाव वेगात कार शिरवळ इथे दुर्घटनेला सामोरे जाऊन चारी मित्रांनी प्राण गमावले. "मित्रांचे ऐकले असते, तर सगळे मित्र आज हसतखेळत असते" असे बघणाऱ्यांच्या ओठांवर आहे.
महाबळेश्वर येथे मित्राचा वाढदिवस व पर्यटनासाठी निघालेल्या मित्रांच्या भरधाव कारवरील नियंत्रण सुटून कार रस्ता दुभाजकाला धडकत तीन ते चार वेळा पलटी होऊन विरुद्ध दिशेला येऊन मालट्रकला धडकली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शिरवळ हद्दीत सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडला.
वेदांत अर्जुन वारिंगे (वय १९, मूळ रा. वारंगवाडी, तळेगाव दाभाडे), निखिल बाळू राऊत (२०, रा. करंज, कामशेत), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९, सध्या रा. कामशेत, ता. मावळ, मूळ रा. कानपूर), आदित्य बाळासाहेब गरुड (१९, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ) अशी मृतांची नावे आहेत. दीक्षित दयानंद पुजारी (२०, रा. कामशेत), कारचालक मयूर हनुमंत शिंदे (२०, रा. बऊर, कामशेत), मालट्रक चालक शिवकुमार देवांगत (३६, रा. कुप्पेलुर, जि. हावेरी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. कारचालक मयूर शिंदे व दीक्षित पुजारी यांना तळेगाव दाभाडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
मावळ तालुक्यातील कामशेत, बऊर, टाकवे, वारंगवाडी येथील १३ युवक दोन कारमधून मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरिता महाबळेश्वरला येत होते. मध्यरात्री कापूरव्होळ येथे नाश्ता करून दोन्ही कार महाबळेश्वरच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी कार (एमएच १४ एलजे ३०३३) मयूर शिंदे चालवीत होता. ते शिरवळ हद्दीत आले असता मयूरचे कारवरील नियंत्रण सुटले. कार रस्ता दुभाजकाला धडकत विरुद्ध पुणे रस्त्याच्या बाजूला येत तीन ते चार पलटी मारून बेडगी येथून सुरतला निघालेल्या मालट्रकला (केए २७ सी ५८७८) धडकली. धडक एवढी जोरदार होती की कारमधील वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड, निखिल राऊत हे जागीच ठार झाले तर तीनजण गंभीर जखमी झाले. कारचा चक्काचूर झाल्याने अडकलेले मृतदेह बाहेर काढताना तीन तासांहून जास्त वेळ लागला. गंभीर जखमींवर शिरवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालकांनी कारची चावी काढली, यांनी दुसरी कार केली
मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरिता लहानपणापासूनचे जिवलग मित्र असलेल्या १३ मित्रांनी एकत्रित येत माथेरानला जाण्याचे नियोजन केले होते. ऐनवेळी एकाच्या पालकांनी कारची चावी काढून घेतल्याने संबंधितांचा हिरमोड झाला होता. मात्र मित्रांच्या आनंदावर विरजण पडू नये याकरिता तत्काळ मित्रांनी कारची व्यवस्था करीत माथेरानऐवजी महाबळेश्वरकडे जाण्याचे नियोजन केले. शिरवळ येथे काळाने घाला घातल्याने जीव गमवावा लागला.
शहर
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा


























Subscribe to my channel



