
Pune : राज्यात शनिवार, रविवारी ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. २४ तासांत तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. पुण्यामध्येही रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहराभोवती पुन्हा जलवेढा पडला. गावांतील अंतर्गत रस्ते, पुलांवर पाणी साचले. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा दिला. दुसरीकडे नाशिकमध्ये दोन दिवस पावसाची कृपावृष्टी झाल्याने पाणीचिंतेने ग्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या मोसमात गोदावरी नदी प्रथमच खळाळून वाहिली.
पुण्यातील धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात उल्लेखनीय वाढ झाली आहे. बहुतांश धरणे भरल्याने सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्गही करण्यात आला. खडकवासला धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे २५ जुलै रोजी पुण्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका, जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे रविवारी पुणेकरांना दिलासा मिळाला. ‘खडकवासल्या’तून ३५ हजार ‘क्युसेक’ने पाणी सोडल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याच्या भीतीने लष्करासह राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके (एनडीआरएफ) तैनात करण्यात आली होती.
|
Karjat : भीमा नदीला पूर आल्यामुळे कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका |
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार घाटमाथ्यावरील पाऊस पाहता प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेच्या सूचना दिल्या होत्या. नदीकाठच्या रहिवाशांना शनिवारी रात्रीपासूनच अलार्म वाजवून काळजी घेण्यास सांगितले जात होते. नदीपात्रात रात्री २९ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. पाऊस वाढल्यानंतर सकाळी ११ वाजता ३५ हजार क्युसेक्सने पाणीपुरवठा करण्याची सूचना देण्यात आली. एकतानगरमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या पायदळातील जवान, बॉम्बे इंजिनीअर्स ग्रुपचे अभियंता कार्य दल आणि खडकीच्या लष्करी रुग्णालयातील वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यास सांगण्यात आले.
या तुकडीतील १०० जवान, बचाव नौका, मानवरहीत स्वयंचलित हेलिकॉप्टर (क्वाडकॉप्टर) आणि इतर आवश्यक साधनांसह हजर होते. त्यांनी पूरग्रस्त परिसरातील नागरिकांना घरे रिकामी करण्यास सांगितले. दुसरीकडे नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांवर गेला. गोदावरीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये पुरामुळे दोन जण वाहून गेले, तर जळगाव जिल्ह्यातही तीन जणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. मालेगाव येथे गिरणा पात्रात मच्छिमार अडकले असून, त्यांच्या सुटकेसाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही






























Subscribe to my channel




