
Pune : राज्यात शनिवार, रविवारी ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. २४ तासांत तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. पुण्यामध्येही रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहराभोवती पुन्हा जलवेढा पडला. गावांतील अंतर्गत रस्ते, पुलांवर पाणी साचले. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा दिला. दुसरीकडे नाशिकमध्ये दोन दिवस पावसाची कृपावृष्टी झाल्याने पाणीचिंतेने ग्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या मोसमात गोदावरी नदी प्रथमच खळाळून वाहिली.
पुण्यातील धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात उल्लेखनीय वाढ झाली आहे. बहुतांश धरणे भरल्याने सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्गही करण्यात आला. खडकवासला धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे २५ जुलै रोजी पुण्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका, जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे रविवारी पुणेकरांना दिलासा मिळाला. ‘खडकवासल्या’तून ३५ हजार ‘क्युसेक’ने पाणी सोडल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याच्या भीतीने लष्करासह राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके (एनडीआरएफ) तैनात करण्यात आली होती.
|
Karjat : भीमा नदीला पूर आल्यामुळे कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका |
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार घाटमाथ्यावरील पाऊस पाहता प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेच्या सूचना दिल्या होत्या. नदीकाठच्या रहिवाशांना शनिवारी रात्रीपासूनच अलार्म वाजवून काळजी घेण्यास सांगितले जात होते. नदीपात्रात रात्री २९ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. पाऊस वाढल्यानंतर सकाळी ११ वाजता ३५ हजार क्युसेक्सने पाणीपुरवठा करण्याची सूचना देण्यात आली. एकतानगरमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या पायदळातील जवान, बॉम्बे इंजिनीअर्स ग्रुपचे अभियंता कार्य दल आणि खडकीच्या लष्करी रुग्णालयातील वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यास सांगण्यात आले.
या तुकडीतील १०० जवान, बचाव नौका, मानवरहीत स्वयंचलित हेलिकॉप्टर (क्वाडकॉप्टर) आणि इतर आवश्यक साधनांसह हजर होते. त्यांनी पूरग्रस्त परिसरातील नागरिकांना घरे रिकामी करण्यास सांगितले. दुसरीकडे नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांवर गेला. गोदावरीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये पुरामुळे दोन जण वाहून गेले, तर जळगाव जिल्ह्यातही तीन जणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. मालेगाव येथे गिरणा पात्रात मच्छिमार अडकले असून, त्यांच्या सुटकेसाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



