
India Heat Wave Update : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा वाढत चालाला आहे. कडाक्याचे ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली असून ती कायम राहण्याची शक्यता आहे. अशातच भारतातील हवामान खात्याने (IMD) देशभरातील वाढत्या तापमानामुळे अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. भारतातील विविध भागात तीव्र उष्णता राहिल आणि तापमान साधारणत: 44 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हवामान खात्याने वर्तवली आहे. उष्णतेची लाट लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
हवामान खात्याने (Weather Department) पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि पूर्व झारखंडमध्ये कमाल तापमानाचा परिणाम होण्याचा इशारा दिला आहे. हवामा खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या भागांमध्ये 3 मे पर्यंत तीव्र उष्णता जाणवेल. ज्याची तीव्रता पुढील तीन ते चार दिवसांत कमी होईल. दक्षिण आंध्र प्रदेशात वेगवेगळ्या भागांमध्ये पुढील दोन दिवस तीव्र उष्णता राहिल. त्यानंतर या ठिकाणी आणखी दोन ते तीन दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती राहिल.
तेलंगणा, कर्नाटक आणि किनारी आंध्र प्रदेशला पुढील चार ते पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये 3 मे रोजी उष्णतेच्या लाटेची परिस्थिती जाणवण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांवर 3 ते 6 मे आणि मराठवाड्यात 3 ते 5 मे या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र यासारख्या किनारपट्टी भागातील नागरिकांना पुढील पाच दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याशिवाय छत्तीसगडमध्ये 3 मे रोजी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 3 ते 6 मे या कालावधीत रात्री गरम वातावरण राहिल.
एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे हवानाम खात्याने अनेक राज्यांमध्ये पावसाचा देखील इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासह ईशान्येकडील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय सिक्कीम, ओडिशा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालच्या विविध भागांमध्येही हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शहर
- मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर!
- पुणे: बारामतीच्या प्रकाशवैभवाचा जगभर डंका! काशीविश्वेश्वर पुलाच्या 'कॅनोपी ऑफ लाइट्स' प्रकल्पाला मानाचा आंतरराष्ट्रीय 'लाईट जस्टिस अवॉर्ड २०२६' जाहीर!
- पुणे: दहीहंडी वाहतूक अलर्ट; शहरात मोठे वाहतूक बदल आणि निर्बंध लागू, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा!
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
महाराष्ट्र
- मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर!
- पुणे: बारामतीच्या प्रकाशवैभवाचा जगभर डंका! काशीविश्वेश्वर पुलाच्या 'कॅनोपी ऑफ लाइट्स' प्रकल्पाला मानाचा आंतरराष्ट्रीय 'लाईट जस्टिस अवॉर्ड २०२६' जाहीर!
- सिंधुदुर्ग: दोडामार्गात 'ओंकार' हत्तीचे प्रचंड तांडव! शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण!
- चिपळूण: महसूल विभागात खळबळ! जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी १० हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हा
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला



























Subscribe to my channel




