मुंबई: पश्चिम बंगालमधील निवडणूक निकाल आणि राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उबाठा) गटावर बोचरी टीका केली आहे. "संजय राऊत हे आपल्या सहकाऱ्यांना गिळणाऱ्या काँग्रेस नावाच्या 'अजगर'चे पिल्लू आहेत," असा टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी कोलकातामध्ये जाऊन आंदोलन करावं
ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ उभ्या ठाकलेल्या उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांनी खोचक सल्ला दिला आहे. "उद्धव ठाकरेंना मातोश्रीबाहेर पडावसं वाटत नाही, पण आता त्यांनी थेट कोलकाता गाठावे आणि ममता बॅनर्जी यांच्या घरात बसून वर्षभर आंदोलन करावे. सत्तेसाठी हपापलेल्या संजय राऊतांनी आपल्या पक्षाच्या आमदारांकडे लक्ष देण्याऐवजी दुसऱ्यांच्या राज्यात लुडबुड थांबवावी. एकनाथ शिंदे गेल्यानंतर तुम्हाला जाग येते, यातच सर्व काही समजते," अशी टीका बन यांनी केली.
काँग्रेस म्हणजे सहकाऱ्यांना गिळणारा अजगर
पश्चिम बंगालमध्ये 'इंडिया' आघाडीचे अस्तित्वच नव्हते, असा दावा करत बन म्हणाले की, "ही ध्येयधोरण नसलेली आघाडी आहे. काँग्रेस हा आपल्या सहकाऱ्यांना गिळणारा अजगर आहे. ज्या ज्या पक्षांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्यांचे अस्तित्व संपवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. संजय राऊत केवळ स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेसची सुपारी घेऊन काम करत आहेत."
जरांगेंच्या सल्लागारांनी अर्धवट माहिती देऊ नये
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विधानांवर भाष्य करताना बन म्हणाले की, "जरांगे यांच्या सल्लागारांनी त्यांना चुकीची माहिती देऊ नये. भाजपने यापूर्वीही ममता बॅनर्जींचा पराभव केला आहे. जरांगे पाटलांनी बंगालमध्ये जाऊन बॅनर्जींची दहशत पाहावी, मगच भाष्य करावे. फडणवीस हे कायद्याने चालणारे नेते आहेत. नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फासावर चढवण्याचे काम हे सरकारच करेल, त्यामुळे या संवेदनशील विषयात कोणीही राजकारण करू नये."
उबाठाचा 'दिवा' आता विझणार
संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेताना नवनाथ बन म्हणाले की, "दिवा विझताना मोठा होतो, त्याप्रमाणे राऊत सध्या फडफडत आहेत. उबाठा गटाचा हा शेवटचा दिवा आता कायमचा विझणार आहे, हे जनतेने ओळखले आहे. ममता बॅनर्जींनी गेल्या १५ वर्षांत बंगालमध्ये केवळ दादागिरी आणि गुंडगिरी केली आहे, आता जनतेने त्यांना घरी बसवून त्यांची जागा दाखवून दिली आहे. राऊत जर त्यांचे समर्थन करत असतील, तर त्यांनी प्रत्यक्ष बंगालमध्ये जाऊन आंदोलनात सहभागी व्हावे."
शहर
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीजवळ भरधाव खासगी बसची उभ्या ट्रकला धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
महाराष्ट्र
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

























Subscribe to my channel



