मुंबई: पश्चिम बंगालमधील निवडणूक निकाल आणि राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उबाठा) गटावर बोचरी टीका केली आहे. "संजय राऊत हे आपल्या सहकाऱ्यांना गिळणाऱ्या काँग्रेस नावाच्या 'अजगर'चे पिल्लू आहेत," असा टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी कोलकातामध्ये जाऊन आंदोलन करावं
ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ उभ्या ठाकलेल्या उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांनी खोचक सल्ला दिला आहे. "उद्धव ठाकरेंना मातोश्रीबाहेर पडावसं वाटत नाही, पण आता त्यांनी थेट कोलकाता गाठावे आणि ममता बॅनर्जी यांच्या घरात बसून वर्षभर आंदोलन करावे. सत्तेसाठी हपापलेल्या संजय राऊतांनी आपल्या पक्षाच्या आमदारांकडे लक्ष देण्याऐवजी दुसऱ्यांच्या राज्यात लुडबुड थांबवावी. एकनाथ शिंदे गेल्यानंतर तुम्हाला जाग येते, यातच सर्व काही समजते," अशी टीका बन यांनी केली.
काँग्रेस म्हणजे सहकाऱ्यांना गिळणारा अजगर
पश्चिम बंगालमध्ये 'इंडिया' आघाडीचे अस्तित्वच नव्हते, असा दावा करत बन म्हणाले की, "ही ध्येयधोरण नसलेली आघाडी आहे. काँग्रेस हा आपल्या सहकाऱ्यांना गिळणारा अजगर आहे. ज्या ज्या पक्षांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्यांचे अस्तित्व संपवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. संजय राऊत केवळ स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेसची सुपारी घेऊन काम करत आहेत."
जरांगेंच्या सल्लागारांनी अर्धवट माहिती देऊ नये
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विधानांवर भाष्य करताना बन म्हणाले की, "जरांगे यांच्या सल्लागारांनी त्यांना चुकीची माहिती देऊ नये. भाजपने यापूर्वीही ममता बॅनर्जींचा पराभव केला आहे. जरांगे पाटलांनी बंगालमध्ये जाऊन बॅनर्जींची दहशत पाहावी, मगच भाष्य करावे. फडणवीस हे कायद्याने चालणारे नेते आहेत. नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फासावर चढवण्याचे काम हे सरकारच करेल, त्यामुळे या संवेदनशील विषयात कोणीही राजकारण करू नये."
उबाठाचा 'दिवा' आता विझणार
संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेताना नवनाथ बन म्हणाले की, "दिवा विझताना मोठा होतो, त्याप्रमाणे राऊत सध्या फडफडत आहेत. उबाठा गटाचा हा शेवटचा दिवा आता कायमचा विझणार आहे, हे जनतेने ओळखले आहे. ममता बॅनर्जींनी गेल्या १५ वर्षांत बंगालमध्ये केवळ दादागिरी आणि गुंडगिरी केली आहे, आता जनतेने त्यांना घरी बसवून त्यांची जागा दाखवून दिली आहे. राऊत जर त्यांचे समर्थन करत असतील, तर त्यांनी प्रत्यक्ष बंगालमध्ये जाऊन आंदोलनात सहभागी व्हावे."
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




