
Nashik : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सुमारे 8.7 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात नाशिकमधील गंगापूर धरणातून 0.5 टीएमसी म्हणजेच पाचशे दश लक्ष घन फूट, तर दारणा धरण समूहातून 2 हजार 643 टीएमसी याप्रमाणे प्रमाणे पाणी सोडावे लागणार आहे. एकीकडे नाशिक जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाला असून चिंतानजनक परिस्थिति असताना जायकवाडीत पाणी सोडण्यात येत आहे. या पाणी सोडण्यासाठी नाशिककरांचा विरोध होत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षी राज्यात बहुतांश ठिकाणी अपुरा पाऊस झाला असून नाशिक जिल्ह्यात तर सरासरीच्या 67.8 टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यातल्या त्यात धरणे भरली असली तरी तलाव आणि विहिरीतील पाणी साठा कमी झाल्यानंतर पिण्यासाठी देखील मागणी वाढणार आहे. याशिवाय पाऊस वेळेवर झाला नसल्याने खरिपाची पिके धोक्यात आली असून पुढील पावसाळ्यापर्यंत चारा आणि अन्य समस्या निर्माण होणार आहेत. अशातच जायकवाडी धरणात नाशिकहून पाणी सोडण्यात येणार आहे. गंगापूर धरण समूहातून आणि दारणा धरण समूहातून येत्या 31 ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी विरोध केला होता. आता पुन्हा विरोध होऊ लागला आहे.
|
|
दरम्यान काही दिवसांपासून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या हालचाली झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर गेल्या 17 आक्टोबरला छत्रपती संभाजीनगर येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक पार पडली. त्यात केवळ धरणांतील साठ्याची आकडेवारी सादर करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा असल्याने त्यावेळी आंदोलने टाळण्यासाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता, मात्र आता या संदर्भात आदेश जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण समूहातून 0.5 टीएमसी, दारणा समुहातून 2643 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी नाशिककरांचा विरोध असून यामुळे नाशिक नगर विरुद्ध मराठवाडा पाण्याचा संघर्ष होणार असल्याची चिन्हे आहेत.
नाशिकहून पाणी सोडण्याला विरोध
नाशिक नगरच्या धरण समूहातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गंगापूर धरण समूह 0.5 टीएमसी, दारणा धरण समूह 2.643 टीएमसी, मुळा धरण समूह 2.10 टीएमसी, प्रवरा धरण समूह 3.36 टीएमसी असा एकूण एकूण नाशिक नगरमधून विसर्ग 8.603 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील तालुके दुष्काळी सदृश्य असताना जायकवाडीला पाणी का सोडले जात आहे,या स सवाल नाशिकचे लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जायकवाडी धरणात 65 टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असल्यानं नाशिक नगर जिल्ह्यातून 8.603 TMC पाणी सोडले जाणार आहे. मात्र नाशिक हुन पाणी सोडण्याला विरोध होण्याची शक्यता असून पाणी सोडण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करण्यात येत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



