
Nashik : मुंबई ते नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सध्या मुंबई-नाशिक महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. या महामार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या महामार्गावरील दुरुस्तीचे काम केव्हा पूर्ण होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील दुरुस्तीबाबत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला टोला लगावला. मंत्री छगन भुजबळ म्हणाले, 'नाशिकमध्ये आता आयुक्त आहेत का? शहरात खड्डे पडले असतील तर रस्ते चांगले करायला पाहिजेत. मुंबई-नाशिक महामार्गाबाबत देखील ४०% काम झाले आहे. अद्याप खूप काम बाकी आहे. काही तांत्रिक अडचणी होत्या. त्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला तरी मुंबईला पोहोचण्यासाठी चार-पाच तासांचा वेळ लागत आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी असते. जोपर्यंत समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत काही अडचण येतील'.
|
Pune : एसटीची डिझेलवरील वाहने ‘एलएनजी’मध्ये रूपांतरित करण्याचा घाट |
मालवणमधील राड्यावरही मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. ' सर्वांना छत्रपती प्रिय आहेत. या घटनेचं दुःख आहे की, शांततेत हे घेतलं पाहिजे. कोण चुकलंय? हे हळूहळू बाहेर येईल. आतमध्ये कोणी असेल तर दुसरा बाहेर थांबतो. एकमेकांना समजून घेतले पाहिजे, तर असे वाद होणार नाहीत'.
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 'आम्ही गॉडफादर नाही, पण त्यांच्यासाठी खूप काही केले आहे. त्यांना सहकार्य केले आहे. कविता राऊत यांच्याबद्दल मी किमान ५० वेळा मी मंत्रिमंडळाच्या बैठीकत पत्र दिले आहे. त्यांना जिथे जायचे आहे, तिथे त्यांच्याकडे पात्रता नव्हती. त्यांनी ते नंतर प्राप्त केले. त्यानंतर सरकारचे नियम बदलले. क्रीडा क्षेत्रात सामावून घेण्याचा निर्णय झाला. काही लोकांना पटकन न्याय मिळतो. एखादं जिंकल्यानंतर निधी आणि इतर सोयी लगेच मिळतात'.
मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर भाष्य करताना मंत्री भुजबळ म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणं ही बाब दुर्दैवी आहे. फक्त मराठी माणसाचं नाही तर महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना दुःख झालं आहे. या घटनेला कोण जबाबदार आहे, याबाबत चौकशी होईल. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्यांचे नाव समोर येईल'.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



