
Mumbai : केंद्रीय अर्थसंकल्पात निर्माला सीतारामन यांनी देशातील ७ हायस्पीड कॉरिडॉरची घोषणा केली. यामध्ये मुंबई आणि पुण्याचाही समावेश आहे. मुंबई-पुणे आणि पुणे हैदराबाद असे २ हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्यात येतील, अशी घोषणा अर्थसंकल्पात सीतारामन यांनी केली. त्यामुळे भविष्यात मुंबई आणि पुणे ही दोन शहरे आणखी जवळ येणार आहेत. हायस्पीड कोरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि पुणे हे अतंर फक्त ४८ मिनिटांत पार करता येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णामुळे महाराष्ट्रातील दळणवळण आणखी वेगात होईलच, त्याशिवाय रोजगार आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे.
हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे आर्थिक राजधानी आणि शैक्षणिक केंद्र हाकेच्या अंतरावर येणार आहे. याचा फायदा महाराष्ट्राच्या विकासात होईल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. देशातील ७ कॉरिडॉरची लांबी ४००० किमी इतकी आहे. यासाठी १६ लाख कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. देशातील प्रमुख शहरे, आयटी हब अन् धार्मिक स्थळे जोडण्याचा केंद्राचा मानस आहे. त्याचाच भाग म्हणून ७ हायस्पीड कॉरिडॉरची घो,णा करण्यात आली. त्यामधील मुंबई आणि पुणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. या दोन शहरात प्रवासासाठी सध्या ३ ते साडेतीन तास लागतात. पण हाय-स्पीड रेल्वेमुळे हा प्रवास फक्त ४८ मिनिटांवर येणार आहे. व्यापारावर्गासोबतच विद्यार्थ्यांना अन् नोकरदार वर्गाला याचा फायदा होईल, असे म्हटले जातेय.
|
|
७ हायस्पीड रेल्वे कोणत्या ?
मुंबई-पुणे
पुणे-हैदराबाद
हैदराबाद-बंगळूर
हैदराबाद-चेन्नई
चेन्नई-बंगळूर
दिल्ली-वाराणसी
वाराणसी-सिलीगुडी
प्रस्तावित कॉरिडॉरमुळे वेळेची बचत
१. मुंबई ते पुणे : ४८ मिनिटे
२. पुणे ते हैदराबाद : १ तास ५५ मिनिटे
३. हैदराबाद ते बंगळूर : २ तास
४. हैदराबाद ते चेन्नई : २ तास ५५ मिनिटे
५. चेन्नई ते बंगळूर : १ तास १३ मिनिटे
६. दिल्ली ते वाराणसी : ३ तास ५० मिनिटे
७. वाराणसी ते सिलिगुडी : २ तास ५५ मिनिटे
एकूण लांबी : सुमारे ४ हजार किमी
एकूण खर्च : १६ लाख कोटी रुपये
मुंबई आणि पुण्यातील अंतर किती आहे?
हाय-स्पीड रेल्वेमुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरांतील १५० किमीचा प्रवास एका तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होणार आहे. पुणे आणि हैदराबादमधील प्रवासाला सध्या आठ ते नऊ तास लागतात, पण हाय-स्पीड रेल्वेमुळे हे अंतर फक्त ३ ते ४ तासांत पूर्ण होईल. हाय-स्पीड रेल्वे मार्गांवरील गाड्या किमान २५० ते ३२० किलोमीटर प्रति तास वेगाने धावतात. मुंबई-अहमदाबाद बुलेट मार्गावरील गाड्या ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावतील, असा अंदाज आहे. देशातील पहिला हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर एनएचएसआरसीएल बांधत आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावेल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे.
शहर
- नागपूर: २३७ वर्षांची परंपरा कायम! लाकडी नंदींच्या बाजारात मोठी उलाढाल, महाकाय नंदीबैलांचे दर थेट लाखांच्या घरात
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कथित भ्रष्टाचार; सभापतींच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
- बीड: शासनाने १२ मागण्या मान्य केल्यावरही मुंबई मोर्चाचा अट्टहास का? ज्योती मेटे यांचे मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर गंभीर सवाल
- कोल्हापूर: गुंतवणुकीच्या परताव्याचे आमिष दाखवून अडीच कोटींची फसवणूक; कोकणातील कसाल-गिम्वी येथून तीन जणांना बेड्या
- सातारा: पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडल्यानंतर अखेर साताऱ्यातील त्या अभागी मातेचा वृद्धाश्रमात निवारा; मन हेलावून टाकणारी घटना
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा






























Subscribe to my channel




Get paid for every click—join our affiliate network now!