
Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वे मुंबई विभागाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी १६ आणि १७ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री विशेष मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक विद्याविहार ते ठाणे दरम्यानच्या ५व्या आणि ६व्या मार्गिकांवर तसेच कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गावरील स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी घेण्यात येणार आहे. या काळात गाड्यांचे नियोजन बदलणार असून काही गाड्या विलंबाने धावतील, तर काहींचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने याबाबत तपशीलवार प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
विद्याविहार ते ठाणे दरम्यानचा ब्लॉक १६/१७ ऑगस्टच्या मध्यरात्री ००.४० वाजता सुरू होऊन १७ ऑगस्ट रोजी पहाटे ०४.४० वाजेपर्यंत चालणार आहे. यामुळे डाउन मेल व एक्सप्रेस गाड्या ५व्या मार्गाऐवजी जलद मार्गावर वळवल्या जातील. लोकमान्य टिळक टर्मिनस–हटिया एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपुर कुशीनगर एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव एक्सप्रेस या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. तर अप दिशेने धावणाऱ्या शालिमार–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, विशाखपट्टणम–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आणि आझमगढ–लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्याही उशिराने धावतील.
दरम्यान, कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गावरील महत्त्वाच्या कामाच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठीही १६/१७ ऑगस्ट रोजी रात्री ००.३० ते पहाटे ०५.१५ वाजेपर्यंत विशेष वीज व वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक गाड्या उशिराने धावतील. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस–पाटलिपुत्र एक्सप्रेस, सीएसएमटी–अमृतसर एक्सप्रेस, हटिया एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस आणि कुशीनगर एक्सप्रेसचा समावेश आहे. तर अप दिशेने धावणाऱ्या शालिमार–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, हावडा–सीएसएमटी मेल, आझमगढ–लोकमान्य टिळक टर्मिनस अति जलद एक्सप्रेस, नांदिग्राम एक्सप्रेस, समरसता एक्सप्रेस आणि अमरावती–सीएसएमटी अति जलद एक्सप्रेस या गाड्यांनाही उशीर होणार आहे.
याशिवाय, गोंदिया–सीएसएमटी विदर्भा एक्सप्रेस ४० मिनिटे नियंत्रित ठेवली जाईल. लिंगमपल्ली–सीएसएमटी देवगिरी एक्सप्रेस, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस आणि पंजाब मेल या गाड्यांनाही १५ ते २० मिनिटे विलंब होईल. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा लोकलच्या काही सेवा उशिराने धावतील. १६ ऑगस्ट रोजी रात्री २२.४७ वाजता आणि १७ ऑगस्ट रोजी पहाटे ००.०८ वाजता सुटणाऱ्या गाड्यांवर याचा परिणाम होईल. कसारा येथून सुटणाऱ्या ०३.५१ आणि ०४.५९ च्या लोकल सेवाही उशिराने चालतील.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या ब्लॉक्समुळे दिवसा मुख्य लाईन किंवा हार्बर व ट्रान्स-हार्बर लाईनवरील उपनगरीय सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, मेल व एक्सप्रेस गाड्या नियोजनापेक्षा उशिराने धावतील आणि प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.
रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे की, या ब्लॉक्सद्वारे रेल्वे पायाभूत सुविधा टिकवून ठेवणे, मार्गिकांची क्षमता वाढविणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी देणे हा मुख्य उद्देश आहे. वाढत्या प्रवासी भाराला सामोरे जाताना नियमित देखभाल व तांत्रिक कामे वेळोवेळी होणे अत्यावश्यक आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



