Mumbai :गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा


Mumbai : राज्यात सध्या नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे वातावरण तापलेले असतानाच, मुंबईच्या भाजपच्या महापौर रितू तावडे यांच्या एका वक्तव्याने नवी चर्चा रंगली आहे. गुरुदेवांच्या आशीर्वादामुळेच माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

महावीर जयंती निमित्त बोरीवली येथील कोरा केंद्र मैदानात आयोजित कार्यक्रमात बोलताना तावडे यांनी आपला अनुभव सांगितला. “गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मला घशाची समस्या होती. औषधोपचार करूनही काही विशेष फरक पडत नव्हता. त्यानंतर मी गुरुजींना माझी समस्या सांगितली. त्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर आज मी स्पष्टपणे बोलू शकत आहे. हा एक मोठा चमत्कारच आहे,” असे त्या म्हणाल्या.

 

यावेळी त्यांनी सकारात्मक ऊर्जेचाही उल्लेख करत, “आज तुम्ही माझा आवाज ऐकत आहात, ही गुरुदेवांची कृपा आहे,” असे सांगितले. भगवान महावीर यांच्या अहिंसेच्या मार्गाचा संदर्भ देत त्यांनी श्रद्धेचे महत्त्वही अधोरेखित केले.
दरम्यान, राज्यात आधीच भोंदूबाबांच्या प्रकरणामुळे चर्चा सुरू असताना, महापौरांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *