
Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाने कुणबी प्रमाणत्र देताना सगेसोयऱ्यांचाही समावेश करावा, तसा कायदा मंजूर करावा तसेच मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे अधिवेशन त्वरित घ्यावे, आरक्षण अधिसूचना व मसुद्याची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला सुरवात करणार आहेत.
आज पत्रकार परिषद घेत त्यांनी त्यांची भूमिका मांडली. यावेळी ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी साल्हेर किल्ल्याजवळ घातपाताचा प्रयत्न झाल्याची शंका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.
|
|
भुजबळांना देण्यात आलेल्या धमकीवर बोलताना जरांगे म्हणाले की, महाराष्ट्रातील सगळे पोलीस त्यांना द्या, त्यांना पोलीसांचे कपडे घाला. त्यांना कशाला कोण मारेल? म्हतारा माणूस आहे त्यांना कशाला कोण मारेल? त्यांना कोणत्याच जातीचा समाजाचा व्यक्ती धमकी देऊ शकत नाही.म्हताऱ्या माणसाची माया करण्याचे संस्कार पुरोगामी महाराष्ट्रावर आहेत.
पुढे बोलतना जरांगे म्हणाले की, आम्ही भीत नाहीत, तुझ्यासारखं कोणाला सांगत देखील नाहीत. ते स्वतःच्याच कार्यकर्त्याला सांगतात की, मला संरक्षण द्यायला सांगा. आम्हाला भीती असून आम्ही सांगत नाहीत. आमच्यासोबत असं सात वेळा घडलं, पण आम्ही सांगितलं नाही.
साल्हेर किल्ल्यावरसुद्धा आमच्या गाडीवर कोणाचा टॅम्पो आला आम्हाला माहिती आहे, पण आम्ही संरक्षण द्या किंवा घातपाताचा प्रकार आहे असं म्हणालो नाही. तुझ्यासारखे असे भंगार चाळे आम्ही करत नाही. हे सांगायचं नव्हतं पण त्यांनी काढलं म्हणून...
पोलीसांनी त्या ड्रायव्हरला पकडलं. तेव्हा त्याने कोणाचं तरी नाव सांगितलं की त्याला पिकअप घालायला सांगितल म्हणून.... मी हे खरं की खोटं तपासायला सांगितलं.... त्याच्याविरोधात आमची काही तक्रार नाहीये... पण याची चौकशी करा. मला मुद्दाम गाड्यांवर पिकअप घालायला सांगितलं असं त्या ड्रायव्हरने कोणाचं नाव घेत सांगितलं, त्याची चौकशी करा, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
हा घातपाताचा प्रकार असेल असे वाटतं का? असे विचारलं असता जरांगे म्हणाले की, असू शकतो, अन्यथा किल्ल्यावर ते आलं कुठून? आम्हाला जाताना काहीच दिसलं नाही, मग ते तिथं आधीच ठेवलं होतं. उतार असल्याने गिअर टाकून सोडून दिलं, हे आम्ही सांगत बसत नाही. हिंगोलीच्या सभेत काय झालं हे आम्ही सांगत बसलो नाही, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
तुम्हाला देखील धोका आहे का? या प्रश्नावर जरांगे म्हणाले की मला काही धोका नाही, मी मरायला भीत नाही, मी क्षत्रीय मराठ्याचा आहे मरायला भीत नसतो.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




