
Jaipur Chemical Tanker Explosion : जयपूरमधील भानक्रोटा परिसरात अजमेर महामार्गावर केमिकलने भरलेल्या टँकरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटानंतर टँकरला लागलेल्या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. आज सकाळी (२० डिसेंबर) जयपूर-अजमेर महामार्गावर ही घटना घडली. तसेच या टँकरच्या शेजारी असणारे दुसरे काही वाहनेही जळून खाक झाले आहेत. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांसह स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. सध्या बचावकार्य सुरु असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना घडल्यानंतर जयपूर-अजमेर महामार्ग तात्पुरता बंद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी जयपूर-अजमेर महामार्गावर एक केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला एका ट्रकने धडक दिली आणि त्यानंतर टँकरचा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टु़डेनी दिलं आहे.
|
Ulhasnagar Crime : शासकीय ओळखपत्र घालून आलेले तोतया अधिकारी ताब्यात; दोन महिलांचा समावेश |
या स्फोटानंतर लागलेली आग काही क्षणात त्या ठिकाणी जवळ असलेल्या एका इंधन पंपापर्यंत पसरली. तसेच त्या पंपाच्या परिसरात उभी असलेली काही इतर वाहनेही जळून खाक झाले आहेत. यानंतर अग्निशमन दलाच्या तब्बल २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, या टँकरचा स्फोटामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे दृश्य व्हिडीओत दिसत आहे.
या घटनेसंदर्भात जयपूरच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “आगीने अनेक काही वाहेने जळून खाक झाले आहेत. मात्र, या घटनेत किती वाहनांचा समावेश आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.” तसेच केमिकलमुळे आग विझवण्यासाठी आणि मदतकार्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही घटनेची माहिती घेत आढावा घेतला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याशी चर्चा करून राजस्थानच्या आगीच्या घटनेची माहिती घेतली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



