Abhishek Sharma Suryakumar Yadav Team IndiaImage Credit source: @surya_14kumar x account
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत यजमान टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी करुन दाखवली. भारताने साखळी फेरीत अजिंक्य राहत विजयी चौकार लगावला. भारताने यूएसए, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्स या संघांना पराभूत करत आपला दबदबा कायम ठेवला. भारत 4 विजयांसह ए ग्रुपमधून टेबल टॉपर ठरली. आता टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकायला सज्ज झाली आहे. टीम इंडिया सुपर 8 मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 हात करणार आहे. या निमित्ताने भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20I वर्ल्ड कप आणि एकूणच टी 20I क्रिकेटमध्ये कामगिरी कशी आहे? हे आकड्यांच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
रविवारी टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सामना
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील पहिलाच सामना असणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तसेच दोन्ही संघ साखळी फेरीत अजिंक्य राहिले आहेत. त्यामुळे रविवारी दोघांपैकी एका संघाच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लागणार हे निश्चित आहे. अशात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर 8 मोहिमेची सुरुवात विजयाने करुन सलग पाचवा सामना जिंकण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दोघांपैकी सरस कोण?
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही आठवी वेळ ठरणार आहे. याआधी झालेल्या 7 पैकी सर्वाधिक सामन्यांत टीम इंडिया वरचढ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. भारताने दक्षिण आफ्रिकेवर टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला 2 सामनेच जिंकता आले आहेत.
दोन्ही संघ 2024 फायनलनंतर आमनेसामने
भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ याआधी 2024 च्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. तेव्हा भारताने सनसनाटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी धुव्वा उडवत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला होता.
टीम इंडिया अहमदाबादमध्येही अजिंक्य
दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्येही अजिंक्य आहे. उभयसंघात या स्टेडियममध्ये एकमेव टी 20I सामना खेळवण्यात आला आहे. भारताने 2025 साली या मैदानात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी सहज विजय मिळवला होता.
दक्षिण आफ्रिकेला भारताने विजयासाठी दिलेल्या 232 धावांचा पाठलाग करताना 201 पर्यंतच मजल मारता आली होती. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सुपर 8 फेरीत उभयसंघात हायस्कोरिंग मॅच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




