मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात अत्यंत दिमाखात संपन्न झाला. या शानदार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा व कलाकारांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे अभिनंदन केले आणि उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठी अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याचं तोंडभरुन कौतुक केलं, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांकडून प्रसाद ओकचे मोठे कौतुक: ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेता प्रसाद ओकला 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारा'नं गौरवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद ओक याने 'धर्मवीर' चित्रपटात साकारलेल्या आनंद दिघे यांच्या ऐतिहासिक भूमिकेबाबत भरभरून भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, "विष्णुपंत पागनीस म्हणजे संत तुकाराम... निळू फुले म्हणजे अत्यंत इरसाल असा राजकारणी... तसंच आता, प्रसाद ओक म्हणजे धर्मवीर आनंद दिघे..." मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे शब्द उच्चारताच सभागृहात एकच दाद मिळाली आणि अभिनेता प्रसाद ओक स्वतः जागेवरून उठून उभा राहिला व मुख्यमंत्र्यांसमोर हात जोडून नतमस्तक झाला.
प्रसाद ओक यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "आपल्या सर्वांचे लाडके प्रसाद ओक, जे एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि सुंदर कलावंत आहेत... मला असं वाटतं की, कलेच्या क्षेत्रात एक प्रकारे '३६० डिग्री मॅन' म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात ते परीक्षक म्हणून जे काम करतात, ते खरोखरच विलक्षण आहे. ज्यांनी धर्मवीर आनंद दिघेंना प्रत्यक्ष पाहिलं नसेल, त्यांच्यासाठी आयुष्यभर प्रसाद ओक यांनी साकारलेली ती प्रतिमा इतकी सुंदर आणि हुबेहूब आहे की, त्यांच्याकरता आता तेच खरे धर्मवीर आनंद दिघे ठरले आहेत. इतकं सुंदर आणि सजीव काम त्यांनी या भूमिकेत केले आहे."
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिश्कीलपणे असेही म्हटले की, "आत्ताच त्यांनी सांगितलं की त्यांनी १२५ सिनेमे केले आहेत... पण प्रसाद ओक, तुम्ही काळजी करू नका, एवढ्या लवकर तुम्हाला जीवनगौरव दिला जाणार नाही, कारण अजून खूप मोठे पुरस्कार तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यामुळे ही सेवा तुम्ही सातत्यानं सिनेसृष्टीसाठी अविरतपणे सुरू ठेवली पाहिजे."
इतर दिग्गजांचाही सन्मान व शासनाचे धोरण: या पुरस्कार सोहळ्यात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला 'राज कपूर विशेष योगदान पुरस्कार' आणि दिग्गज सलीम खान यांना 'राज कपूर जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाला होता (प्रकृती अस्वस्थतेमुळे सलीम खान यांच्या वतीने त्यांची पत्नी अभिनेत्री हेलन यांनी हा पुरस्कार स्वीकारला).
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटसृष्टीसाठी शासनाच्या आगामी योजनांची माहिती दिली. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटसृष्टीची कलात्मक गुणवत्ता जपतानाच आधुनिक तंत्रज्ञानानं युक्त अशी 'चित्रनगरी' विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधा, विविध प्रकारच्या सेट्सची उपलब्धता एकाच ठिकाणी करून दिली जाईल. तसेच, मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे (Theaters) उपलब्ध करून देण्याचा एक सर्वसमावेशक आराखडा लवकरच जाहीर केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मराठी चित्रपटांचे आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही त्यांची खरी वैशिष्ट्ये असून मराठी रसिक आणि कलाकारांनी ही परंपरा उच्च स्तरावर नेऊन ठेवली आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
शहर
- मुंबई: महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! आता शेतीशी संबंधित सर्व व्यवहार एकाच डिजिटल छताखाली होणार, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
- पुणे: कात्राज-कोंढवा रस्ता बनला मृत्यूचा सापळा! महापालिका आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणखी एका निष्पाप तरुणीचा बळी
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
महाराष्ट्र
- पुणे: रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; गाड्यांना फटका बसणार? हडपसर-घोरपडी-पुणे मार्गावरील कामाची संपूर्ण माहिती
- नांदेड: मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्र ज्वाला! नांदेडमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर्स फाडले, तर मनोज जरांगे पाटलांचा सरकारला सज्जड दम
- सांगली: स्पर्धा परीक्षा आंदोलनावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर हल्लाबोल; म्हणाले, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्यात मग्न
- मुंबई: महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! आता शेतीशी संबंधित सर्व व्यवहार एकाच डिजिटल छताखाली होणार, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
गुन्हा
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा


























Subscribe to my channel



