छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियावर झालेली ओळख आणि मैत्री एका ३५ वर्षीय विवाहित महिलेसाठी अत्यंत धोकादायक ठरल्याची एक संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील चॅट आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका नराधमाने विवाहितेचे अपहरण केले, तिला तब्बल २४ तास एका निर्जन ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये ओलीस ठेवले आणि तिच्यावर वारंवार अमानुष अत्याचार केल्याची भीषण घटना घडली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित महिला आणि तिचा पती बदनापूर तालुक्यातील असून ते दोघेही ऊसतोडीचे काम करतात. काही दिवसांपूर्वी आरोपी राजू मसू माळी याने या विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. महिलेने ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर चॅटिंग आणि संवाद सुरू झाला. दरम्यान, पीडिता आणि तिचा पती गंगापूर परिसरात ऊसतोडीसाठी गेले असताना आरोपी तिथेही पोहोचला, ज्यामुळे त्यांच्यातील संपर्क अधिक वाढला.
घाटी रुग्णालयातून केले अपहरण:
गेल्या काही दिवसांपूर्वी १४ जुलै रोजी ही पीडित महिला आपल्या मावसभावाला भेटण्यासाठी आपल्या बहिणीसोबत छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात आली होती. दुपारी चारच्या सुमारास तिची बहीण घरी निघून गेल्यानंतर ती आपल्या भावासोबत रुग्णालयातच थांबली होती. हीच संधी साधून आरोपी राजू माळी तिथे पोहोचला. पीडिता पाणी आणण्यासाठी खाली गेली असता, आरोपीने तिला अडवले. "तुझे इन्स्टाग्रामवरील चॅट आणि खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन," अशी धमकी देत त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या भयंकर धमक्यांमुळे प्रचंड घाबरलेली महिला नाइिलाजाने त्याच्या दुबलीवर बसली. मात्र, आरोपीने क्षणात तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून शहरापासून दूर एका निर्जन भागातील पत्र्याच्या शेडमध्ये नेले.
२४ तास ओलीस ठेवून अत्याचार:
त्या निर्जन ठिकाणी नेऊन नराधम राजू माळी याने त्या विवाहितेला तब्बल २४ तास ओलीस (बंधक) ठेवले आणि तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले. यादरम्यान पीडितेने हतबल होत मला माझ्या लहान मुलांची खूप आठवण येत आहे, मला कृपया घरी जाऊ द्या, अशी वारंवार हात जोडून विनवणी केली. मात्र, त्या विकृताच्या मनात जराही दया आली नाही. त्यानंतर १६ जुलै रोजी आरोपी तिला नेवासा परिसरातील आणखी एका दुसऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला आणि तिथेही दिवसभर डांबून ठेवत रात्री पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. अखेर १७ जुलै रोजी आरोपीने तिला नेवासा येथून बसमध्ये बसवून गावी पाठवून दिले. परंतु, जाताना "जर तू पोलिसांत तक्रार केलीस किंवा पुन्हा माझ्या नादी लागलीस, तर तुला जिवंत सोडणार नाही," अशी खूनाची धमकीही त्याने दिली.
पतीला सांगितला संपूर्ण प्रकार आणि पोलिसांत धडक:
घरी पोहोचल्यानंतर प्रचंड दहशतीखाली असलेल्या आणि मानसिक धक्का बसलेल्या त्या विवाहितीने घडलेला सर्व भयंकर प्रकार आपल्या पतीला सविस्तर सांगितला. पतीने अत्यंत धाडस दाखवत व पत्नीला धीर देत बेगमपुरा पोलीस ठाण्यात गाठून याप्रकरणी सविस्तर तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीषा केदार आणि त्यांच्या पथकाने तात्काळ तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी वेगाने शोध घेत आरोपी राजू मसू माळी याला नेवासा येथून बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




