छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियावर झालेली ओळख आणि मैत्री एका ३५ वर्षीय विवाहित महिलेसाठी अत्यंत धोकादायक ठरल्याची एक संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील चॅट आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका नराधमाने विवाहितेचे अपहरण केले, तिला तब्बल २४ तास एका निर्जन ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये ओलीस ठेवले आणि तिच्यावर वारंवार अमानुष अत्याचार केल्याची भीषण घटना घडली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित महिला आणि तिचा पती बदनापूर तालुक्यातील असून ते दोघेही ऊसतोडीचे काम करतात. काही दिवसांपूर्वी आरोपी राजू मसू माळी याने या विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. महिलेने ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर चॅटिंग आणि संवाद सुरू झाला. दरम्यान, पीडिता आणि तिचा पती गंगापूर परिसरात ऊसतोडीसाठी गेले असताना आरोपी तिथेही पोहोचला, ज्यामुळे त्यांच्यातील संपर्क अधिक वाढला.
घाटी रुग्णालयातून केले अपहरण:
गेल्या काही दिवसांपूर्वी १४ जुलै रोजी ही पीडित महिला आपल्या मावसभावाला भेटण्यासाठी आपल्या बहिणीसोबत छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात आली होती. दुपारी चारच्या सुमारास तिची बहीण घरी निघून गेल्यानंतर ती आपल्या भावासोबत रुग्णालयातच थांबली होती. हीच संधी साधून आरोपी राजू माळी तिथे पोहोचला. पीडिता पाणी आणण्यासाठी खाली गेली असता, आरोपीने तिला अडवले. "तुझे इन्स्टाग्रामवरील चॅट आणि खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन," अशी धमकी देत त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या भयंकर धमक्यांमुळे प्रचंड घाबरलेली महिला नाइिलाजाने त्याच्या दुबलीवर बसली. मात्र, आरोपीने क्षणात तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून शहरापासून दूर एका निर्जन भागातील पत्र्याच्या शेडमध्ये नेले.
२४ तास ओलीस ठेवून अत्याचार:
त्या निर्जन ठिकाणी नेऊन नराधम राजू माळी याने त्या विवाहितेला तब्बल २४ तास ओलीस (बंधक) ठेवले आणि तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले. यादरम्यान पीडितेने हतबल होत मला माझ्या लहान मुलांची खूप आठवण येत आहे, मला कृपया घरी जाऊ द्या, अशी वारंवार हात जोडून विनवणी केली. मात्र, त्या विकृताच्या मनात जराही दया आली नाही. त्यानंतर १६ जुलै रोजी आरोपी तिला नेवासा परिसरातील आणखी एका दुसऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला आणि तिथेही दिवसभर डांबून ठेवत रात्री पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. अखेर १७ जुलै रोजी आरोपीने तिला नेवासा येथून बसमध्ये बसवून गावी पाठवून दिले. परंतु, जाताना "जर तू पोलिसांत तक्रार केलीस किंवा पुन्हा माझ्या नादी लागलीस, तर तुला जिवंत सोडणार नाही," अशी खूनाची धमकीही त्याने दिली.
पतीला सांगितला संपूर्ण प्रकार आणि पोलिसांत धडक:
घरी पोहोचल्यानंतर प्रचंड दहशतीखाली असलेल्या आणि मानसिक धक्का बसलेल्या त्या विवाहितीने घडलेला सर्व भयंकर प्रकार आपल्या पतीला सविस्तर सांगितला. पतीने अत्यंत धाडस दाखवत व पत्नीला धीर देत बेगमपुरा पोलीस ठाण्यात गाठून याप्रकरणी सविस्तर तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीषा केदार आणि त्यांच्या पथकाने तात्काळ तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी वेगाने शोध घेत आरोपी राजू मसू माळी याला नेवासा येथून बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




