राष्ट्रीय राजकारणात सध्या जे मंथन सुरू आहे, त्यालादोन बाजू आहेत. पहिली म्हणजे, लोकसभेत अल्पमतातअसूनही भाजपने भारताला जवळपास एकपक्षीयराजवटीचा देश बनवण्यात यश मिळवले आहे. दुसरीबाजू अशी की, हे काम प्रादेशिक पक्षांना फोडून केले जातआहे आणि आता काँग्रेस हाच एकमेव महत्त्वाचा, शाबूतविरोधी पक्ष उरला आहे. अशा प्रकारे भारतीय राजकारणदोनपक्षीय समीकरणात बदलले आहे. हे समीकरण अगदी साधे आणि सरळ असायला हवेहोते, अट फक्त इतकीच की काँग्रेसने एक दमदार आव्हानम्हणून समोर यायला हवे होते. मात्र, भाजपविरुद्धच्यालढतीत केवळ 10 टक्के विजयाचा दर गाठणाऱ्याकाँग्रेसला ते शक्य नाही. तसे, द्विपक्षीय व्यवस्था भाजपलापूर्णपणे सोयीची आहे. कारण त्यांना फक्त ताकदवानप्रादेशिक पक्षांशी लढावे लागते आणि अशा बहुतेकपक्षांना कमकुवत केले गेले आहे. अखिलेश यादव यांच्यासमाजवादी पक्षाची परीक्षा आगामी लढतीत योगीआदित्यनाथ यांच्याशी होणार आहे. आता 3 प्रश्न उपस्थित होतात. पहिला: भाजपलाकाँग्रेस इतका सोयीस्कर प्रतिस्पर्धी का वाटतो? दुसरा:काँग्रेसमध्ये अशी कोणती उणीव आहे की ज्यामुळे तो एकविश्वासार्ह पर्याय ठरू शकत नाही? तिसरा: काँग्रेसस्वतःला यातून कसे सावरणार? पहिल्या प्रश्नाचे उत्तरखूप सोपे आहे : भाजप चार इंजिनच्या जोरावर भरारी घेतआहे - हिंदुत्व, राष्ट्रवाद, जनकल्याणकारी कार्यक्रमांचीकुशल अंमलबजावणी आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणाराअवाढव्य पायाभूत सुविधांचा विकास. काँग्रेसकडे यासर्वांना उत्तर नाही, हे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे.काँग्रेसच्या मते भाजप जे करत आहे ते चुकीचे आहे, तरप्रश्न उरतो की, सत्तेत आल्यावर काँग्रेस स्वतः कायकरेल? अर्थव्यवस्था, धोरणात्मक प्रश्न आणि संरक्षणाच्या मुद्द्यांवर काँग्रेस भाजपपेक्षा वेगळे काय करेल?पाकिस्तान, चीन, अमेरिका आणि पश्चिमआशियासोबतचे व्यवहार ती कसे हाताळेल? संरक्षणावरती किती खर्च करेल? भाजपचा पर्याय म्हणून तिचे भविष्यातील चित्र काय आहे? भाजप जर त्यांच्या मते भांडवलशाहीवादी असेल आणि राष्ट्रीय हितांशी तडजोड करत असेल, तर काँग्रेस असे काय वेगळे करणार आहे?जर काँग्रेस स्वतःला एक पर्याय मानत असेल, ज्यालामतदार भाजपच्या जागी निवडतील, तर ती वेगळे कायदेत आहे? काँग्रेसला आधी या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. याव्यतिरिक्त, भाजपची भरारी उंचावणाऱ्या त्या चारइंजिनांना उत्तर शोधावे लागेल. सर्वात आधी हिंदुत्वाचाविषय घेऊ. या आघाडीवर भाजपकडे मुकाबलाकरण्याचा प्रयत्न काँग्रेसने करूच नये. ही जमीन आता जिंकली गेली आहे आणि काँग्रेस त्यात कोणताही बदलघडवू शकत नाही, मग त्यांच्या नेत्यांनी कितीही मंदिरांनाभेटी दिल्या तरीही. शिवसेनेनेही आता हा प्रयत्न सोडूनदिला आहे. खरं तर, उद्धव ठाकरे यांनी एकदा मलादार्शनिक अंदाजात सांगितले होते की, त्यांच्या वडिलांनीमहाराष्ट्रवादाचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा स्वीकार करणे हीचूक होती, कारण यामुळेच भाजपला शिवसेनेच्यामैदानात शिरण्याची आणि त्यावर ताबा मिळवण्याची संधीमिळाली. जनकल्याणाच्या मुद्द्यावर काँग्रेस जगातील सर्व सुखदेण्याचे आश्वासन देऊ शकते. कर्नाटक आणि तेलंगणाततसे करून त्यांनी यश मिळवले आहे. पायाभूतसुविधांच्या बाबतीत मात्र त्यांना समस्यांना सामोरे जावेलागू शकते. इतक्या वर्षांपासून अनेक मोठ्या प्रकल्पांनात्यांचा विरोध राहिला आहे, निकोबार प्रकल्प हे त्याचेताजे उदाहरण आहे. त्यामुळे धर्माचा मुद्दा त्यांच्याआवाक्याबाहेरचा आहे, जनकल्याण/विकासाचा मुद्दाइतका निर्विवाद आहे की त्यात भावना जोडता येत नाहीत.त्यामुळे काँग्रेसकडे शेवटी राष्ट्रवादाचा मुद्दाच शिल्लकराहतो. काँग्रेसने राष्ट्रवादाचा मुद्दा कशा प्रकारेनाकारला, हे 2014 नंतरच्या त्यांच्या राजकारणातीलसर्वात रहस्यमय पैलू आहे. त्यांचे काही नेते आज जरीयुरोपमधील पर्यावरणवादी नेत्यांसारखे दिसण्याचा प्रयत्नकरत असले, तरी खरी काँग्रेस रक्ताचे अश्रू ढाळणाऱ्याशांततावाद्यांचा पक्ष कधीच नव्हता. हा तोच पक्ष आहे,ज्याने इंदिरा गांधींच्या नेतृत्वात 1971 मध्ये पाकिस्तानचेदोन तुकडे केले आणि लालबहादूर शास्त्रींच्या काळात1965 चे युद्ध या अर्थाने जिंकले की, त्यांनी काश्मीरहडपण्याच्या इराद्याने हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला मागेरेटले होते. काँग्रेसने ईशान्येकडील बंडखोरांचाहीक्रूरतेने मुकाबला केला. 5 मार्च 1966 रोजी आयझॉललावेढा घातलेल्या बंडखोरांना सरकारी तिजोरी, आसामरायफल्सच्या बटालियनचे मुख्यालय आणि डेप्युटीकमिशनरच्या निवासावर ताबा मिळवण्यापासूनरोखण्यासाठी वायुसेनेची विमाने धाडली होती. ऑपरेशनब्लू स्टारअंतर्गत त्यांनी सैन्याला सुवर्णमंदिरात पाठवलेहोते. त्यानंतर ऑपरेशन ब्लॅक थंडरही केले होते. पहिली दोन ऑपरेशन्स इंदिरा गांधींच्या काळात आणिशेवटची दोन ऑपरेशन्स त्यांचे पुत्र राजीव गांधींच्याकाळात झाली. त्यानंतर काँग्रेसने काश्मीर खोरे आणिपंजाबमध्ये (1991-95) दहशतवाद आणिफुटीरतावादाच्या सर्वात रक्तरंजित पर्वाचा मुकाबलाकेला. हे पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात झाले.इतकेच काय, जवाहरलाल नेहरूंच्या काळातही नागाबंडखोरांशी अत्यंत कठोर मार्गाने लढा दिला गेला होता.नेहरूंनी गोवा मुक्त करण्यासाठी सैन्य पाठवले होते.काँग्रेसला नेहरू घराण्याबाहेरील त्यांचे पंतप्रधान कदाचितआवडत नसतील, पण वास्तव हे आहे की त्यांचा एकहीनेता असा नव्हता जो राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कमकुवतहोता. म्हणूनच आश्चर्य वाटते की, राष्ट्रवादाचा मूळ पक्षरस्ता कसा विसरला. उरी कांडानंतरचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ असो, पुलवामाकांडानंतर बालाकोटवर झालेला हवाई हल्ला असो, पूर्वलडाख/गलवानमधील संकट असो किंवा ऑपरेशनसिंदूर - या सर्वांवर प्रश्न उपस्थित करून आणि पुराव्यांचीमागणी करून काँग्रेसने स्वतःचेच नुकसान करून घेतलेआहे. ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत संसदेत राहुलगांधींच्या वक्तव्यात यावर जास्त भर होता की भारताचीकिती विमाने गमावली आणि का? त्यांच्या पक्षाच्यापंजाबमधील एका खासदाराने तर भारतीय वायुसेनेच्यापाडलेल्या विमानाचा एक तुकडाही प्रदर्शित केला होता.याला किती ‘स्मार्ट’ पाऊल म्हणता येईल? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) काँग्रेसला वाटले तर राष्ट्रवादावरसविस्तर चर्चा सुरू होऊ शकतेभारतीय राष्ट्रवाद हा आपल्या इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि संविधानाबद्दलच्या सामायिकभावनांतून निर्माण झाला आहे. भाजपने याचेहिंदूकरण केले आहे. या मुद्द्यावर काँग्रेस चर्चाघडवून आणू शकते. मात्र, जर तिने आपले सध्याचेधोरण सुरू ठेवले, तर कुणीही त्यावर विश्वासठेवणार नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: विद्यापीठात बोगस डिग्रीचा मोठा घोटाळा उघड! ३ लाखांत विकली जात होती बीकॉमची पदवी
- पुणे: नवले पुलाजवळ १ कोटींची रोकड लुटण्याच्या प्रकरणात तोतया पत्रकार जेरबंद, महिला पोलीस कर्मचाऱ्यासह दोघे जण सहआरोपी
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
महाराष्ट्र
- पुणे: विद्यापीठात बोगस डिग्रीचा मोठा घोटाळा उघड! ३ लाखांत विकली जात होती बीकॉमची पदवी
- पुणे: नवले पुलाजवळ १ कोटींची रोकड लुटण्याच्या प्रकरणात तोतया पत्रकार जेरबंद, महिला पोलीस कर्मचाऱ्यासह दोघे जण सहआरोपी
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
गुन्हा
- पुणे: विद्यापीठात बोगस डिग्रीचा मोठा घोटाळा उघड! ३ लाखांत विकली जात होती बीकॉमची पदवी
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नवले पूल परिसरात व्यावसायिकाची गाडी अडवून रोकड लुटण्याच्या प्रयत्न #punenews #newsupdate #ytreels
गाझियाबादमध्ये मोठा अपघात टळला; ट्रक विजेच्या तारांत अडकल्याने लोखंडी ग्रिल कोसळली #LatestNews
बारामतीत भीषण अपघात; मालवाहू ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य























Subscribe to my channel



