ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननेताबा मिळवला तेव्हा पाकिस्तान आपल्या भू-राजकीयप्रयत्नात यशस्वी झाला असे वाटले होते.अफगाणिस्तानात रणनीतिक वर्चस्व मिळवण्यासाठीपाकिस्तानने 40 वर्षांहून अधिक काळ आपली राजकीयशक्ती, गुप्तचर यंत्रणा आणि लष्करी बळ खर्च केलेहोते. निरीक्षकांना वाटत होते की, आता पाकिस्तानअफगाणिस्तानातील पकड मजबूत करेल, आपलीपश्चिम सीमा सुरक्षित करेल आणि पुन्हा एकदा लक्षभारताकडे केंद्रित करेल. पण 5 वर्षांच्या आतचपरिस्थितीने अनपेक्षित वळण घेतले. आज पाकिस्तानला अफगाणिस्तानात एक शत्रुत्व पत्करणारे सरकार, ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या (टीटीपी) नेतृत्वाखालील हिंसाचार आणि सीमेवरील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था यांचा सामना करावा लागत आहे. प्रश्नअसा आहे की, एवढे मोठे यश मिळवूनही पाकिस्तानने आपले रणनीतिक नियंत्रण कसे गमावले? या सर्वांच्या मुळाशी ड्युरंड रेषेचा जुना वाद आहे,जो 1893 मध्ये ब्रिटिश राजवटीत ठरवला गेला होता.पश्तून टोळीच्या भागांना विभागणारी ही वादग्रस्त सीमाएकाच वांशिक ओळख असलेल्या समुदायांनाही वेगळेकरते. अफगाणिस्तानच्या सरकारांनीही ही सीमा कधीचस्वीकारली नाही. खरे तर 1947 मध्ये अफगाणिस्तान हाएकमेव देश होता, ज्याने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांचेसदस्यत्व देण्यास विरोध केला होता. पाकिस्तानलाखात्री होती की, दशकांपासून तालिबानला पाठिंबादिल्याने त्यांचे सरकार शेवटी ड्युरंड रेषा मान्य करेल.पण त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरला. कट्टरपंथी असूनहीतालिबानवर पश्तून राष्ट्रवादाचा प्रभाव आहे. अशास्थितीत पाकिस्तानी दावे मान्य करणे त्यांची घरगुतीविश्वासार्हता कमी करणारे ठरणार होते. अनेक दशके तालिबानच्या कमांडर्सवरपाकिस्तानच्या आयएसआयचे वर्चस्व होते. कारणनाटोविरुद्धच्या लढाईत ते पाकिस्तानमधील सुरक्षितठिकाणांवर अवलंबून होते. मात्र, जेव्हा एखादीकट्टरपंथी चळवळ सत्तेवर येते तेव्हा तिचे स्वरूपबदलते. ऑगस्ट 2021 पूर्वी तालिबानला पाकिस्तानचीगरज होती, पण त्यानंतर परिस्थिती बदलली आणि आतापाकिस्तानला तालिबानची गरज पडू लागली. हामहत्त्वाचा बदल समजून घेण्यात पाकिस्तान अपयशीठरला. तालिबान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानच्यागुप्तचर प्रमुखांनी काबूलला दिलेली धावती भेट हात्यांच्या चुकीच्या आत्मविश्वासाचा पुरावा होता. आणिइथूनच परिस्थितीच्या आकलनात मोठी चूक सुरूझाली. या बदलाचा पहिला परिणाम म्हणजे टीटीपी पुन्हाडोके वर काढू लागला. टीटीपी जरी अफगाणतालिबानपेक्षा वेगळी संघटना असली तरी त्यांचेवैचारिक आणि वांशिक संबंध एकच आहेत.सीमेपलीकडील युद्धभूमीवर या दोन्ही संघटनांच्यासहकार्याचा मोठा इतिहास आहे. सत्तेत आल्यानंतरअफगाण तालिबानने टीटीपीला पुन्हा सुरक्षित आश्रयदिला. वैचारिक एकतेमुळे केवळ पाकिस्तानला खुशकरण्यासाठी आपल्या साथीदार इस्लामिस्टलढाऊंविरुद्ध कारवाई करणे तालिबान सरकारसाठीकठीण आहे. पाकिस्तानने अफगाण धोरण लादण्याचा प्रयत्नकेल्यानेही असंतोष वाढला आहे. पाकिस्तानच्यासीमेपलीकडील हल्ल्यांमुळे अविश्वास अधिकचवाढला, ज्यामुळे टीटीपीच्या पाकिस्तानविरोधीकारवायांना पोषक वातावरण मिळाले. जसजसेअफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे संबंध बिघडत गेलेतसतसा भारताने आपला महत्त्वाचा राजनैतिक प्रभावपुन्हा वाढवला आहे.भारत या स्थितीकडे कसे पाहतोयावर बरेच काही अवलंबून असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) दहशतवाद्यांचे ‘चांगले’ आणि ‘वाईट’असे वर्गीकरण करण्याच्या पाकिस्तानच्याधोरणाचे पितळ उघडे पडले आहे. अनेकदशकांपासून पाकिस्तानने अशादहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला, ज्याअफगाणिस्तान आणि भारतात त्यांचीरणनीती पूर्ण करत होत्या.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: राज ठाकरेंचा अपमान; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: "मानसिक नक्षलवादी" म्हणजे नक्की काय? पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करावा; खासदार सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल
- पुणे: माळशेज-भोरांडे जलविद्युत प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थगिती; खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या आक्षेपांमुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले
- नवी मुंबई: महापेमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; ॲपल टेक सपोर्टच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची लूट
महाराष्ट्र
- मुंबई: राज ठाकरेंचा अपमान; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: "मानसिक नक्षलवादी" म्हणजे नक्की काय? पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करावा; खासदार सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल
- पुणे: माळशेज-भोरांडे जलविद्युत प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थगिती; खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या आक्षेपांमुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले
- नवी मुंबई: महापेमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; ॲपल टेक सपोर्टच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची लूट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

























Subscribe to my channel




