वसुंधरेचे शोधयात्री हे भन्नाट पुस्तक लिहिणाऱ्या डॉ. अनुराग लव्हेकर यांचे 'पुस्तके साद आणि दाद' हे पुस्तकावरचे पुस्तक आले आहे. ॲलिस अल्बिनिया यांच्या Empires of Indus मध्ये लेखिका जसजशी नदीच्या मुखापासून उगमाकडे जाते तसतसा कथेचा प्रवाह वर्तमानकाळ, नजीकचा भूतकाळ, प्राचीनकाळ असा जातो. 'साद आणि दाद' हे पुस्तकही या निरीक्षणाला अंगीकारून कल्पकतेने लिहिल्याचे वाटते. पुस्तकातल्या पहिल्या बारा प्रकरणांचा क्रम बघता तो श्रीकृष्णदेवराय-पूर्व काळापासून म्हणजे साधारण इसवीसनाच्या १३ व्या शतकापासून ते १९९३च्या किल्लारी भूकंपासंदर्भापर्यंत क्रमाक्रमाने येतो. यात सुशील अत्रेंचे हम्पी विजयनगर, व्यंकटेश देवनपल्लींचे राजाधिराज श्रीकृष्णदेवराया, वा. गो. आपटे आणि यशोधन जोशी लिखित (नागपूरकर) मराठ्यांचा दरारा ते आपण स्वातंत्र्योत्तर काळातल्या शेषराव मोरे यांच्या गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी, साहना विजयकुमार यांच्या १९८०-९० मधले काश्मीर दाखवणार्या कशीर, मनोज कुलकर्णी लिखित ९३ च्या किल्लारी भूकंपाशी निगडीत चिगूर कादंबरीपर्यंत आपण येऊन पोहोचतो. पुस्तकातले शेवटचे ३७ वे प्रकरण फरीद झकेरिआ यांच्या फ्यूचर ऑफ फ्रीडमवर आहे. ते वाचकाला भविष्याविषयी विचार करण्यास भाग पाडत कालक्रमावरही कळस चढवते. त्यामुळे हा केवळ समीक्षाग्रंथ न राहता एक साहित्यकृती म्हणून मिरवतो. अनुराग लव्हेकर हे पेशाने डॉक्टर आहेत. उपचार पद्धती ठरवताना डॉक्टरला आधी केलेल्या उपचारांचे परिणाम ताडून नवी, वेगळी आणि पुढची औषधे आधीच ठरवावी लागतात. त्याप्रमाणे या १२ ऐतिहासिक गंभीर पुस्तकांची समीक्षा वाचल्यावर वाचक गंभीर, विषण्ण, अभिमानी वगैरे झाला असेल. त्याच्यात वीरश्री, रणनीती, कपटीपणा वगैरेचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्याला लेखक हलक्या-फुलक्या हास्य-काव्य पुस्तकांच्या समीक्षेचा डोस देतो. वाचकाला असे ताजेतवाने केल्यावर हा डॉक्टर आपल्याला नद्या आणि भौगोलिक सफरीवर नेतो. मग आपण हिंदुस्तान, गंगा-यमुना, पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण फिरून दमलो की व्यक्तिचित्रांची ओळख करून देत प्रेरणा देतो. या उपचारांनी उत्साही झालो की, अलगद स्वतःचा व्यवसाय आणि लिखाण यांची सांगड घालणार्या डॉक्टर्सनी लिहिलेल्या वैद्यकी संदर्भातल्या पुस्तकांकडे प्रकरणांचा क्रम सरकतो. त्यात 'निसर्गाचे गोड गुपित: यौवनस्पर्श' या पुस्तकाचा विशेष उल्लेख करावा लागेल. खरे तर १९९० च्या आधी जन्मलेल्या मुलांना वाळत घातलेले स्त्रियांचे कपडेही दिसू नयेत इतकी काळजी घेतली जात असे. आता अंगावर कपडे दिसू नयेत असा काळ आला आहे. काळ बनून काळ येतोय त्याचवेळी नव्या पिढीची वाईट वेळ येऊ नये यासाठी लैंगिक शिक्षण आवश्यक झाले आहे. या विषयावरची पुस्तके आली पाहिजेत आणि वाचली गेली पाहिजेत, हेच लेखक इथे सुचवतो. साद आणि दाद या पुस्तकाला उमा कुलकर्णी यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांचे आत्मचरित्र, त्यांनी केलेली भाषांतरे यावरची लेखकाची समीक्षाही 'साद आणि दाद'ला व्यापून आहे. लेखकाचे मनोगत संत तुकारामांच्या ओव्यांनी सुरू होते. लेखक श्रेय देताना हातचे राखत नाही. मात्र, नंतर तो डॉक्टरी भूमिकेत शिरतो. त्याची मासलेवाईक उदाहरणे म्हणजे,'पुस्तके सहेतुकपणे निवडलेली नाहीत', 'माझ्याकडून नकारात्मक न लिहिले जाणे शक्य आहे', 'सारांशलेखन झाले असल्यास मूळ पुस्तक वाचण्याची गरज उरत नाही हे म्हणणे उद्धटपणाचे ठरेल' अशी वाक्ये देता येतील. 'साद आणि दाद' वाचल्यावर त्यातल्या ३७ मधली ७ ते ८ पुस्तके मुळातून वाचावी असे मला वाटले. लव्हेकरांनी केलेल्या विश्लेषण/समीक्षेच्या वाचकाला असे वाटणे हे निःसंशय त्या समीक्षेचे यश आहे. याचा अर्थ बाकी पुस्तके वाचू नयेत असे वाटले असा नाही. बाकी पुस्तके मी वाचलेली आहेत किंवा अन्य काही कारणाने ती समीक्षा वाचूनही माझ्या 'रडार'वर आली नाहीत. समीक्षा लिखाणातही काही पल्लेदार वाक्ये, लालित्यपूर्ण लिखाण करता येते याची चुणूक लेखकाने जागोजागी दाखवली आहे. 'गार्डन ऑफ फूल्स'च्या समीक्षेतले 'सर कॉटलींचे स्वप्न गंगेच्या प्रवाहप्रमाणेच त्यांनी बांधलेल्या कालव्यातून अखंड वाहते आहे'. 'नदी समुद्राला मिळण्याआधी तिचे पात्र आपोआप विस्तारत जात असते'. 'आधी सद्दाम हुसेन नंतर उद्दाम बुश'. 'सख्खे शेजारी सखे शेजारी नसतात'. 'बंगालला बंगाल का म्हणतात याचे गौडबंगाल उलगडले', अशी वाक्ये 'साद आणि दाद'चे वाचन रंगतदार करतात. काही अप्रचलित मराठी शब्द जे लुप्त होऊ शकतात असे वापरले आहेत. 'खरूज'सारखा शब्द उच्चारल्यावर जेन-झी, 'रोग नंतर-आधी शब्द आवर' असा चेहेरा करते. क्षयरोग, कुष्ठरोग, 'शाठ्याधारित, विस्मय, विहंगमावलोकन असे शब्द. कदाचित हे मुद्दामहून वापरले आहेत. ही सवय भाषारक्षणालाही मदत करेल. प्रत्येक पुस्तकाचे लव्हेकर यांनी पूर्ण वाचन केलेले आहे आणि त्यासंबंधी चवीने लिहिले आहे. मनोगतात सांगितल्याप्रमाणे गेल्या १५-२० वर्षांमधली पुस्तके यात घेतली आहेत. त्यामुळे बहुतेक लेखक, कमी वाचन असलेल्या पिढीला माहिती नसतील असे आहेत. मला यातला एकही लेखक आणि पुस्तक माहिती नसेल अशा दडपणाखाली मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. पण पहिलेच पुस्तक सुशील अत्रे या माझ्या गाववाल्याचे तर दुसरे 'राजा कृष्णदेवराया' हे व्यंकटेश देवनपल्ली या माझ्या परिचित ज्येष्ठ लेखकांचे पाहून मला हायसे वाटले. नंतर अविनाश चिंचवडकर यांचे 'गुगलचे डोके ठिकाणावर आहे काय?' हेही समाविष्ट दिसले. गिरीश कुबेर तर प्रसिद्धच आहेत. देवनपल्ली, चिंचवडकर, लव्हेकर अशा सगळ्यांनी परप्रांतात राहूनही मराठीचा झेंडा हाती धरून डौलात फडकत ठेवला आहे. यासाठी कुठलेही रस्त्यावरचे आंदोलन न करता, भावना न भडकवता, शत्रुत्व निर्माण न करता. शांतपणे खोलीत बसून वाचून आणि लिहून. त्याला दाद देणे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. माझ्या मते समीक्षा ग्रंथ खुशाल विकत घ्यावेत आणि बाळगावेत. ते मूळ पुस्तके वाचायला हुरूप देतात. निवड करायला माहिती देतात. आणि एका अनुभवी आणि चतुरस्त्र वाचकाच्या नजरेतून धावती भेट घडवत त्या-त्या विषयाचा वेगळा दृष्टीकोन देतात. ' पुस्तके साद आणि दाद' जरूर संग्रही ठेवावे.
पुस्तकाचे नाव: पुस्तके साद आणि दाद
लेखक: डॉ. अनुराग लव्हेकर
प्रकाशक: भाग्यश्री प्रकाशन
प्रथमावृत्ती: २९ डिसेंबर २०२५
पृष्ठसंख्या: २२४
किंमत: ३५०
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel





Hi https://is.gd/9PLRLO