वसुंधरेचे शोधयात्री हे भन्नाट पुस्तक लिहिणाऱ्या डॉ. अनुराग लव्हेकर यांचे 'पुस्तके साद आणि दाद' हे पुस्तकावरचे पुस्तक आले आहे. ॲलिस अल्बिनिया यांच्या Empires of Indus मध्ये लेखिका जसजशी नदीच्या मुखापासून उगमाकडे जाते तसतसा कथेचा प्रवाह वर्तमानकाळ, नजीकचा भूतकाळ, प्राचीनकाळ असा जातो. 'साद आणि दाद' हे पुस्तकही या निरीक्षणाला अंगीकारून कल्पकतेने लिहिल्याचे वाटते. पुस्तकातल्या पहिल्या बारा प्रकरणांचा क्रम बघता तो श्रीकृष्णदेवराय-पूर्व काळापासून म्हणजे साधारण इसवीसनाच्या १३ व्या शतकापासून ते १९९३च्या किल्लारी भूकंपासंदर्भापर्यंत क्रमाक्रमाने येतो. यात सुशील अत्रेंचे हम्पी विजयनगर, व्यंकटेश देवनपल्लींचे राजाधिराज श्रीकृष्णदेवराया, वा. गो. आपटे आणि यशोधन जोशी लिखित (नागपूरकर) मराठ्यांचा दरारा ते आपण स्वातंत्र्योत्तर काळातल्या शेषराव मोरे यांच्या गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी, साहना विजयकुमार यांच्या १९८०-९० मधले काश्मीर दाखवणार्या कशीर, मनोज कुलकर्णी लिखित ९३ च्या किल्लारी भूकंपाशी निगडीत चिगूर कादंबरीपर्यंत आपण येऊन पोहोचतो. पुस्तकातले शेवटचे ३७ वे प्रकरण फरीद झकेरिआ यांच्या फ्यूचर ऑफ फ्रीडमवर आहे. ते वाचकाला भविष्याविषयी विचार करण्यास भाग पाडत कालक्रमावरही कळस चढवते. त्यामुळे हा केवळ समीक्षाग्रंथ न राहता एक साहित्यकृती म्हणून मिरवतो. अनुराग लव्हेकर हे पेशाने डॉक्टर आहेत. उपचार पद्धती ठरवताना डॉक्टरला आधी केलेल्या उपचारांचे परिणाम ताडून नवी, वेगळी आणि पुढची औषधे आधीच ठरवावी लागतात. त्याप्रमाणे या १२ ऐतिहासिक गंभीर पुस्तकांची समीक्षा वाचल्यावर वाचक गंभीर, विषण्ण, अभिमानी वगैरे झाला असेल. त्याच्यात वीरश्री, रणनीती, कपटीपणा वगैरेचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्याला लेखक हलक्या-फुलक्या हास्य-काव्य पुस्तकांच्या समीक्षेचा डोस देतो. वाचकाला असे ताजेतवाने केल्यावर हा डॉक्टर आपल्याला नद्या आणि भौगोलिक सफरीवर नेतो. मग आपण हिंदुस्तान, गंगा-यमुना, पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण फिरून दमलो की व्यक्तिचित्रांची ओळख करून देत प्रेरणा देतो. या उपचारांनी उत्साही झालो की, अलगद स्वतःचा व्यवसाय आणि लिखाण यांची सांगड घालणार्या डॉक्टर्सनी लिहिलेल्या वैद्यकी संदर्भातल्या पुस्तकांकडे प्रकरणांचा क्रम सरकतो. त्यात 'निसर्गाचे गोड गुपित: यौवनस्पर्श' या पुस्तकाचा विशेष उल्लेख करावा लागेल. खरे तर १९९० च्या आधी जन्मलेल्या मुलांना वाळत घातलेले स्त्रियांचे कपडेही दिसू नयेत इतकी काळजी घेतली जात असे. आता अंगावर कपडे दिसू नयेत असा काळ आला आहे. काळ बनून काळ येतोय त्याचवेळी नव्या पिढीची वाईट वेळ येऊ नये यासाठी लैंगिक शिक्षण आवश्यक झाले आहे. या विषयावरची पुस्तके आली पाहिजेत आणि वाचली गेली पाहिजेत, हेच लेखक इथे सुचवतो. साद आणि दाद या पुस्तकाला उमा कुलकर्णी यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांचे आत्मचरित्र, त्यांनी केलेली भाषांतरे यावरची लेखकाची समीक्षाही 'साद आणि दाद'ला व्यापून आहे. लेखकाचे मनोगत संत तुकारामांच्या ओव्यांनी सुरू होते. लेखक श्रेय देताना हातचे राखत नाही. मात्र, नंतर तो डॉक्टरी भूमिकेत शिरतो. त्याची मासलेवाईक उदाहरणे म्हणजे,'पुस्तके सहेतुकपणे निवडलेली नाहीत', 'माझ्याकडून नकारात्मक न लिहिले जाणे शक्य आहे', 'सारांशलेखन झाले असल्यास मूळ पुस्तक वाचण्याची गरज उरत नाही हे म्हणणे उद्धटपणाचे ठरेल' अशी वाक्ये देता येतील. 'साद आणि दाद' वाचल्यावर त्यातल्या ३७ मधली ७ ते ८ पुस्तके मुळातून वाचावी असे मला वाटले. लव्हेकरांनी केलेल्या विश्लेषण/समीक्षेच्या वाचकाला असे वाटणे हे निःसंशय त्या समीक्षेचे यश आहे. याचा अर्थ बाकी पुस्तके वाचू नयेत असे वाटले असा नाही. बाकी पुस्तके मी वाचलेली आहेत किंवा अन्य काही कारणाने ती समीक्षा वाचूनही माझ्या 'रडार'वर आली नाहीत. समीक्षा लिखाणातही काही पल्लेदार वाक्ये, लालित्यपूर्ण लिखाण करता येते याची चुणूक लेखकाने जागोजागी दाखवली आहे. 'गार्डन ऑफ फूल्स'च्या समीक्षेतले 'सर कॉटलींचे स्वप्न गंगेच्या प्रवाहप्रमाणेच त्यांनी बांधलेल्या कालव्यातून अखंड वाहते आहे'. 'नदी समुद्राला मिळण्याआधी तिचे पात्र आपोआप विस्तारत जात असते'. 'आधी सद्दाम हुसेन नंतर उद्दाम बुश'. 'सख्खे शेजारी सखे शेजारी नसतात'. 'बंगालला बंगाल का म्हणतात याचे गौडबंगाल उलगडले', अशी वाक्ये 'साद आणि दाद'चे वाचन रंगतदार करतात. काही अप्रचलित मराठी शब्द जे लुप्त होऊ शकतात असे वापरले आहेत. 'खरूज'सारखा शब्द उच्चारल्यावर जेन-झी, 'रोग नंतर-आधी शब्द आवर' असा चेहेरा करते. क्षयरोग, कुष्ठरोग, 'शाठ्याधारित, विस्मय, विहंगमावलोकन असे शब्द. कदाचित हे मुद्दामहून वापरले आहेत. ही सवय भाषारक्षणालाही मदत करेल. प्रत्येक पुस्तकाचे लव्हेकर यांनी पूर्ण वाचन केलेले आहे आणि त्यासंबंधी चवीने लिहिले आहे. मनोगतात सांगितल्याप्रमाणे गेल्या १५-२० वर्षांमधली पुस्तके यात घेतली आहेत. त्यामुळे बहुतेक लेखक, कमी वाचन असलेल्या पिढीला माहिती नसतील असे आहेत. मला यातला एकही लेखक आणि पुस्तक माहिती नसेल अशा दडपणाखाली मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. पण पहिलेच पुस्तक सुशील अत्रे या माझ्या गाववाल्याचे तर दुसरे 'राजा कृष्णदेवराया' हे व्यंकटेश देवनपल्ली या माझ्या परिचित ज्येष्ठ लेखकांचे पाहून मला हायसे वाटले. नंतर अविनाश चिंचवडकर यांचे 'गुगलचे डोके ठिकाणावर आहे काय?' हेही समाविष्ट दिसले. गिरीश कुबेर तर प्रसिद्धच आहेत. देवनपल्ली, चिंचवडकर, लव्हेकर अशा सगळ्यांनी परप्रांतात राहूनही मराठीचा झेंडा हाती धरून डौलात फडकत ठेवला आहे. यासाठी कुठलेही रस्त्यावरचे आंदोलन न करता, भावना न भडकवता, शत्रुत्व निर्माण न करता. शांतपणे खोलीत बसून वाचून आणि लिहून. त्याला दाद देणे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. माझ्या मते समीक्षा ग्रंथ खुशाल विकत घ्यावेत आणि बाळगावेत. ते मूळ पुस्तके वाचायला हुरूप देतात. निवड करायला माहिती देतात. आणि एका अनुभवी आणि चतुरस्त्र वाचकाच्या नजरेतून धावती भेट घडवत त्या-त्या विषयाचा वेगळा दृष्टीकोन देतात. ' पुस्तके साद आणि दाद' जरूर संग्रही ठेवावे.
पुस्तकाचे नाव: पुस्तके साद आणि दाद
लेखक: डॉ. अनुराग लव्हेकर
प्रकाशक: भाग्यश्री प्रकाशन
प्रथमावृत्ती: २९ डिसेंबर २०२५
पृष्ठसंख्या: २२४
किंमत: ३५०
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel





Hi https://is.gd/9PLRLO