हा माझ्याकडून लिहिल्या गेलेल्या कठीण स्तंभांपैकी एक आहे. यात सार्वजनिक धोरणांवर चर्चा केलेली नाही, कोणत्याही योजनेचे विश्लेषण नाही, किंवा कर, निवडणूक किंवा संसदेच्या सत्रावर भाष्यही नाही. हा स्तंभ ‘मौना’बद्दल आहे. असे मौन, जे दीर्घकाळ टिकून होते, जे कधीतरी धैर्याने तोडले गेले आणि जे आता पुन्हा हळूच परतताना दिसत आहे. आठ वर्षांपूर्वी भारतातील महिलांनी आवाज उठवला होता. त्यांनी दीर्घ श्वास घेतला, स्वतःला सावरले आणि सामर्थ्यवानांसमोर उभे राहून सत्य सांगितले. हे सत्य केवळ भ्रम दूर करण्यासाठीच नाही, तर अशा घटनांना खतपाणी घालणाऱ्या संरचना मोडीत काढण्याच्या आशेने बोलले गेले होते. ‘मी-टू’ आंदोलन ही केवळ एक क्षणिक घटना नव्हती, तो आत्मचिंतन आणि उत्तरदायित्वाचा एक निर्णायक क्षण होता. वरिष्ठ अधिवक्ता रेबेका जॉन यांनी ‘मी-टू’ची लढाई कायदेशीर आघाडीवर लढली होती. त्यांनी मला सांगितले की, मी-टू आंदोलन या आधारावर उभे होते की, पीडितांनी ते मौन संपवावे ज्यामुळे कामाच्या ठिकाणी आणि इतरत्र सत्तेचा गैरवापर नियमितपणे सुरू होता. पण सत्य बोलण्यासाठी अनेक महिलांना गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यांच्यावर खटले भरले गेले. ज्या प्रकरणांत पीडितांना कायदेशीर विजय मिळाला, तिथेही पुरुषांचे कोणतेही ठोस नुकसान झाले नाही. उलट, हे पुरुष त्यांच्या प्रभावक्षेत्रात पुन्हा प्रस्थापित झालेले आपण पाहिले आहेत. काही प्रकरणांत लैंगिक हिंसेच्या तक्रारी न्यायालयीन तपासाच्या निकषांवर टिकू शकल्या नाहीत—तपासातील त्रुटी किंवा अकार्यक्षमतेमुळे. तसेच, पीडितांना सतत सार्वजनिक बदनामीचा सामना करावा लागला. येथे पीडिता आणि आरोपी यांच्यातील सामाजिक प्रतिष्ठा आणि वर्गीय शक्ती यामध्ये मोठी दरी होती, हे लक्षात घेण्यासारखे आहे. टीकाकार अनेकदा असा बचाव करतात की, कामाच्या ठिकाणच्या लैंगिक शोषणाची समस्या भारताने 2013 च्या ‘पॉश’ (पीओएसएच) कायद्याद्वारे आधीच सोडवली आहे. हा कायदा निश्चितच त्याच्या काळातील पुरोगामी होता. त्याने एक औपचारिक नियोक्ता व निश्चित कार्यस्थळाची कल्पना केली होती. कोलकाता उच्च न्यायालयाच्या एका महिला अधिवक्त्याने सांगितले, आम्ही सर्वांनी आमच्या व्यावसायिक जीवनात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या समस्येचा सामना केला आहे. कायद्याचे क्षेत्रही याला अपवाद नाही. आम्ही कुणाकडे तक्रार करायची? ‘शी-बॉक्स’चा कुठे पत्ता नाही. ‘पॉश’ ट्रेनिंगकडे दुर्लक्ष केले जाते, कारण असा समज पसरवला गेला आहे की, यामुळे महिला कायद्याचा ‘दुरुपयोग’ करायला शिकतील. भारतात सत्तासंबंधांच्या संदर्भात होणाऱ्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या सार्वजनिक खुलाशांवर कार्यवाही करण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. ‘मी-टू’च्या खुलाशानंतरही आपण नवीन कायदेशीर चौकट तयार केली नाही. त्याऐवजी विद्यमान कायदे, विशेषतः मानहानीच्या तरतुदी अशा प्रकरणांमधील पुढच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवतात. वरिष्ठ पत्रकार सबा नक्वी यांनी सध्याच्या परिस्थितीवर म्हटले आहे की, जे पुरुष विद्यमान सत्ताव्यवस्थेशी जोडलेले आहेत आणि ज्यांनी या तंत्रात आपली जागा बनवली आहे, त्यांनी शांतपणे आपले जीवन पुन्हा प्रस्थापित केले आहे. परंतु ज्यांना व्यवस्थाविरोधी मानले गेले, त्यांना न्यायालयाकडून ‘क्लीन चिट’ मिळाल्यानंतरही परतण्याची संधी दिली गेली नाही. खोलवर रुजलेले पितृसत्ताक संस्कार हेच मी-टू आंदोलनातील आरोपींविरुद्ध समाजात वास्तविक रोषाचा अभाव असण्याचे कारण आहेत. प्रत्यक्षात वेदना किंवा संताप व्यक्त करण्याऐवजी, एक प्रकारची उपरोधिक संमती दिसते-डोळा मिचकावून दिलेली स्वीकृती किंवा हसण्यावारी नेण्याची प्रवृत्ती, जणू गैरवर्तणुकीच्या घटना म्हणजे केवळ ‘लॉकर रूम’मधील विनोद आहेत. जेव्हा सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती सार्वजनिकरीत्या महिला नेत्यांची थट्टा करते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते, तेव्हा आपल्या नागरी समाजाचा विरोध आणि स्पष्ट निषेध कुठे असतो? जेव्हा महिलांचा छळ केल्याचे गंभीर आरोप असलेल्या लोकांना साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सन्मानाने आमंत्रित केले जाते, तेव्हा आपल्याला या कठोर सत्याचा सामना करावाच लागेल की-स्त्रीद्वेष आज समाजाच्या मुख्य प्रवाहाचा भाग बनला आहे! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. लेखाच्या सहायक संशोधिका चाहत मंगतानी आणि वर्णिका मिश्रा आहेत.) भारतात अशी कोणतेही कायदेशीर तरतूद नाही, जी सत्तासंबंधांच्या संदर्भात लैंगिक गैरवर्तणुकीच्या सार्वजनिक खुलाशावर कार्यवाही करतील. खरे तर ‘मी-टू’ आंदोलनानंतरही आपण कोणतीही नवीन कायदेशीर चौकट विकसित केलेली नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




