भौतिक सुख आणि सुविधा म्हणजे आपल्या सांसारिक जीवनाला अधिक आरामदायक, सोयीस्कर आणि सुलभ बनवणारे भौतिक घटक, जसे की निवास, बंगला, गाडी, पंखा, फ्रीज, उत्तम अन्न आणि कपडे. या सामान्य आवश्यकतेच्या वस्तू आहेत. परंतु त्या अधिक किमतीच्या आणि त्यात अधिक सोय असलेल्या असा हट्ट पुर्वक मानसिक आग्रह असणे यामुळे मानसिक शांतता भंग होते आणि वास्तविक आनंद मिळत नाही. या गोष्टी तात्पुरता शारीरिक आराम आणि आनंद देतात, परंतु त्या शाश्वत किंवा कायमस्वरूपी आंतरिक आनंदाची हमी देऊ शकत नाहीत. म्हणूनच कुठेतरी अंतरिक आनंदाची आवश्यकता भासते आणि त्यावर विचार करणे गरजेचे ठरते. खरा आणि अधिक वेळ टिकणारा आनंद संतोष वृत्तीतून येत असतो. जे काही उपलब्ध आहे त्यात सुख आणि समाधान मानणे हिताचे ठरते. आपली कुवत नसलेल्या किमतीच्या वस्तू मिळवण्यासाठी माणूस अन्य प्रकारे प्रयत्न करत असतो. यातूनच अनैतिकतेचा जन्म होतो. भौतिकतेवर आधारित जीवनशैलीचा अधिक अवलंब आणि त्या सुविधांचा संग्रह यातूनच निर्दयता, अनैतिकता, स्वार्थ, अशा वृत्ती जन्माला येतात. वर्तमान काळानुसार शारीरिक गरजा पूर्ण करणे जसे की अन्न, निवारा आणि आरामदायी जीवनमान त्यात मोबाइल, गाडी, ए.सी., फ्रिज, उत्तम घर इत्यादींचा समावेश होतो. परंतु यापासून मिळणारी, अशा प्रकारची भौतिक सुखं मर्यादित काळासाठी आनंद देतात; एकदा या भौतिक वस्तूंच्या वापराची अती सवय झाली की त्यातील आनंद दिवसेंदिवस कमी होतो. म्हणूनच माणूस भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी अन्य प्रकारे वस्तूंच्या प्राप्तीच्या शोधात अनैतिक, वाम का मग मार्गाचा अवलंब करत असतो. 'सुविधा' याचा अर्थ म्हणजे साधन (उदा. पंखा), तर 'सुख' म्हणजे त्या साधनामुळे मिळणारा मानसिक आनंद किंवा समाधान. भौतिक सुविधा गरजेच्या आहेत, परंतु त्या एका मर्यादेपर्यंत असाव्यात. वास्तविक पाहता सुखी आयुष्यासाठी मानवी मूल्ये जसे की विश्वास, आदर, प्रेम करुणा, दया संतोष वृत्ती हे जसे महत्वाचे तसेच त्यासाठी आत्मिक साधना , विवेक पूर्णता आणि आध्यात्मिक विचाराची जाणीव असणे तितकेच महत्त्वाचे आहे. थोडक्यात, भौतिक सुविधा (Physical Facilities) आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत, परंतु मानसिक समाधान हे विचार आणि अंतर्गत समतोलावर अवलंबून असते. धन, वैभव भौतिक सुविधा देते. सुविधा आणि सुख यामध्ये मोठा फरक आहे. सुविधा, सोय, पूर्तता या बाह्य व्यवस्था आहेत. सुख आणि शांती अंतरीक अवस्था आहेत. कोणी सर्व व्यवस्था असून बेचैन असू शकतो तर कोणी अत्यंतिक उणिवा असूनही सुखी असतो. आहे त्या परिस्थितीत सुख आणि शांतीत राहण्याची मानसिक तयारी, सवय असावी. प्रश्न वैभवाचा नाही तर आंतरिक चेतनेचा आहे. मनाची गुलामी सोडावी. वर्तमानात चेतना जागृत असावी. उद्या वैभव, प्रेम मिळेल त्या वेळी जगू हा विचार निरर्थक आहे. वर्तमान क्षण शाश्वत सत्य आहे, केवळ तो क्षण भूतकाळातील स्मृती आणि भविष्याच्या कल्पना सोडून जगावा. अर्थात चेतना जागृत असणे. तेंव्हाच आपण आपले मालक असतो. सुख शांतित असतो. म्हणूनच वर्तमानातील क्षण हा भौतिकते च्या अधिक आहारी न जाता, विवेक पूर्णतेत, संतोष वृत्तीने जगण्याचा प्रयत्न करत असतानाच वास्तविक आत्मिक समाधान आणि सुख लाभेल. शरीर आहे आणि आयुष्य आहे म्हणून जगणे क्रमप्राप्त ठरते, परंतु या जगण्यासाठी भौतिकतेचा किती प्रमाणात अवलंब करायचा हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. विवेक पूर्ण अध्यात्मिक चेतना जागृत असेल तर त्याचा परिणाम जीवनशैलीवर नक्कीच असणार यात शंका नाही. त्यातूनच वास्तविक समाधान शांती लाभेल. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



