भौतिक सुख आणि सुविधा म्हणजे आपल्या सांसारिक जीवनाला अधिक आरामदायक, सोयीस्कर आणि सुलभ बनवणारे भौतिक घटक, जसे की निवास, बंगला, गाडी, पंखा, फ्रीज, उत्तम अन्न आणि कपडे. या सामान्य आवश्यकतेच्या वस्तू आहेत. परंतु त्या अधिक किमतीच्या आणि त्यात अधिक सोय असलेल्या असा हट्ट पुर्वक मानसिक आग्रह असणे यामुळे मानसिक शांतता भंग होते आणि वास्तविक आनंद मिळत नाही. या गोष्टी तात्पुरता शारीरिक आराम आणि आनंद देतात, परंतु त्या शाश्वत किंवा कायमस्वरूपी आंतरिक आनंदाची हमी देऊ शकत नाहीत. म्हणूनच कुठेतरी अंतरिक आनंदाची आवश्यकता भासते आणि त्यावर विचार करणे गरजेचे ठरते. खरा आणि अधिक वेळ टिकणारा आनंद संतोष वृत्तीतून येत असतो. जे काही उपलब्ध आहे त्यात सुख आणि समाधान मानणे हिताचे ठरते. आपली कुवत नसलेल्या किमतीच्या वस्तू मिळवण्यासाठी माणूस अन्य प्रकारे प्रयत्न करत असतो. यातूनच अनैतिकतेचा जन्म होतो. भौतिकतेवर आधारित जीवनशैलीचा अधिक अवलंब आणि त्या सुविधांचा संग्रह यातूनच निर्दयता, अनैतिकता, स्वार्थ, अशा वृत्ती जन्माला येतात. वर्तमान काळानुसार शारीरिक गरजा पूर्ण करणे जसे की अन्न, निवारा आणि आरामदायी जीवनमान त्यात मोबाइल, गाडी, ए.सी., फ्रिज, उत्तम घर इत्यादींचा समावेश होतो. परंतु यापासून मिळणारी, अशा प्रकारची भौतिक सुखं मर्यादित काळासाठी आनंद देतात; एकदा या भौतिक वस्तूंच्या वापराची अती सवय झाली की त्यातील आनंद दिवसेंदिवस कमी होतो. म्हणूनच माणूस भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी अन्य प्रकारे वस्तूंच्या प्राप्तीच्या शोधात अनैतिक, वाम का मग मार्गाचा अवलंब करत असतो. 'सुविधा' याचा अर्थ म्हणजे साधन (उदा. पंखा), तर 'सुख' म्हणजे त्या साधनामुळे मिळणारा मानसिक आनंद किंवा समाधान. भौतिक सुविधा गरजेच्या आहेत, परंतु त्या एका मर्यादेपर्यंत असाव्यात. वास्तविक पाहता सुखी आयुष्यासाठी मानवी मूल्ये जसे की विश्वास, आदर, प्रेम करुणा, दया संतोष वृत्ती हे जसे महत्वाचे तसेच त्यासाठी आत्मिक साधना , विवेक पूर्णता आणि आध्यात्मिक विचाराची जाणीव असणे तितकेच महत्त्वाचे आहे. थोडक्यात, भौतिक सुविधा (Physical Facilities) आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत, परंतु मानसिक समाधान हे विचार आणि अंतर्गत समतोलावर अवलंबून असते. धन, वैभव भौतिक सुविधा देते. सुविधा आणि सुख यामध्ये मोठा फरक आहे. सुविधा, सोय, पूर्तता या बाह्य व्यवस्था आहेत. सुख आणि शांती अंतरीक अवस्था आहेत. कोणी सर्व व्यवस्था असून बेचैन असू शकतो तर कोणी अत्यंतिक उणिवा असूनही सुखी असतो. आहे त्या परिस्थितीत सुख आणि शांतीत राहण्याची मानसिक तयारी, सवय असावी. प्रश्न वैभवाचा नाही तर आंतरिक चेतनेचा आहे. मनाची गुलामी सोडावी. वर्तमानात चेतना जागृत असावी. उद्या वैभव, प्रेम मिळेल त्या वेळी जगू हा विचार निरर्थक आहे. वर्तमान क्षण शाश्वत सत्य आहे, केवळ तो क्षण भूतकाळातील स्मृती आणि भविष्याच्या कल्पना सोडून जगावा. अर्थात चेतना जागृत असणे. तेंव्हाच आपण आपले मालक असतो. सुख शांतित असतो. म्हणूनच वर्तमानातील क्षण हा भौतिकते च्या अधिक आहारी न जाता, विवेक पूर्णतेत, संतोष वृत्तीने जगण्याचा प्रयत्न करत असतानाच वास्तविक आत्मिक समाधान आणि सुख लाभेल. शरीर आहे आणि आयुष्य आहे म्हणून जगणे क्रमप्राप्त ठरते, परंतु या जगण्यासाठी भौतिकतेचा किती प्रमाणात अवलंब करायचा हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. विवेक पूर्ण अध्यात्मिक चेतना जागृत असेल तर त्याचा परिणाम जीवनशैलीवर नक्कीच असणार यात शंका नाही. त्यातूनच वास्तविक समाधान शांती लाभेल. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



