जगामध्ये ' स्व ' सोडून ' लोकं ' नावाचा एक समुदाय असतो. या समुदायाला काय वाटेल याचीच चिंता माणूस सतत करत असतो. अनेक जण या लोकांच्या कल्पनेनुसार जगतात. मी स्वतःला वाटतं तसा राहिलो तर लोक काय म्हणतील? मी माझ्या इच्छेनुसार जगलो तर लोकांना काय वाटेल? मी मनासारखं वागलो तर लोक काय विचार करतील? असा विचार करूनच आजकाल बहुतांशी माणसं लोकांच्या अपेक्षानुसार जगत आहेत. याचाच अर्थ जीवन आपण जगत आहोत परंतु त्या जगण्याला काहीच अर्थ नाही. मी जे जीवन जगतो आहे तो मी नाही,आणि मी जगलेले जीवन माझे नाही. म्हणूनच या अशा जगण्याला अर्थ नाही. जे जीवन आपल्या स्वतःच्या संकल्पनेनुसार जगले, आपल्या विचार ध्येय आणि उद्देशाच्या निश्चितीनुसार जगले, आपल्याला वाटेल तसे मनाप्रमाणे जगत राहिले, तर ते जीवन आपले म्हणावे. आता लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्यावा. आपण आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण कराव्यात. आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी आणि मतानुसार आपल्या जीवनाची आखणी करावी. आणि त्यानुसार पुढे चालावे. लोकही पुढे जात आहेत. कोणीही थांबलेले नाही. जग चाललेले आहे. घड्याळाचे काटे थांबलेली नाहीत. आलेला क्षण मागे जात आहे. पुढचा क्षण वर्तमान होत आहे. हातातून निसटलेला क्षण भूतकाळात जात आहे. यामध्ये लोकांच्या इच्छा अपेक्षा कुठे येतात ? आणि त्यांना कुठवर महत्त्व द्यायचं ? हे आपण ठरवायचं. वाच्यता न करता स्वतःला बदला.लोकं ईर्षेने तळमळतील. जगाला मोठे उत्तर शब्दांनी नव्हे तर परिवर्तनाने द्यायचे असते. तुम्ही दूर जात नाहीत तो पर्यंत त्यांना तुमची किंमत कळत नाही. लोकांना रडून समजावून सांगू नका.ही जाणीव होऊ द्या की त्यांनी काय गमावले आहे. स्वार्थ असेल तिथे आपलेपणा शोधु नये. फक्त उपयोग पाहिला जातो तिथे प्रेम शोधु नये. उणीव आपल्या निवडीमध्ये असते. लोकं जसे असतात तसेच असतात. आता वेळ आली आहे स्वतःकडे परतण्याची. आत्मकेंद्रित होण्याची. वर्तमानातच जगून निघावे. निसटलेले क्षण परत येत नाहीत, याचा चांगला अनुभव प्रत्येकालाच आलेला आहे. म्हणून आयुष्याचा उद्देश निश्चित करावा. आपल्या ध्येयपूर्ती कडे प्रामाणिकपणे, स्व-कष्टाने चालावे. रस्त्यात येणाऱ्यांची चिंता नको, कोणाचा विचारू नको, कोणाबद्दल मनात राग,द्वेष नको. आत्मसन्मान असावा, पण अहंकार नको. असंच आपल्या उद्देशाला धरून, प्रामाणिकपणे, नैतिकतेने, धैर्याने, आत्म सन्मानानं उद्देशाकडे ध्येयाकडे जाता येतं. फक्त आपण आत्मकेंद्रीत असावे. इतरांचा सन्मान आदर असावा परंतु त्यांच्या कल्पनेचा आपल्या जीवनात विचार नको. आपल्या अपेक्षा आणि कल्पनेनुसार लोक जगत आहेत का? हे आपण पाहतच नाहीत. मात्र लोकांना काय वाटते?आपण कसे असावे? म्हणून लोकांना त्यांच्या नजरेत चांगले दिसावे म्हणून आपण एक अभिनयाचे जीवन जगत असतो. आपले स्वतःचे जीवन स्वतःच्या विचाराने आणि आपण निश्चित केलेल्या ध्येयाकरिता जगावे असेच आज या ठिकाणी व्यक्त व्हावे वाटते. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिवाजीनगरची वाहतूक कोंडी फोडणार; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी, दीड वर्षांत काम पूर्ण!
- नागपूर: कॉर्पोरेट्सचा महाराष्ट्रावर मोठा विश्वास; गुजरातच्या दुप्पट सीएसआर निधी महाराष्ट्राला प्राप्त, सामाजिक विकासात राज्य अव्वल
- मुळशीत मोठी दुर्घटना टळली! सावरगाव येथे पौड-कोळवण मुख्य रस्त्यावर कोसळले भलेमोठे झाड; प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत"
- छत्रपती संभाजीनगर: एफडीएचा दणका; अस्वच्छता अन् धोकादायक पुनर्वापर केलेल्या तेलामुळे प्रसिद्ध 'उत्तम उपहारगृह'चा परवाना तडकाफडकी निलंबित
महाराष्ट्र
- पुणे: शिवाजीनगरची वाहतूक कोंडी फोडणार; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी, दीड वर्षांत काम पूर्ण!
- गोंदिया: लाडक्या भावाच्या निधनाचा तीव्र धक्का सहन न झाल्याने बहिणीचाही मृत्यू; एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर
- नागपूर: कॉर्पोरेट्सचा महाराष्ट्रावर मोठा विश्वास; गुजरातच्या दुप्पट सीएसआर निधी महाराष्ट्राला प्राप्त, सामाजिक विकासात राज्य अव्वल
- मुळशीत मोठी दुर्घटना टळली! सावरगाव येथे पौड-कोळवण मुख्य रस्त्यावर कोसळले भलेमोठे झाड; प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत"
गुन्हा
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

🚩 श्री महाकालेश्वर मंदिरात पार पडली दिव्य भस्म आरती #PuneNews #Mahakal #Ujjain #BhasmaAarti #HarHar
"शिक्षणासाठी आलो, गुन्हेगार नाही!" #JantarMantar #StudentProtest #Delhi #Education #BreakingNews
🚨 दिल्लीत आंदोलनादरम्यान हिंसाचार; पोलिसांच्या PCR व्हॅनची तोडफोड #Delhi #Protest #JanpathMetro
देश विदेश
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य


























Subscribe to my channel



