जगामध्ये ' स्व ' सोडून ' लोकं ' नावाचा एक समुदाय असतो. या समुदायाला काय वाटेल याचीच चिंता माणूस सतत करत असतो. अनेक जण या लोकांच्या कल्पनेनुसार जगतात. मी स्वतःला वाटतं तसा राहिलो तर लोक काय म्हणतील? मी माझ्या इच्छेनुसार जगलो तर लोकांना काय वाटेल? मी मनासारखं वागलो तर लोक काय विचार करतील? असा विचार करूनच आजकाल बहुतांशी माणसं लोकांच्या अपेक्षानुसार जगत आहेत. याचाच अर्थ जीवन आपण जगत आहोत परंतु त्या जगण्याला काहीच अर्थ नाही. मी जे जीवन जगतो आहे तो मी नाही,आणि मी जगलेले जीवन माझे नाही. म्हणूनच या अशा जगण्याला अर्थ नाही. जे जीवन आपल्या स्वतःच्या संकल्पनेनुसार जगले, आपल्या विचार ध्येय आणि उद्देशाच्या निश्चितीनुसार जगले, आपल्याला वाटेल तसे मनाप्रमाणे जगत राहिले, तर ते जीवन आपले म्हणावे. आता लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्यावा. आपण आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण कराव्यात. आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी आणि मतानुसार आपल्या जीवनाची आखणी करावी. आणि त्यानुसार पुढे चालावे. लोकही पुढे जात आहेत. कोणीही थांबलेले नाही. जग चाललेले आहे. घड्याळाचे काटे थांबलेली नाहीत. आलेला क्षण मागे जात आहे. पुढचा क्षण वर्तमान होत आहे. हातातून निसटलेला क्षण भूतकाळात जात आहे. यामध्ये लोकांच्या इच्छा अपेक्षा कुठे येतात ? आणि त्यांना कुठवर महत्त्व द्यायचं ? हे आपण ठरवायचं. वाच्यता न करता स्वतःला बदला.लोकं ईर्षेने तळमळतील. जगाला मोठे उत्तर शब्दांनी नव्हे तर परिवर्तनाने द्यायचे असते. तुम्ही दूर जात नाहीत तो पर्यंत त्यांना तुमची किंमत कळत नाही. लोकांना रडून समजावून सांगू नका.ही जाणीव होऊ द्या की त्यांनी काय गमावले आहे. स्वार्थ असेल तिथे आपलेपणा शोधु नये. फक्त उपयोग पाहिला जातो तिथे प्रेम शोधु नये. उणीव आपल्या निवडीमध्ये असते. लोकं जसे असतात तसेच असतात. आता वेळ आली आहे स्वतःकडे परतण्याची. आत्मकेंद्रित होण्याची. वर्तमानातच जगून निघावे. निसटलेले क्षण परत येत नाहीत, याचा चांगला अनुभव प्रत्येकालाच आलेला आहे. म्हणून आयुष्याचा उद्देश निश्चित करावा. आपल्या ध्येयपूर्ती कडे प्रामाणिकपणे, स्व-कष्टाने चालावे. रस्त्यात येणाऱ्यांची चिंता नको, कोणाचा विचारू नको, कोणाबद्दल मनात राग,द्वेष नको. आत्मसन्मान असावा, पण अहंकार नको. असंच आपल्या उद्देशाला धरून, प्रामाणिकपणे, नैतिकतेने, धैर्याने, आत्म सन्मानानं उद्देशाकडे ध्येयाकडे जाता येतं. फक्त आपण आत्मकेंद्रीत असावे. इतरांचा सन्मान आदर असावा परंतु त्यांच्या कल्पनेचा आपल्या जीवनात विचार नको. आपल्या अपेक्षा आणि कल्पनेनुसार लोक जगत आहेत का? हे आपण पाहतच नाहीत. मात्र लोकांना काय वाटते?आपण कसे असावे? म्हणून लोकांना त्यांच्या नजरेत चांगले दिसावे म्हणून आपण एक अभिनयाचे जीवन जगत असतो. आपले स्वतःचे जीवन स्वतःच्या विचाराने आणि आपण निश्चित केलेल्या ध्येयाकरिता जगावे असेच आज या ठिकाणी व्यक्त व्हावे वाटते. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- चंद्रपूर: "पप्पा, मला का मारताय?" बापाच्या हल्ल्यातून १२ वर्षांच्या मुलाने स्वतःचा जीव वाचवला;
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
महाराष्ट्र
- "देवानं माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती... मनोज जरांगेंना दोन कोटींची डिफेंडर देणारे मालक सुभाष भोसले स्पष्टच बोलले."
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "ओव्हरटेकच्या नादात वेगाने आलेल्या टेम्पोने उडवले; शिक्रापूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
गुन्हा
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: "आरोग्यासाठी मोठा निर्णय! गुटखा, पान मसाल्यावर १ वर्षाची पूर्ण बंदी; उत्पादन अन् साठवणुकीवरही निर्बंध."
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
























Subscribe to my channel




