
Pune : मतदानाच्या दिवशी मतदार घराबाहेर पडावा, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाची पळापळ सुरू असते. मतदाराने मतदान केंद्रात येऊन मतदान केले, तरी मतदान कोणाला केले असेल, याचा अंदाज लागणे कठीण. त्यामध्येच काही बोगस मतदार येऊन मतदान करून जाण्याचे प्रकार आजही घडत असतात. पुण्यात नगरपालिका असताना मात्र चित्र वेगळे होते. मतदाराने मतदानासाठी येण्यापासून मतदान करेपर्यंत अनेक गमतीजमती घडायच्या. मतदाराने मतदान कोणाला केले, हे तर उघड-उघड समजायचे; पण बोगस मतदान होण्याला थारा नसायचा. कारण त्यावर तत्कालीन नगरपालिकेच्या प्रशासनाची भिस्त ही वसुली कारकुनावर होती. त्यामुळे बोगस मतदान हा प्रकारच होत नव्हता.
आज मतदानाच्या प्रक्रियेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला, तरीही बोगस मतदान होण्याचे प्रकार घडतच असतात. मतदाराने मतदानाला यावे, यासाठी पूर्वी आणि आताही राजकीय पक्षांची धावपळ मतदानाच्या दिवशी सुरू असते. आता आचारसंहितेच्या कडक नियमांमुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदारांना मतदान केंद्रामध्ये आणण्यासाठी उघडपणे काही करता येत नाही. मात्र, गुप्तपणे हे प्रकार सुरूच असतात.
मतदारांना मतदान केंद्रावर आणल्यावर त्याने मतदान कोणाला केले, याचा अंदाज बांधणे अवघड असते. मात्र, हमखास मत देणाऱ्या मतदारांची उमेदवार आणि त्याच्या विश्वासू साथीदारांना माहिती असते. त्यावरून प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदान झाले आणि आपापल्या हक्काच्या परिसरातील किती मतदारांनी मतदान केले, यावरून उमेदवार निकालाचा कल जाणतात. मात्र, प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी प्रत्येक मतदानाचे आकडे समोर येईपर्यंत कोणत्याही उमेदवाराच्या मनात धास्ती असते. त्यात बोगस मतदान झाले असेल, तर सर्वच गणिते बिघडतात.
|
Pune : रेल्वे स्थानकावर आता बिनधास्त खा! पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह १० स्थानके ‘ईट राइट स्टेशन’ |
सध्या बोगस मतदान रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या यंत्रणा असतानाही बोगस मतदानाचे प्रकार घडतच असतात. नामसाधर्म्य पाहून एखाद्या मतदाराच्या नावावर दुसऱ्याने मतदान करणे, मतदारसंघातील रहिवासी नसताना मतदारयादीत नाव समाविष्ट करून मतदान करणे असे प्रकार आजही घडताना दिसतात. त्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि गदारोळ होतो. निकाल जाहीर झाल्यावर सर्व काही थंडावते.
पुणे ही नगरपालिका असतानाही मतदानाच्या दिवशी अनेक गमतीजमती घडायच्या. त्या वेळी वॉर्डांची संख्या आणि मतदारांची संख्याही कमी असायची. प्रत्येक वॉर्डात एकच मतदान केंद्र तयार केले जायचे. त्यामध्ये प्रत्येक उमेदवाराच्या मतपेट्या ठेवल्या जात असत. काही उमेदवार अशिक्षित असायचे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रंगांचे वाटप करून मतपेट्यांना संबंधित रंगाचे कागद चिकटवून त्यावर उमेदवाराचे नाव लिहिण्यात येत असे. आचारसंहिता नसल्याने आणि उमेदवाराच्या खर्चावर मर्यादा नसल्याने त्या वेळी मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी टांगे वापरले जायचे. टांग्यावर पुढे आणि मागे उमेदवाराच्या नावाचा फलक लावण्यात येत असे. उमेदवाराचे कार्यकर्ते म्हणजे त्या भागातील वजनदार मंडळी असायची. मतदाराला मतपत्रिका दिल्यावर त्याची स्वाक्षरी आणि निरक्षर असल्यास अंगठा घेऊन कार्यकर्तेच मतपत्रिका उमेदवाराच्या मतपेटीमध्ये टाकत. त्यामुळे उमेदवाराला किती मतदान झाले आणि आणखी किती मतांची गरज आहे, याचा अंदाज उमेदवारांना येत असे. त्या दृष्टीने त्यांची मतदानाच्या दिवशी पळापळ सुरू असायची.
मात्र, बोगस मतदानाला वाव नसायचा. बोगस मतदानावर तत्कालीन नगरपालिकेने नामी युक्ती शोधून काढली होती. वसुली कारकुनावर सर्व भिस्त असायची. वसुली कारकून हे करवसुलीसाठी प्रत्येक घरी जायचे. त्यामुळे त्यांना प्रत्येक पेठेतील घरमालक ओळखीचे असत. वसुली कारकुनाकडून ओळख पटल्याशिवाय मतदाराला मतपत्रिका दिली जात नसे. त्यामुळे बोगस मतदान टाळले जायचे.
आता अत्याधुनिक युगात अनेक सुविधा झाल्या असताना अद्यापही पुण्यासारख्या शहरात मतदानाचे प्रमाण कमी असते. जेमतेम ५० टक्के मतदार मतदान करतात. उर्वरित मतदार उमेदवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाती लागत नाहीत. उपलब्ध असलेल्या मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे आव्हान उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे असणार आहे. बोगस मतदानाची ओरड प्रत्येक निवडणुकीत सुरूच असते. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी हे सर्व चित्र पाहायला मिळणार आहे.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला



























Subscribe to my channel




