एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्याजवळील दरे गावातून विकासाचा व्यापक दृष्टिकोन मांडला. दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी दरे गावात असताना, त्यांनी येथील कृषी, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींवर प्रकाश टाकला. दरे परिसरात आता भात, नाचणी आणि वरी या पारंपरिक पिकांव्यतिरिक्त अवाकाडो, सफरचंद, आंबा, काजू यांसारख्या विविध फळझाडांची लागवड केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थार्जन वाढणार असून, वर्षभर शेती करणे शक्य होणार आहे.

शिंदे यांनी सामूहिक आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यावर भर दिला. रासायनिक खतांचा वापर टाळून विषमुक्त भाजीपाला आणि फळांचे उत्पादन घेतले जात आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि लोकांना पौष्टिक अन्न मिळेल. प्रतापगड, वासोटा किल्ला आणि मकरंदगड यांसारख्या ऐतिहासिक स्थळांमुळे या भागाला मोठा पर्यटन वाव आहे. या पर्यटनाला चालना देण्यासाठी तीन नवीन पुलांचे बांधकाम सुरू आहे, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल आणि पर्यटकांची संख्या वाढेल. तरुणांना रोजगारानिमित्त मुंबई-ठाण्याकडे जाण्याची गरज भासू नये, हा त्यांचा उद्देश आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *