‘हिंदुस्थानीयांच्या हितासाठी’ : ही हिंदी पत्रकारितेचीआद्य-प्रतिज्ञा आहे. याच संकल्पासह 30 मे 1826 रोजीहिंदीचे पहिले वर्तमानपत्र “उदन्त मार्तण्ड’ प्रकाशित झालेहोते. युगलकिशोर शुक्ल यांना हिंदीचे पहिले संपादकहोण्याचा गौरव प्राप्त आहे. जानेवारी 1931 पर्यंत असेच मानले जात होते की हिंदीपत्रकारितेची सुरुवात 1845 मध्ये काशी येथून प्रकाशितहोणाऱ्या ‘बनारस अखबार’ पासून झाली. पण ‘मॉडर्नरिव्ह्यू’ चे सहायक संपादक ब्रजेन्द्रनाथ बंद्योपाध्याय जेव्हाभारतीय भाषांच्या पत्रकार-कलेचा इतिहास लिहीत होते,तेव्हा त्यांच्या शोध-दृष्टीस “उदन्त मार्तण्ड’ची फाइलआली. तेव्हा हे तथ्य समोर आले की हिंदीचे पहिलेवर्तमानपत्र “उदन्त मार्तण्ड’ आहे. ‘विशाल भारत’ च्या सन 1931 च्या फेब्रुवारी, मार्च,एप्रिल आणि मे या चार अंकांमध्ये ब्रजेन्द्रनाथ बंद्योपाध्याययांचे शोधनिबंध प्रकाशित झाले. त्यानुसार “उदन्तमार्तण्ड’ चा प्रवेशांक 30 मे 1826 रोजी प्रकाशित झालाहोता. 30×20 सेमी फुलस्केप आकाराच्या आठ पानांच्याया वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरांमध्ये सर्वातवर “उदन्त मार्तण्ड’ नाव असायचे. त्याच्या खाली संस्कृतमध्ये लिहिले जायचे- दिवाकान्त कान्तिं बिनाध्वान्तमन्तं नचाप्नोति तद्वज्जगत्यज्ञ लोक:। समाचार सेवामृते ज्ञत्वमाप्तुं नशक्नोति तस्मात्करोमीति यत्नं।।याचा अर्थ आहे- सूर्याच्या प्रकाशाशिवाय ज्याप्रमाणेअंधार दूर होत नाही, त्याचप्रमाणे वृत्तसेवेशिवाय अज्ञानी लोक जाणकार होऊ शकत नाहीत. म्हणूनच मी हावर्तमानपत्र प्रकाशनासारखा प्रयत्न करत आहे. अर्थात“उदन्त मार्तण्ड’ चे तात्पर्य आहे वृत्त-सूर्य. प्रवेशांकामध्ये ‘या कागदाच्या प्रकाशकाची जाहिरात’या शीर्षकाखाली वर्तमानपत्राचा उद्देश दिला गेला आहे-“हे “उदन्त मार्तण्ड’ आता पहिल्यांदाच हिंदुस्थानीयांच्याहितासाठी जे आजपर्यंत कुणी चालवले नाही पण इंग्रजीव पारशी व बंगालीमध्ये जो बातम्यांचा कागद छापलाजातो त्याचे सुख त्या भाषा जाणणाऱ्या व वाचणाऱ्यांनाचमिळते आणि सर्व लोक दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होतात.जसे दुसऱ्याच्या धनाने श्रीमंत होणे व स्वतःचे असतानादुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहणे तसेच ज्या गुणात ज्याची गतीनाही त्याला त्या रसाची चव मिळणे कठीणच आहे.’ “उदन्त मार्तण्ड’ मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांचेजेवढेही उतारे पाहायला मिळतात, त्यावरून असे समजतेकी वाचकांना कोणत्या घटना, प्रवृत्ती आणि बातम्यांचीमाहिती देणे गरजेचे आहे, याचे भान संपादकाला होते.माहिती देणे हे पत्रकारितेचे पहिले कर्तव्य आहे. दुसरेकर्तव्य म्हणजे समाजाला शिक्षित करणे आणि प्रेरितकरणे. पत्रकारितेने लोकरंजनाच्या दिशेनेही कामकरायला हवे, अशी सात्त्विक अपेक्षा केली जाते. “उदन्त मार्तण्ड’ च्या विचार-दृष्टीत भारत आणिभारतीयांच्या हिताला महत्त्वाचे स्थान होते. 7 सप्टेंबर1826 च्या अंकात ‘विलायती कपडा’ शीर्षकाखाली एकटिप्पणी लिहिली गेली आहे- “या देशात विलायतीकपड्यांची आवक कशा प्रकारे वर्षानुवर्षे वाढत गेली तेखाली लिहिलेल्या तपशिलावरूनच समजेल.’ नऊवर्षांचा तपशील देताना संपादकाने सवाल उपस्थितकेला- “जरा विचार करा कुठे दीड लाख रुपये वर्षाचाकपडा आणि कुठे साठ कोटी रुपये वार्षिक! 115 वर्षांत4,00,00,00/- प्रति शेकडा वाढ!’ 4 डिसेंबर 1827 रोजी “उदन्त मार्तण्ड’ चे प्रकाशन बंदझाले. याचे एक कारण म्हणजे इतर भाषांच्यावर्तमानपत्रांना कंपनी सरकारकडून जशी मदत मिळतहोती, तशी “उदन्त मार्तण्ड’ ला मिळाली नाही. टपालकार्यालयातून वर्तमानपत्र वितरणाची सुविधाही मिळालीनाही. “उदन्त मार्तण्ड’ ने हिंदी पत्रकारितेचा भक्कम पायारचला. गेल्या दोनशे वर्षांत हिंदी पत्रकारितेचा आशातीतविस्तार आणि विकास झाला आहे. हिंदी पत्रकारितेने दोनमोठी कामे केली. एक, देश आणि जगाच्या परिस्थिती वघडामोडींमध्ये रस घेणारा वाचकवर्ग तयार केला. दुसरे,भाषेला नवीन रूप दिले आणि स्वच्छ, सुस्पष्ट व समर्थगद्याच्या परंपरेचा विकास केला. हिंदी पत्रकारितेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे कीत्यांच्या श्रेष्ठ संपादकांमध्ये हिंदीतर भाषिक विद्वानांचेहीयोगदान आहे. मराठीचे माधवराव सप्रे, बाबूराव विष्णूपराडकर, लक्ष्मण नारायण गर्दे; बंगालीचे राजा राममोहनरॉय, केशवचंद्र सेन, अमृतलाल चक्रवर्ती; गुजरातीचेस्वामी दयानंद सरस्वती, महात्मा गांधी; कन्नडचे नारायणदत्त; तेलुगूचे बालशौरी रेड्डी इत्यादी विद्वानांची एक लांबसाखळी आहे. भारतेंदू यांना हिंदी प्रबोधनाचे अग्रदूत मानले जाते. हिंदीचाशब्दसंग्रह समृद्ध करण्यात ‘आज’ (1920, काशी) च्यासंपादकांची मोठी भूमिका आहे. हिंदी गद्याची रचना आणिशुद्धलेखनाच्या एकरूपतेसाठी ‘सरस्वती’ चे संपादकमहावीर प्रसाद द्विवेदी यांनी कठोर साधना केली. गणेशशंकर विद्यार्थी यांचे ‘प्रताप’ आणि माखनलाल चतुर्वेदीयांचे ‘कर्मवीर’ हीदेखील हिंदी पत्रकारितेची भूषणेआहेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) “उदन्त मार्तण्ड’ ने हिंदी पत्रकारितेचाभक्कम पाया रचला. गेल्या दोनशे वर्षांतहिंदी पत्रकारितेने दोन मोठी कामे केली.एक, देश आणि जगाच्या घडामोडींमध्येरस घेणारा वाचकवर्ग तयार केला. दुसरे,स्वच्छ, सुस्पष्ट आणि समर्थ गद्याच्यापरंपरेचा विकास.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



