2026 च्या सुरुवातीला मला ‘सोमनाथ स्वाभिमान पर्वात’ सहभागी होण्याचे भाग्य लाभले. सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या आक्रमणाला एक हजार वर्षे पूर्ण होऊनही, हे मंदिर शाश्वत आणि अविनाशी असल्याचे प्रतीक म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आला. आता 11 मे रोजी मला पुन्हा एकदा सोमनाथला जाण्याची सुसंधी मिळत आहे. या वेळी ही भेट पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या लोकार्पणाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जेव्हा या मंदिराचे लोकार्पण केले होते, तो ऐतिहासिक क्षण मी पुन्हा जगणार आहे. त्या दिवशी सोमनाथमध्ये विनाशाकडून निर्मितीपर्यंतचा प्रवास पुन्हा एकदा जिवंत होईल. सहा महिन्यांच्या आत सोमनाथच्या इतिहासाशी संबंधित या दोन अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांचा साक्षीदार होणे, हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. हा काळ त्या असंख्य महान विभूतींचे स्मरण करण्याचाही आहे, ज्या क्रूर आक्रमकांसमोर ताठ मानेने उभ्या राहिल्या. लकुलीश आणि सोम शर्मा यांसारख्या विभूतींनी प्रभास क्षेत्राला शैव दर्शनाचे महान केंद्र बनवले. चक्रवर्ती महाराज धारसेन चतुर्थ यांनी शतकांपूर्वी तिथे दुसरे मंदिर बांधले होते. भीम प्रथम, जयपाल आणि आनंदपाल यांसारख्या शासकांनी आक्रमणांविरुद्ध ढाल बनून मंदिराचे रक्षण केले. महान राजा भोज यांनीही या पावन स्थळाच्या पुनर्निर्माणात आपले अमूल्य योगदान दिले होते. कर्णदेव सोलंकी आणि जयसिंह सिद्धराज यांनी गुजरातची राजकीय व सांस्कृतिक शक्ती पुनरुज्जीवित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भाव बृहस्पती, कुमारपाळ सोलंकी आणि पाशुपताचार्यांनी या तीर्थाला आराधना आणि ज्ञानाचे केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यात योगदान दिले. विशालदेव वाघेला आणि त्रिपुरांतक यांनी येथील बौद्धिक व आध्यात्मिक परंपरांचे रक्षण केले. महिपाल चुडासमा आणि राव खंगार चुडासमा यांनी विध्वंसानंतर पूजाअर्चेची परंपरा पुनरुज्जीवित केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ज्यांची 300 वी जयंती साजरी केली जात आहे, त्यांनी अत्यंत कठीण काळातही भक्तीची परंपरा जिवंत ठेवली. बडोद्याच्या गायकवाडांनी भाविकांच्या अधिकारांचे रक्षण केले. यासोबतच आपली ही भूमी वीर हमीरजी गोहिल, वीर वेगडाजी भिल्ल यांसारख्या पराक्रमी वीरांनी पावन झाली आहे. 1940 च्या दशकात स्वातंत्र्याची भावना संपूर्ण भारतात पसरत होती. सरदार पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचा पाया रचला जात होता. अशा वेळी एक गोष्ट त्यांना खूप व्यथित करत होती, ती म्हणजे सोमनाथची दुरवस्था. 13 नोव्हेंबर 1947 रोजी, दिवाळीच्या मुहूर्तावर, त्यांनी सोमनाथच्या भग्नावशेषांसमोर उभे राहून, समुद्राचे पाणी हातात घेऊन संकल्प केला, ‘या गुजराती नववर्षावर आमचा निश्चय आहे की सोमनाथचे पुनर्निर्माण होईल. सौराष्ट्राच्या जनतेला यासाठी सर्वतोपरी योगदान द्यावे लागेल. हे एक पवित्र कार्य आहे, ज्यात प्रत्येकाने सहभाग घ्यावा.’ दुर्दैवाने, सरदार पटेल यांनी ज्या स्वप्नासाठी स्वतःला समर्पित केले होते, ते साकार होताना ते पाहू शकले नाहीत. जीर्णोद्धारानंतर सोमनाथ मंदिर भक्तांसाठी उघडण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. तरीही, प्रभास पाटणच्या पावन भूमीवर त्यांचा प्रभाव निरंतर जाणवत राहिला. त्यांचे व्हिजन के.एम. मुन्शी यांनी पुढे नेले, ज्यांना नवानगरच्या जामसाहेबांचे समर्थन मिळाले. 1951 मध्ये मंदिराचे पुनर्निर्माणानंतर राष्ट्रपती डॉ. प्रसाद यांना उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले. पंडित नेहरूंचा विरोध असूनही डॉ. प्रसाद तिथे गेले. ऑक्टोबर 2001 मध्ये मी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. 31 ऑक्टोबर रोजी, सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी गुजरात सरकारने सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा 50 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. याच काळात सरदार पटेल यांची 125 वी जयंतीही साजरी होत होती. या कार्यक्रमात अटलजी आणि अडवाणीजी यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवली होती. मी देशवासीयांना आवाहन करतो की, या पावन प्रसंगी पवित्र सोमनाथ धामाची यात्रा करावी आणि त्याच्या भव्यतेचे साक्षात दर्शन घ्यावे. जेव्हा तुम्ही सोमनाथच्या किनाऱ्यावर उभे राहाल, तेव्हा त्याचे प्राचीन प्रतिध्वनी तुम्हाला स्वतःमध्ये जाणवतील. तिथे तुम्हाला केवळ भक्तीचाच अनुभव येणार नाही, तर चेतनेची सशक्त स्पंदनेही ऐकू येतील. तिथे तुम्हाला भारताच्या त्या अपराजित आत्म्याचा अनुभव येईल, ज्याने प्रत्येक आघातानंतरही आपली ओळख आणि आपली संस्कृती जतन केली आहे. जेव्हा तुम्ही सोमनाथच्या किनाऱ्यावर उभे राहाल, तेव्हा त्याचे प्राचीन प्रतिध्वनी तुम्हाला स्वतःमध्ये जाणवतील. तिथे तुम्हाला केवळ भक्तीचाच अनुभव येणार नाही, तर त्या सभ्यतागत चेतनेची स्पंदनेही ऐकू येतील, ज्यांची तीव्रता कधीच कमी झालेली नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मोठी कारवाई! दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ISIच्या ९ एजंट्सना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त!
- नाशिक: ४० गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या जालवलकर बंधूंना रायगडमधून अटक
- पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींवर हल्ला; सोनारपूरमध्ये जमावाकडून अंडी आणि दगडफेक.
- चाकणमध्ये कांदा बैठकीचा राजकीय आखाडा; शेतकरी प्रश्नावरून नेत्यांत जोरदार खडाजंगी!
महाराष्ट्र
- नाशिक: ४० गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या जालवलकर बंधूंना रायगडमधून अटक
- पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींवर हल्ला; सोनारपूरमध्ये जमावाकडून अंडी आणि दगडफेक.
- चाकणमध्ये कांदा बैठकीचा राजकीय आखाडा; शेतकरी प्रश्नावरून नेत्यांत जोरदार खडाजंगी!
- कर्नाटकात सत्तासंघर्ष: डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेदरम्यान दलित आणि लिंगायत समुदायाचा उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रह.
गुन्हा
- मुंबई: तब्बल २५ वर्षे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारा केनियाचा नागरिक वाकोला पोलिसांच्या ताब्यात
- पनवेलमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेच्या तक्रारीनंतर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा बळी, वडिलांची मृत्यूशी झुंज!
- आळेफाटा: नकार देताच लिव्ह-इन पार्टनरने तरुणीवर केला ब्लेडने जीवघेणा हल्ला!
राजकीय
- कर्नाटकात सत्तासंघर्ष: डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेदरम्यान दलित आणि लिंगायत समुदायाचा उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रह.
- विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणधुमाळी; १७ पैकी १५ जागांवर एकमत, २ जागांचा तिढा लवकरच सुटणार!
- पुणे: हडपसरमध्ये आमदार रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, संतापलेल्या कार्यकर्त्यांसह दारू अड्डा केला उद्ध्वस्त!
- "२०२९ ला दिलीप मोहिते पुन्हा आमदार होतील"; वाढदिवसानिमित्त अशोक पवारांचा विश्वास, खेडच्या राजकारणात चर्चांना उधाण!
इतर
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
- आजचे राशिभविष्य (२८ मे २०२६): नवपंचम योगाचा शुभ संयोग; तूळसह 'या' राशींना होणार अचानक धनलाभ!
मनोरंजन
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
देश विदेश
- मोठी कारवाई! दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ISIच्या ९ एजंट्सना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त!
- अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा.
- डोनाल्ड ट्रम्प ऐकेना..! अमेरिकेची आणखी एका युद्धात उडी घेण्याची तयारी; समोर आला क्युबावरील 'मास्टर प्लॅन
- रशिया-तालिबानचा 'डिफेन्स' करार; पाकिस्तानच्या गोटात घबराट! अजित डोवालांच्या 'मास्टरप्लॅन'ची चर्चा.























Subscribe to my channel



