2026 च्या सुरुवातीला मला ‘सोमनाथ स्वाभिमान पर्वात’ सहभागी होण्याचे भाग्य लाभले. सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या आक्रमणाला एक हजार वर्षे पूर्ण होऊनही, हे मंदिर शाश्वत आणि अविनाशी असल्याचे प्रतीक म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आला. आता 11 मे रोजी मला पुन्हा एकदा सोमनाथला जाण्याची सुसंधी मिळत आहे. या वेळी ही भेट पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या लोकार्पणाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जेव्हा या मंदिराचे लोकार्पण केले होते, तो ऐतिहासिक क्षण मी पुन्हा जगणार आहे. त्या दिवशी सोमनाथमध्ये विनाशाकडून निर्मितीपर्यंतचा प्रवास पुन्हा एकदा जिवंत होईल. सहा महिन्यांच्या आत सोमनाथच्या इतिहासाशी संबंधित या दोन अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांचा साक्षीदार होणे, हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. हा काळ त्या असंख्य महान विभूतींचे स्मरण करण्याचाही आहे, ज्या क्रूर आक्रमकांसमोर ताठ मानेने उभ्या राहिल्या. लकुलीश आणि सोम शर्मा यांसारख्या विभूतींनी प्रभास क्षेत्राला शैव दर्शनाचे महान केंद्र बनवले. चक्रवर्ती महाराज धारसेन चतुर्थ यांनी शतकांपूर्वी तिथे दुसरे मंदिर बांधले होते. भीम प्रथम, जयपाल आणि आनंदपाल यांसारख्या शासकांनी आक्रमणांविरुद्ध ढाल बनून मंदिराचे रक्षण केले. महान राजा भोज यांनीही या पावन स्थळाच्या पुनर्निर्माणात आपले अमूल्य योगदान दिले होते. कर्णदेव सोलंकी आणि जयसिंह सिद्धराज यांनी गुजरातची राजकीय व सांस्कृतिक शक्ती पुनरुज्जीवित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भाव बृहस्पती, कुमारपाळ सोलंकी आणि पाशुपताचार्यांनी या तीर्थाला आराधना आणि ज्ञानाचे केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यात योगदान दिले. विशालदेव वाघेला आणि त्रिपुरांतक यांनी येथील बौद्धिक व आध्यात्मिक परंपरांचे रक्षण केले. महिपाल चुडासमा आणि राव खंगार चुडासमा यांनी विध्वंसानंतर पूजाअर्चेची परंपरा पुनरुज्जीवित केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ज्यांची 300 वी जयंती साजरी केली जात आहे, त्यांनी अत्यंत कठीण काळातही भक्तीची परंपरा जिवंत ठेवली. बडोद्याच्या गायकवाडांनी भाविकांच्या अधिकारांचे रक्षण केले. यासोबतच आपली ही भूमी वीर हमीरजी गोहिल, वीर वेगडाजी भिल्ल यांसारख्या पराक्रमी वीरांनी पावन झाली आहे. 1940 च्या दशकात स्वातंत्र्याची भावना संपूर्ण भारतात पसरत होती. सरदार पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचा पाया रचला जात होता. अशा वेळी एक गोष्ट त्यांना खूप व्यथित करत होती, ती म्हणजे सोमनाथची दुरवस्था. 13 नोव्हेंबर 1947 रोजी, दिवाळीच्या मुहूर्तावर, त्यांनी सोमनाथच्या भग्नावशेषांसमोर उभे राहून, समुद्राचे पाणी हातात घेऊन संकल्प केला, ‘या गुजराती नववर्षावर आमचा निश्चय आहे की सोमनाथचे पुनर्निर्माण होईल. सौराष्ट्राच्या जनतेला यासाठी सर्वतोपरी योगदान द्यावे लागेल. हे एक पवित्र कार्य आहे, ज्यात प्रत्येकाने सहभाग घ्यावा.’ दुर्दैवाने, सरदार पटेल यांनी ज्या स्वप्नासाठी स्वतःला समर्पित केले होते, ते साकार होताना ते पाहू शकले नाहीत. जीर्णोद्धारानंतर सोमनाथ मंदिर भक्तांसाठी उघडण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. तरीही, प्रभास पाटणच्या पावन भूमीवर त्यांचा प्रभाव निरंतर जाणवत राहिला. त्यांचे व्हिजन के.एम. मुन्शी यांनी पुढे नेले, ज्यांना नवानगरच्या जामसाहेबांचे समर्थन मिळाले. 1951 मध्ये मंदिराचे पुनर्निर्माणानंतर राष्ट्रपती डॉ. प्रसाद यांना उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले. पंडित नेहरूंचा विरोध असूनही डॉ. प्रसाद तिथे गेले. ऑक्टोबर 2001 मध्ये मी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. 31 ऑक्टोबर रोजी, सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी गुजरात सरकारने सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा 50 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. याच काळात सरदार पटेल यांची 125 वी जयंतीही साजरी होत होती. या कार्यक्रमात अटलजी आणि अडवाणीजी यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवली होती. मी देशवासीयांना आवाहन करतो की, या पावन प्रसंगी पवित्र सोमनाथ धामाची यात्रा करावी आणि त्याच्या भव्यतेचे साक्षात दर्शन घ्यावे. जेव्हा तुम्ही सोमनाथच्या किनाऱ्यावर उभे राहाल, तेव्हा त्याचे प्राचीन प्रतिध्वनी तुम्हाला स्वतःमध्ये जाणवतील. तिथे तुम्हाला केवळ भक्तीचाच अनुभव येणार नाही, तर चेतनेची सशक्त स्पंदनेही ऐकू येतील. तिथे तुम्हाला भारताच्या त्या अपराजित आत्म्याचा अनुभव येईल, ज्याने प्रत्येक आघातानंतरही आपली ओळख आणि आपली संस्कृती जतन केली आहे. जेव्हा तुम्ही सोमनाथच्या किनाऱ्यावर उभे राहाल, तेव्हा त्याचे प्राचीन प्रतिध्वनी तुम्हाला स्वतःमध्ये जाणवतील. तिथे तुम्हाला केवळ भक्तीचाच अनुभव येणार नाही, तर त्या सभ्यतागत चेतनेची स्पंदनेही ऐकू येतील, ज्यांची तीव्रता कधीच कमी झालेली नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- गुन्हेगारांचा आता दर आठवड्याला 'हजर' रिपोर्ट! नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा धडाकेबाज 'साप्ताहिक परेड' उपक्रम
- छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! क्रांती चौकातील ट्रॅफिक पोलिसांचा 'पैसा' घेतानाचा व्हिडिओ व्हायरल; चौकशीचे आदेश
- मुंबई: वरिष्ठांच्या कथित मानसिक त्रासामुळे शिक्षिकेने उचलले टोकाचे पाऊल; आयसीयूमध्ये उपचार सुरू
- उल्हासनगरमध्ये भीषण हिट-अँड-रन! भरधाव कारने वयोवृद्धाला चिरडले, भाजप नेत्याचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र
- गुन्हेगारांचा आता दर आठवड्याला 'हजर' रिपोर्ट! नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा धडाकेबाज 'साप्ताहिक परेड' उपक्रम
- छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! क्रांती चौकातील ट्रॅफिक पोलिसांचा 'पैसा' घेतानाचा व्हिडिओ व्हायरल; चौकशीचे आदेश
- मुंबई: वरिष्ठांच्या कथित मानसिक त्रासामुळे शिक्षिकेने उचलले टोकाचे पाऊल; आयसीयूमध्ये उपचार सुरू
- उल्हासनगरमध्ये भीषण हिट-अँड-रन! भरधाव कारने वयोवृद्धाला चिरडले, भाजप नेत्याचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
- नवी दिल्ली: रेल्वेचा नवा नियम; व्हॉट्सॲप वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट चालणार नाही, अन्यथा भरावा लागू शकतो दंड
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- जपान: अंतराळ संशोधनात जपानची ऐतिहासिक झेप; पहिल्यांदाच यशस्वीरीत्या लँड केले पुनर्वापरयोग्य रॉकेट!

























Subscribe to my channel



