2026 च्या सुरुवातीला मला ‘सोमनाथ स्वाभिमान पर्वात’ सहभागी होण्याचे भाग्य लाभले. सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या आक्रमणाला एक हजार वर्षे पूर्ण होऊनही, हे मंदिर शाश्वत आणि अविनाशी असल्याचे प्रतीक म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आला. आता 11 मे रोजी मला पुन्हा एकदा सोमनाथला जाण्याची सुसंधी मिळत आहे. या वेळी ही भेट पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या लोकार्पणाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जेव्हा या मंदिराचे लोकार्पण केले होते, तो ऐतिहासिक क्षण मी पुन्हा जगणार आहे. त्या दिवशी सोमनाथमध्ये विनाशाकडून निर्मितीपर्यंतचा प्रवास पुन्हा एकदा जिवंत होईल. सहा महिन्यांच्या आत सोमनाथच्या इतिहासाशी संबंधित या दोन अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांचा साक्षीदार होणे, हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. हा काळ त्या असंख्य महान विभूतींचे स्मरण करण्याचाही आहे, ज्या क्रूर आक्रमकांसमोर ताठ मानेने उभ्या राहिल्या. लकुलीश आणि सोम शर्मा यांसारख्या विभूतींनी प्रभास क्षेत्राला शैव दर्शनाचे महान केंद्र बनवले. चक्रवर्ती महाराज धारसेन चतुर्थ यांनी शतकांपूर्वी तिथे दुसरे मंदिर बांधले होते. भीम प्रथम, जयपाल आणि आनंदपाल यांसारख्या शासकांनी आक्रमणांविरुद्ध ढाल बनून मंदिराचे रक्षण केले. महान राजा भोज यांनीही या पावन स्थळाच्या पुनर्निर्माणात आपले अमूल्य योगदान दिले होते. कर्णदेव सोलंकी आणि जयसिंह सिद्धराज यांनी गुजरातची राजकीय व सांस्कृतिक शक्ती पुनरुज्जीवित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भाव बृहस्पती, कुमारपाळ सोलंकी आणि पाशुपताचार्यांनी या तीर्थाला आराधना आणि ज्ञानाचे केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यात योगदान दिले. विशालदेव वाघेला आणि त्रिपुरांतक यांनी येथील बौद्धिक व आध्यात्मिक परंपरांचे रक्षण केले. महिपाल चुडासमा आणि राव खंगार चुडासमा यांनी विध्वंसानंतर पूजाअर्चेची परंपरा पुनरुज्जीवित केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ज्यांची 300 वी जयंती साजरी केली जात आहे, त्यांनी अत्यंत कठीण काळातही भक्तीची परंपरा जिवंत ठेवली. बडोद्याच्या गायकवाडांनी भाविकांच्या अधिकारांचे रक्षण केले. यासोबतच आपली ही भूमी वीर हमीरजी गोहिल, वीर वेगडाजी भिल्ल यांसारख्या पराक्रमी वीरांनी पावन झाली आहे. 1940 च्या दशकात स्वातंत्र्याची भावना संपूर्ण भारतात पसरत होती. सरदार पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचा पाया रचला जात होता. अशा वेळी एक गोष्ट त्यांना खूप व्यथित करत होती, ती म्हणजे सोमनाथची दुरवस्था. 13 नोव्हेंबर 1947 रोजी, दिवाळीच्या मुहूर्तावर, त्यांनी सोमनाथच्या भग्नावशेषांसमोर उभे राहून, समुद्राचे पाणी हातात घेऊन संकल्प केला, ‘या गुजराती नववर्षावर आमचा निश्चय आहे की सोमनाथचे पुनर्निर्माण होईल. सौराष्ट्राच्या जनतेला यासाठी सर्वतोपरी योगदान द्यावे लागेल. हे एक पवित्र कार्य आहे, ज्यात प्रत्येकाने सहभाग घ्यावा.’ दुर्दैवाने, सरदार पटेल यांनी ज्या स्वप्नासाठी स्वतःला समर्पित केले होते, ते साकार होताना ते पाहू शकले नाहीत. जीर्णोद्धारानंतर सोमनाथ मंदिर भक्तांसाठी उघडण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. तरीही, प्रभास पाटणच्या पावन भूमीवर त्यांचा प्रभाव निरंतर जाणवत राहिला. त्यांचे व्हिजन के.एम. मुन्शी यांनी पुढे नेले, ज्यांना नवानगरच्या जामसाहेबांचे समर्थन मिळाले. 1951 मध्ये मंदिराचे पुनर्निर्माणानंतर राष्ट्रपती डॉ. प्रसाद यांना उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले. पंडित नेहरूंचा विरोध असूनही डॉ. प्रसाद तिथे गेले. ऑक्टोबर 2001 मध्ये मी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. 31 ऑक्टोबर रोजी, सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी गुजरात सरकारने सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा 50 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. याच काळात सरदार पटेल यांची 125 वी जयंतीही साजरी होत होती. या कार्यक्रमात अटलजी आणि अडवाणीजी यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवली होती. मी देशवासीयांना आवाहन करतो की, या पावन प्रसंगी पवित्र सोमनाथ धामाची यात्रा करावी आणि त्याच्या भव्यतेचे साक्षात दर्शन घ्यावे. जेव्हा तुम्ही सोमनाथच्या किनाऱ्यावर उभे राहाल, तेव्हा त्याचे प्राचीन प्रतिध्वनी तुम्हाला स्वतःमध्ये जाणवतील. तिथे तुम्हाला केवळ भक्तीचाच अनुभव येणार नाही, तर चेतनेची सशक्त स्पंदनेही ऐकू येतील. तिथे तुम्हाला भारताच्या त्या अपराजित आत्म्याचा अनुभव येईल, ज्याने प्रत्येक आघातानंतरही आपली ओळख आणि आपली संस्कृती जतन केली आहे. जेव्हा तुम्ही सोमनाथच्या किनाऱ्यावर उभे राहाल, तेव्हा त्याचे प्राचीन प्रतिध्वनी तुम्हाला स्वतःमध्ये जाणवतील. तिथे तुम्हाला केवळ भक्तीचाच अनुभव येणार नाही, तर त्या सभ्यतागत चेतनेची स्पंदनेही ऐकू येतील, ज्यांची तीव्रता कधीच कमी झालेली नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

