2026 च्या सुरुवातीला मला ‘सोमनाथ स्वाभिमान पर्वात’ सहभागी होण्याचे भाग्य लाभले. सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या आक्रमणाला एक हजार वर्षे पूर्ण होऊनही, हे मंदिर शाश्वत आणि अविनाशी असल्याचे प्रतीक म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आला. आता 11 मे रोजी मला पुन्हा एकदा सोमनाथला जाण्याची सुसंधी मिळत आहे. या वेळी ही भेट पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या लोकार्पणाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जेव्हा या मंदिराचे लोकार्पण केले होते, तो ऐतिहासिक क्षण मी पुन्हा जगणार आहे. त्या दिवशी सोमनाथमध्ये विनाशाकडून निर्मितीपर्यंतचा प्रवास पुन्हा एकदा जिवंत होईल. सहा महिन्यांच्या आत सोमनाथच्या इतिहासाशी संबंधित या दोन अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांचा साक्षीदार होणे, हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. हा काळ त्या असंख्य महान विभूतींचे स्मरण करण्याचाही आहे, ज्या क्रूर आक्रमकांसमोर ताठ मानेने उभ्या राहिल्या. लकुलीश आणि सोम शर्मा यांसारख्या विभूतींनी प्रभास क्षेत्राला शैव दर्शनाचे महान केंद्र बनवले. चक्रवर्ती महाराज धारसेन चतुर्थ यांनी शतकांपूर्वी तिथे दुसरे मंदिर बांधले होते. भीम प्रथम, जयपाल आणि आनंदपाल यांसारख्या शासकांनी आक्रमणांविरुद्ध ढाल बनून मंदिराचे रक्षण केले. महान राजा भोज यांनीही या पावन स्थळाच्या पुनर्निर्माणात आपले अमूल्य योगदान दिले होते. कर्णदेव सोलंकी आणि जयसिंह सिद्धराज यांनी गुजरातची राजकीय व सांस्कृतिक शक्ती पुनरुज्जीवित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भाव बृहस्पती, कुमारपाळ सोलंकी आणि पाशुपताचार्यांनी या तीर्थाला आराधना आणि ज्ञानाचे केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यात योगदान दिले. विशालदेव वाघेला आणि त्रिपुरांतक यांनी येथील बौद्धिक व आध्यात्मिक परंपरांचे रक्षण केले. महिपाल चुडासमा आणि राव खंगार चुडासमा यांनी विध्वंसानंतर पूजाअर्चेची परंपरा पुनरुज्जीवित केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ज्यांची 300 वी जयंती साजरी केली जात आहे, त्यांनी अत्यंत कठीण काळातही भक्तीची परंपरा जिवंत ठेवली. बडोद्याच्या गायकवाडांनी भाविकांच्या अधिकारांचे रक्षण केले. यासोबतच आपली ही भूमी वीर हमीरजी गोहिल, वीर वेगडाजी भिल्ल यांसारख्या पराक्रमी वीरांनी पावन झाली आहे. 1940 च्या दशकात स्वातंत्र्याची भावना संपूर्ण भारतात पसरत होती. सरदार पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचा पाया रचला जात होता. अशा वेळी एक गोष्ट त्यांना खूप व्यथित करत होती, ती म्हणजे सोमनाथची दुरवस्था. 13 नोव्हेंबर 1947 रोजी, दिवाळीच्या मुहूर्तावर, त्यांनी सोमनाथच्या भग्नावशेषांसमोर उभे राहून, समुद्राचे पाणी हातात घेऊन संकल्प केला, ‘या गुजराती नववर्षावर आमचा निश्चय आहे की सोमनाथचे पुनर्निर्माण होईल. सौराष्ट्राच्या जनतेला यासाठी सर्वतोपरी योगदान द्यावे लागेल. हे एक पवित्र कार्य आहे, ज्यात प्रत्येकाने सहभाग घ्यावा.’ दुर्दैवाने, सरदार पटेल यांनी ज्या स्वप्नासाठी स्वतःला समर्पित केले होते, ते साकार होताना ते पाहू शकले नाहीत. जीर्णोद्धारानंतर सोमनाथ मंदिर भक्तांसाठी उघडण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. तरीही, प्रभास पाटणच्या पावन भूमीवर त्यांचा प्रभाव निरंतर जाणवत राहिला. त्यांचे व्हिजन के.एम. मुन्शी यांनी पुढे नेले, ज्यांना नवानगरच्या जामसाहेबांचे समर्थन मिळाले. 1951 मध्ये मंदिराचे पुनर्निर्माणानंतर राष्ट्रपती डॉ. प्रसाद यांना उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले. पंडित नेहरूंचा विरोध असूनही डॉ. प्रसाद तिथे गेले. ऑक्टोबर 2001 मध्ये मी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. 31 ऑक्टोबर रोजी, सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी गुजरात सरकारने सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा 50 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. याच काळात सरदार पटेल यांची 125 वी जयंतीही साजरी होत होती. या कार्यक्रमात अटलजी आणि अडवाणीजी यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवली होती. मी देशवासीयांना आवाहन करतो की, या पावन प्रसंगी पवित्र सोमनाथ धामाची यात्रा करावी आणि त्याच्या भव्यतेचे साक्षात दर्शन घ्यावे. जेव्हा तुम्ही सोमनाथच्या किनाऱ्यावर उभे राहाल, तेव्हा त्याचे प्राचीन प्रतिध्वनी तुम्हाला स्वतःमध्ये जाणवतील. तिथे तुम्हाला केवळ भक्तीचाच अनुभव येणार नाही, तर चेतनेची सशक्त स्पंदनेही ऐकू येतील. तिथे तुम्हाला भारताच्या त्या अपराजित आत्म्याचा अनुभव येईल, ज्याने प्रत्येक आघातानंतरही आपली ओळख आणि आपली संस्कृती जतन केली आहे. जेव्हा तुम्ही सोमनाथच्या किनाऱ्यावर उभे राहाल, तेव्हा त्याचे प्राचीन प्रतिध्वनी तुम्हाला स्वतःमध्ये जाणवतील. तिथे तुम्हाला केवळ भक्तीचाच अनुभव येणार नाही, तर त्या सभ्यतागत चेतनेची स्पंदनेही ऐकू येतील, ज्यांची तीव्रता कधीच कमी झालेली नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



