‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या सर्वात मोठ्या धड्याचा विचार केला तर तो हल्ल्याचा अचूकपणा किंवा अंमलबजावणीचा वेग हा नसून, ती धोरणात्मक स्पष्टता आहे जी याचा आधार बनली. भारताने हे दाखवून दिले होते की, प्रभावी ठरण्यासाठी शक्तीचा वापर हा कमालवादी असणे आवश्यक नाही. अशा काळात, जेव्हा देश अनेकदा प्रदीर्घ संघर्षात गुरफटतात, तेव्हा भारताने एक वेगळा मार्ग निवडला. हा एक संयमित, सुनियोजित व दीर्घकालीन राष्ट्रीय हितांवर आधारित मार्ग होता. याच गोष्टीने भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला आकार दिला आहे. जगभरातील अलीकडील संघर्षांनी एक कठोर सत्य समोर आणले आहे. आज युद्ध सुरू करणे तर सोपे आहे, परंतु ते संपवणे अधिक कठीण झाले आहे. निर्णायक विजयाची संकल्पना सातत्याने दुर्मिळ होत चालली आहे. तंत्रज्ञानाने अनपेक्षित मार्गांनी शक्तीचे संतुलन समान पातळीवर आणले आहे. लहान किंवा तुलनेने कमी विकसित देशही आता मोठ्या महासत्तांना प्रदीर्घ संघर्षात अडकवू शकतात, जे त्यांच्या संसाधनांना आणि राजकीय इच्छाशक्तीला क्षीण करतात. परिणामी, एक अशी धोरणात्मक अस्पष्टता निर्माण होते, ज्यात खर्च अफाट असतो, साध्य मात्र मर्यादित असते आणि अंतिम स्थिती स्पष्ट नसते. अशा स्थितीत भारताचा दृष्टिकोन या जाणिवेचे प्रतिबिंब आहे की, ताकदीचा वापर केवळ शक्तिप्रदर्शनासाठी नसून व्यापक राष्ट्रीय आराखड्याच्या अंतर्गत विशिष्ट आणि मर्यादित उद्दिष्टे गाठण्यासाठी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे याच तर्काचे प्रतीक होते. कुणाचा भूगोल बदलणे किंवा टोकाची उद्दिष्टे गाठणे हा त्याचा उद्देश नव्हता तर धोरणात्मक स्थिरता राखून एक स्पष्ट आणि विश्वासार्ह संदेश देणे हा त्याचा हेतू होता. असे करून भारताने त्या तत्त्वाला पुन्हा प्रस्थापित केले, जे समकालीन भू-राजकारणात सातत्याने दुर्मिळ होत चालले आहे. आणि ते म्हणजे शक्तीचा शिस्तबद्ध वापर. या शिस्तीला अनेकदा संयम म्हणून चुकीचे समजले जाते. वास्तवत: हा आत्मविश्वासातून आलेला संयम आहे. भारताच्या नेतृत्वाने हे सिद्ध केले की, त्यांच्याकडे केवळ प्रहार करण्याची क्षमता व इच्छाशक्तीच नाही, तर उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर थांबण्याचा विवेकही आहे. आक्रमकता आणि संयम यांच्यातील हा समतोल सहजासहजी साधता येत नाही. त्यासाठी राजकीय उद्दिष्टांची स्पष्टता, व्यावसायिक लष्करी क्षमता व परिणामांना महत्त्व देणारी संस्थात्मक संस्कृती आवश्यक असते. तसेच भारताचा दृष्टिकोन आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अढळ वचनबद्धतेवर आधारित आहे. जीवांचे रक्षण आणि सुरक्षिततेचे आश्वासन हे सर्वोपरी राहिले आहे. या गरजेची पूर्तता दीर्घकालीन राष्ट्रीय हितांपासून वेगळी राहून केली जात नाही, तर तिला एका व्यापक धोरणात्मक दृष्टीमध्ये सामावून घेतले गेले आहे. ही अशी दृष्टी आहे, जी मान्य करते की शाश्वत सुरक्षा ही आर्थिक विकास, सामाजिक स्थिरता आणि जागतिक विश्वासार्हतेपासून वेगळी नाही. या दृष्टिकोनातील काही इतर प्रमुख घटक विशेषत्वाने उल्लेखनीय आहेत. जसे की उद्दिष्टांची स्पष्टता, ज्यामध्ये शक्तीचा वापर परिभाषित आणि साध्य करण्यायोग्य परिणामांसाठी केला जातो- अनिश्चित ध्येयांसाठी नाही. नियंत्रित तीव्रता वाढवणे, ज्यामध्ये निर्णायक कारवाईची क्षमता असते. साधनांचा समन्वय, ज्याअंतर्गत राजकीय, लष्करी, राजनैतिक आणि माहितीविषयक साधने एकमेकांशी सुसंवाद राखून कार्य करतात आणि दीर्घकालीन हितसंबंधांची प्रधानता, ज्यामध्ये तात्कालिक प्रतिक्रिया राष्ट्रीय हिताशी सुसंगत असतात. ही चौकट भारताच्या व्यापक आकांक्षांशी खोलवर जोडलेली आहे. एक विकसित आणि समृद्ध राष्ट्राची संकल्पना निरंतर आर्थिक गतीची मागणी करते. व्यापक संघर्ष त्या परिस्थितींमध्ये अडथळा आणतात, ज्या विकास शक्य बनवतात: गुंतवणूकदारांचा विश्वास, पायाभूत सुविधांचा विकास आणि सामाजिक ऐक्य. म्हणूनच भारताचा धोरणात्मक संयम ही त्याची मर्यादा नसून, ती त्याची काळजीपूर्वक निवडलेली प्राथमिकता आहे. हे या समजालाही दर्शवते की राष्ट्रीय शक्तीचा मापदंड केवळ लष्करी क्षमताच नाही, तर आर्थिक सुदृढतेमध्येही दडलेला आहे. अशा काळात, जेव्हा देश अनेकदा दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षात अडकतात, तेव्हा भारताने एक वेगळा मार्ग निवडला. हा मार्ग संयमित, सुनियोजित आणि दीर्घकालीन राष्ट्रीय हितांवर आधारित होता. याच मार्गाने भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला आकार दिला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपुर: लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करून दोन कुख्यात तस्करांना अटक, साथीदाराचा शोध सुरू
- पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा हा मागील सरकारच्या काळातलाच सर्वात मोठा स्कॅम, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार
- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करून ४,७०८ क्युसेक केला; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा जमा, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- पुणे: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या दोन बनावट अटेंडंटना मुख्य तिकीट निरीक्षकांनी रंगेहाथ पकडले ; पुणे रेल्वे स्थानकावरील घटना
महाराष्ट्र
- पुणे: राज्यात आरोग्य चिंतेत वाढ: डेंग्यूचे ३,७६२ तर हिवतापाचे २,०३६ रुग्ण नोंदवले, साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
- ठाणे: किरकोळ कारणावरून लिव्ह-इन पार्टनरच्या ७ वर्षांच्या चिमुरड्याची काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या
- नागपुर: लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करून दोन कुख्यात तस्करांना अटक, साथीदाराचा शोध सुरू
- पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा हा मागील सरकारच्या काळातलाच सर्वात मोठा स्कॅम, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
- छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

🚩 श्री महाकालेश्वर मंदिरात पार पडली दिव्य भस्म आरती #PuneNews #Mahakal #Ujjain #BhasmaAarti #HarHar
"शिक्षणासाठी आलो, गुन्हेगार नाही!" #JantarMantar #StudentProtest #Delhi #Education #BreakingNews
🚨 दिल्लीत आंदोलनादरम्यान हिंसाचार; पोलिसांच्या PCR व्हॅनची तोडफोड #Delhi #Protest #JanpathMetro
देश विदेश
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
- उत्तर प्रदेशातील: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीला विषारी सापाकडून विसकावून संपवले; मेरठमधील हत्येचे भयानक सत्य उघड
- दिल्लीतील student protest चे पुणे कनेक्शन! 'कॉकरोच जनता पार्टी'चा शनिवारवाड्यातून आक्रमक मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अन् वाहतुकीत बदल"
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत



























Subscribe to my channel



