‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या सर्वात मोठ्या धड्याचा विचार केला तर तो हल्ल्याचा अचूकपणा किंवा अंमलबजावणीचा वेग हा नसून, ती धोरणात्मक स्पष्टता आहे जी याचा आधार बनली. भारताने हे दाखवून दिले होते की, प्रभावी ठरण्यासाठी शक्तीचा वापर हा कमालवादी असणे आवश्यक नाही. अशा काळात, जेव्हा देश अनेकदा प्रदीर्घ संघर्षात गुरफटतात, तेव्हा भारताने एक वेगळा मार्ग निवडला. हा एक संयमित, सुनियोजित व दीर्घकालीन राष्ट्रीय हितांवर आधारित मार्ग होता. याच गोष्टीने भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला आकार दिला आहे. जगभरातील अलीकडील संघर्षांनी एक कठोर सत्य समोर आणले आहे. आज युद्ध सुरू करणे तर सोपे आहे, परंतु ते संपवणे अधिक कठीण झाले आहे. निर्णायक विजयाची संकल्पना सातत्याने दुर्मिळ होत चालली आहे. तंत्रज्ञानाने अनपेक्षित मार्गांनी शक्तीचे संतुलन समान पातळीवर आणले आहे. लहान किंवा तुलनेने कमी विकसित देशही आता मोठ्या महासत्तांना प्रदीर्घ संघर्षात अडकवू शकतात, जे त्यांच्या संसाधनांना आणि राजकीय इच्छाशक्तीला क्षीण करतात. परिणामी, एक अशी धोरणात्मक अस्पष्टता निर्माण होते, ज्यात खर्च अफाट असतो, साध्य मात्र मर्यादित असते आणि अंतिम स्थिती स्पष्ट नसते. अशा स्थितीत भारताचा दृष्टिकोन या जाणिवेचे प्रतिबिंब आहे की, ताकदीचा वापर केवळ शक्तिप्रदर्शनासाठी नसून व्यापक राष्ट्रीय आराखड्याच्या अंतर्गत विशिष्ट आणि मर्यादित उद्दिष्टे गाठण्यासाठी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे याच तर्काचे प्रतीक होते. कुणाचा भूगोल बदलणे किंवा टोकाची उद्दिष्टे गाठणे हा त्याचा उद्देश नव्हता तर धोरणात्मक स्थिरता राखून एक स्पष्ट आणि विश्वासार्ह संदेश देणे हा त्याचा हेतू होता. असे करून भारताने त्या तत्त्वाला पुन्हा प्रस्थापित केले, जे समकालीन भू-राजकारणात सातत्याने दुर्मिळ होत चालले आहे. आणि ते म्हणजे शक्तीचा शिस्तबद्ध वापर. या शिस्तीला अनेकदा संयम म्हणून चुकीचे समजले जाते. वास्तवत: हा आत्मविश्वासातून आलेला संयम आहे. भारताच्या नेतृत्वाने हे सिद्ध केले की, त्यांच्याकडे केवळ प्रहार करण्याची क्षमता व इच्छाशक्तीच नाही, तर उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर थांबण्याचा विवेकही आहे. आक्रमकता आणि संयम यांच्यातील हा समतोल सहजासहजी साधता येत नाही. त्यासाठी राजकीय उद्दिष्टांची स्पष्टता, व्यावसायिक लष्करी क्षमता व परिणामांना महत्त्व देणारी संस्थात्मक संस्कृती आवश्यक असते. तसेच भारताचा दृष्टिकोन आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अढळ वचनबद्धतेवर आधारित आहे. जीवांचे रक्षण आणि सुरक्षिततेचे आश्वासन हे सर्वोपरी राहिले आहे. या गरजेची पूर्तता दीर्घकालीन राष्ट्रीय हितांपासून वेगळी राहून केली जात नाही, तर तिला एका व्यापक धोरणात्मक दृष्टीमध्ये सामावून घेतले गेले आहे. ही अशी दृष्टी आहे, जी मान्य करते की शाश्वत सुरक्षा ही आर्थिक विकास, सामाजिक स्थिरता आणि जागतिक विश्वासार्हतेपासून वेगळी नाही. या दृष्टिकोनातील काही इतर प्रमुख घटक विशेषत्वाने उल्लेखनीय आहेत. जसे की उद्दिष्टांची स्पष्टता, ज्यामध्ये शक्तीचा वापर परिभाषित आणि साध्य करण्यायोग्य परिणामांसाठी केला जातो- अनिश्चित ध्येयांसाठी नाही. नियंत्रित तीव्रता वाढवणे, ज्यामध्ये निर्णायक कारवाईची क्षमता असते. साधनांचा समन्वय, ज्याअंतर्गत राजकीय, लष्करी, राजनैतिक आणि माहितीविषयक साधने एकमेकांशी सुसंवाद राखून कार्य करतात आणि दीर्घकालीन हितसंबंधांची प्रधानता, ज्यामध्ये तात्कालिक प्रतिक्रिया राष्ट्रीय हिताशी सुसंगत असतात. ही चौकट भारताच्या व्यापक आकांक्षांशी खोलवर जोडलेली आहे. एक विकसित आणि समृद्ध राष्ट्राची संकल्पना निरंतर आर्थिक गतीची मागणी करते. व्यापक संघर्ष त्या परिस्थितींमध्ये अडथळा आणतात, ज्या विकास शक्य बनवतात: गुंतवणूकदारांचा विश्वास, पायाभूत सुविधांचा विकास आणि सामाजिक ऐक्य. म्हणूनच भारताचा धोरणात्मक संयम ही त्याची मर्यादा नसून, ती त्याची काळजीपूर्वक निवडलेली प्राथमिकता आहे. हे या समजालाही दर्शवते की राष्ट्रीय शक्तीचा मापदंड केवळ लष्करी क्षमताच नाही, तर आर्थिक सुदृढतेमध्येही दडलेला आहे. अशा काळात, जेव्हा देश अनेकदा दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षात अडकतात, तेव्हा भारताने एक वेगळा मार्ग निवडला. हा मार्ग संयमित, सुनियोजित आणि दीर्घकालीन राष्ट्रीय हितांवर आधारित होता. याच मार्गाने भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला आकार दिला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




