‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या सर्वात मोठ्या धड्याचा विचार केला तर तो हल्ल्याचा अचूकपणा किंवा अंमलबजावणीचा वेग हा नसून, ती धोरणात्मक स्पष्टता आहे जी याचा आधार बनली. भारताने हे दाखवून दिले होते की, प्रभावी ठरण्यासाठी शक्तीचा वापर हा कमालवादी असणे आवश्यक नाही. अशा काळात, जेव्हा देश अनेकदा प्रदीर्घ संघर्षात गुरफटतात, तेव्हा भारताने एक वेगळा मार्ग निवडला. हा एक संयमित, सुनियोजित व दीर्घकालीन राष्ट्रीय हितांवर आधारित मार्ग होता. याच गोष्टीने भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला आकार दिला आहे. जगभरातील अलीकडील संघर्षांनी एक कठोर सत्य समोर आणले आहे. आज युद्ध सुरू करणे तर सोपे आहे, परंतु ते संपवणे अधिक कठीण झाले आहे. निर्णायक विजयाची संकल्पना सातत्याने दुर्मिळ होत चालली आहे. तंत्रज्ञानाने अनपेक्षित मार्गांनी शक्तीचे संतुलन समान पातळीवर आणले आहे. लहान किंवा तुलनेने कमी विकसित देशही आता मोठ्या महासत्तांना प्रदीर्घ संघर्षात अडकवू शकतात, जे त्यांच्या संसाधनांना आणि राजकीय इच्छाशक्तीला क्षीण करतात. परिणामी, एक अशी धोरणात्मक अस्पष्टता निर्माण होते, ज्यात खर्च अफाट असतो, साध्य मात्र मर्यादित असते आणि अंतिम स्थिती स्पष्ट नसते. अशा स्थितीत भारताचा दृष्टिकोन या जाणिवेचे प्रतिबिंब आहे की, ताकदीचा वापर केवळ शक्तिप्रदर्शनासाठी नसून व्यापक राष्ट्रीय आराखड्याच्या अंतर्गत विशिष्ट आणि मर्यादित उद्दिष्टे गाठण्यासाठी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे याच तर्काचे प्रतीक होते. कुणाचा भूगोल बदलणे किंवा टोकाची उद्दिष्टे गाठणे हा त्याचा उद्देश नव्हता तर धोरणात्मक स्थिरता राखून एक स्पष्ट आणि विश्वासार्ह संदेश देणे हा त्याचा हेतू होता. असे करून भारताने त्या तत्त्वाला पुन्हा प्रस्थापित केले, जे समकालीन भू-राजकारणात सातत्याने दुर्मिळ होत चालले आहे. आणि ते म्हणजे शक्तीचा शिस्तबद्ध वापर. या शिस्तीला अनेकदा संयम म्हणून चुकीचे समजले जाते. वास्तवत: हा आत्मविश्वासातून आलेला संयम आहे. भारताच्या नेतृत्वाने हे सिद्ध केले की, त्यांच्याकडे केवळ प्रहार करण्याची क्षमता व इच्छाशक्तीच नाही, तर उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर थांबण्याचा विवेकही आहे. आक्रमकता आणि संयम यांच्यातील हा समतोल सहजासहजी साधता येत नाही. त्यासाठी राजकीय उद्दिष्टांची स्पष्टता, व्यावसायिक लष्करी क्षमता व परिणामांना महत्त्व देणारी संस्थात्मक संस्कृती आवश्यक असते. तसेच भारताचा दृष्टिकोन आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अढळ वचनबद्धतेवर आधारित आहे. जीवांचे रक्षण आणि सुरक्षिततेचे आश्वासन हे सर्वोपरी राहिले आहे. या गरजेची पूर्तता दीर्घकालीन राष्ट्रीय हितांपासून वेगळी राहून केली जात नाही, तर तिला एका व्यापक धोरणात्मक दृष्टीमध्ये सामावून घेतले गेले आहे. ही अशी दृष्टी आहे, जी मान्य करते की शाश्वत सुरक्षा ही आर्थिक विकास, सामाजिक स्थिरता आणि जागतिक विश्वासार्हतेपासून वेगळी नाही. या दृष्टिकोनातील काही इतर प्रमुख घटक विशेषत्वाने उल्लेखनीय आहेत. जसे की उद्दिष्टांची स्पष्टता, ज्यामध्ये शक्तीचा वापर परिभाषित आणि साध्य करण्यायोग्य परिणामांसाठी केला जातो- अनिश्चित ध्येयांसाठी नाही. नियंत्रित तीव्रता वाढवणे, ज्यामध्ये निर्णायक कारवाईची क्षमता असते. साधनांचा समन्वय, ज्याअंतर्गत राजकीय, लष्करी, राजनैतिक आणि माहितीविषयक साधने एकमेकांशी सुसंवाद राखून कार्य करतात आणि दीर्घकालीन हितसंबंधांची प्रधानता, ज्यामध्ये तात्कालिक प्रतिक्रिया राष्ट्रीय हिताशी सुसंगत असतात. ही चौकट भारताच्या व्यापक आकांक्षांशी खोलवर जोडलेली आहे. एक विकसित आणि समृद्ध राष्ट्राची संकल्पना निरंतर आर्थिक गतीची मागणी करते. व्यापक संघर्ष त्या परिस्थितींमध्ये अडथळा आणतात, ज्या विकास शक्य बनवतात: गुंतवणूकदारांचा विश्वास, पायाभूत सुविधांचा विकास आणि सामाजिक ऐक्य. म्हणूनच भारताचा धोरणात्मक संयम ही त्याची मर्यादा नसून, ती त्याची काळजीपूर्वक निवडलेली प्राथमिकता आहे. हे या समजालाही दर्शवते की राष्ट्रीय शक्तीचा मापदंड केवळ लष्करी क्षमताच नाही, तर आर्थिक सुदृढतेमध्येही दडलेला आहे. अशा काळात, जेव्हा देश अनेकदा दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षात अडकतात, तेव्हा भारताने एक वेगळा मार्ग निवडला. हा मार्ग संयमित, सुनियोजित आणि दीर्घकालीन राष्ट्रीय हितांवर आधारित होता. याच मार्गाने भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला आकार दिला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- कर्ज बुडवणाऱ्यांना आरबीआयचा मोठा झटका! मालमत्ता जप्तीसाठी नवे कडक नियम; बँकांना पारदर्शकतेचे आदेश!
- कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक! रिझर्व्ह बँकेचा नागरिकांना मोलाचा इशारा; 'या' जाहिरातींपासून सावध राहा!
- बाप की कसाई? पुण्यात पोटच्या दोन चिमुरड्यांवर वडिलांचा जीवघेणा हल्ला; नराधम बापाला बेड्या!
- पुण्यात खाकीला फुटला लाचेचा फुटला घाम! दीड लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात!
महाराष्ट्र
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! सोसाट्याचा वारा आणि पावसाने हेलिकॉप्टरची थरारक कसरत!
- कर्ज बुडवणाऱ्यांना आरबीआयचा मोठा झटका! मालमत्ता जप्तीसाठी नवे कडक नियम; बँकांना पारदर्शकतेचे आदेश!
- कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक! रिझर्व्ह बँकेचा नागरिकांना मोलाचा इशारा; 'या' जाहिरातींपासून सावध राहा!
- बाप की कसाई? पुण्यात पोटच्या दोन चिमुरड्यांवर वडिलांचा जीवघेणा हल्ला; नराधम बापाला बेड्या!
गुन्हा
- बाप की कसाई? पुण्यात पोटच्या दोन चिमुरड्यांवर वडिलांचा जीवघेणा हल्ला; नराधम बापाला बेड्या!
- पुण्यात खाकीला फुटला लाचेचा फुटला घाम! दीड लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात!
- विश्वासघाताचा कळस! उल्हासनगर किडनी रॅकेट प्रकरणात फॅमिली डॉक्टरला बेड्या; संपूर्ण शहरात खळबळ!
- पुण्यात प्रेमाचा रक्तरंजित शेवट! राहत्या घरात घुसून प्रियकराचा प्रेयसीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला; तरुणीची प्रकृती चिंताजनक!
राजकीय
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
- बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झालाच नाही"; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर 'दहशतवादा'चा आरोप, नितीश कुमारांवरही डागली तोफ
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- लंडन: प्रख्यात गुंतवणूक बँक जे.पी. मॉर्गन (J.P. Morgan) मधील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याविरुद्ध एका ज्युनिअर कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी सुरू असून कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार





















Subscribe to my channel




