कॅरीबॅग (प्लास्टिक पिशव्या) वापराचे पर्यावरणावर आणि जीवसृष्टीवर मोठे दुष्परिणाम होतात. निसर्गाची न भरून येणारी हानी होते. आज मनुष्याची जीवनशैली अत्यंत सुविधावादी अशी बनलेली आहे. आधुनिकता, प्रगती आणि प्रतिस्पर्धा यातून जाताना मनुष्य जीवसृष्टीवर होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार करताना दिसत नाही. सबंध सृष्टीमध्ये आणि जीवसृष्टीमध्ये मनुष्य मात्र स्वतःचे जीवन कसे अधिक सोयीचे होईल हाच विचार करतो. हा मनुष्याचा निव्वळ स्वार्थ असाच म्हणावा लागेल. आजच्या आधुनिक युगात प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. भाजीपाला खरेदी करण्यापासून ते किराणा सामानापर्यंत सर्व गोष्टींसाठी आपण सर्रास कॅरीबॅगचा (प्लास्टिक पिशव्या) वापर करतो. वापरण्यास सोप्या आणि स्वस्त असल्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर प्रचंड वाढला आहे. परंतु, या सोयीच्या बदल्यात आपण निसर्गाला आणि स्वतःच्या आरोग्याला खूप मोठी किंमत मोजावी लागत. त्वचेचे आजार आणि पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. विघटना न होणारे प्लास्टिक म्हणजेच त्याला भस्मासुर अशीच उपमा द्यावी लागेल.हा प्लास्टिक भस्मासुर रोखण्यासाठी आपल्याला गंभीर पावले उचलणे गरजेचे आहे.कॅरीबॅगऐवजी कापडी, कागदी किंवा ज्यूटच्या पिशव्यांचा वापर करावा.बाजारपेठेत जाताना नेहमी स्वतःची कापडी पिशवी सोबत ठेवावी.प्लास्टिक बंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कॅरीबॅगचा वापर निसर्गाचे शेकडो वर्षे नुकसान करतो. 'प्लास्टिकमुक्त पृथ्वी' हे आपले ध्येय असले पाहिजे. पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व्यापल्यामुळे भूमीची उपजाऊ क्षमता त्या जागी कमी अथवा नष्ट झाली आहे. येणाऱ्या पिढीसाठी एक स्वच्छ आणि हरित वसुंधरा सोडायची असेल, तर आजच आणि आत्ताच कॅरीबॅगला 'नाही' म्हणणे ही काळाची गरज आहे. आणि हे प्रत्येक मानवाचे ते कर्तव्य आहे. कॅरीबॅग वर बंदी तरी वापर प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी (Plastic Ban) असूनही त्यांचा वापर सुरू असण्यामागे अनेक कारणे आहेत. १ जुलै २०२२ पासून भारतात एकदाच वापरल्या जाणाऱ्या (Single-use) प्लास्टिकवर पूर्ण बंदी आहे.कॅरीबॅगचा वापर सुरू राहण्याची प्रमुख कारणे: विक्रेत्यांची सोय : भाजीपाला विक्रेते, छोटे व्यापारी आणि फळविक्रेते अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. प्रशासकीय शिथिलता : सुरुवातीला कडक कारवाई होत होती, पण आता अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई थंडावली आहे. स्वस्त पर्याय: कापडी किंवा कागदी पिशव्यांपेक्षा प्लास्टिक पिशव्या स्वस्त आणि ग्राहकांसाठी सोयीस्कर आहेत. जागरूकतेचा अभाव : नागरिक अजूनही पूर्णपणे कापडी पिशव्या वापरण्यास तयार नाहीत. पुरवठा साखळी : बंदी असूनही प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन आणि विक्री छुप्या मार्गाने सुरू आहे. नियमांनुसार कायदेशीर स्थिती: १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगवर पूर्ण बंदी आहे. ६० GSM पेक्षा कमी नॉन-वोवन प्लास्टिक पिशव्यांवरही बंदी आहे. बंदीचे उल्लंघन केल्यास ५,००० रुपयांपर्यंत दंड आणि कारवाईची तरतूद आहे. पर्यावरण रक्षणासाठी या बंदीची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. प्लास्टिक कॅरीबॅग (Carry bags) वापरण्याचे आरोग्य आणि पर्यावरणावर अत्यंत गंभीर दुष्परिणाम होतात. हे प्लास्टिक विघटनशील (non-biodegradable) नसल्यामुळे शतकानुशतके पर्यावरणात राहते. कॅरीबॅग वापराचे प्रमुख दुष्परिणाम: १: आरोग्यावर गंभीर परिणाम: कर्करोगाचा धोका: प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये विषारी रसायने (उदा. बिस्फेनॉल ए) असतात, जी अन्नपदार्थात मिसळून कर्करोग (Cancer) आणि हार्मोनल असंतुलनासारखे गंभीर आजार होऊ शकतात. मायक्रोप्लास्टिक: प्लास्टिक चॉपिंग बोर्ड किंवा गरम अन्नामुळे सूक्ष्म प्लास्टिकचे कण (Microplastics) शरीरात जातात, जे पचनसंस्था खराब करू शकतात.काळे प्लास्टिक धोकादायक: काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये किंवा बॉक्समध्ये गरम अन्न ठेवल्यास ते अन्नामध्ये मिसळून विषारी ठरू शकते. २: पर्यावरणीय नुकसान: जलप्रदूषण आणि पूर: प्लास्टिक पिशव्या नदी, नाले आणि गटारांमध्ये अडकून जलवाहिन्या रोखतात, ज्यामुळे शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.जमिनीची सुपीकता कमी: जमिनीत प्लास्टिक गाडले गेल्याने मातीची सुपीकता नष्ट होते आणि पाणी मुरण्याची क्षमता कमी होते.हवा प्रदूषण: प्लास्टिक जाळल्याने डायोक्सिनसारखे विषारी वायू बाहेर पडतात, ज्यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात. ३: जीवसृष्टीला धोका: रस्त्यावर पडलेले प्लास्टिक खाल्ल्याने गाई-गुरांसारख्या प्राण्यांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होतो. समुद्रात मिसळलेले प्लास्टिक मासे आणि इतर सागरी जीवांच्या जीवाला धोका निर्माण करते. नद्यांमधील प्लास्टिक जलवाहिन्या रोखू शकते आणि शुद्ध पाण्याचे स्रोत प्रदूषित करू शकते. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू बाहेर पडतात ज्यामुळे आजार होऊ शकतो. लँडफिलमधील प्लॅस्टिक कचरा कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनसह इतर हरितगृह वायू सोडतो, जे हवामान संकटात योगदान देतात. प्लॅस्टिकचा बराचसा कचरा समुद्रात जातो. सागरी जीवनासाठी सर्वात मोठा धोका. प्लास्टिक प्रदूषण सागरी जीवनासाठी धोका आहेच. मासेमारीची जाळी, प्लास्टिक पिशव्या आणि सिक्स-पॅक रिंग यांसारख्या मोठ्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्री कासव, डॉल्फिन, व्हेल आणि पक्षी यांसारख्या सागरी प्राण्यांना अडकतात, ज्यामुळे जखमा, गुदमरणे आणि मृत्यू होतो. अयोग्य व्यवस्थापन :
प्लास्टिक प्रदूषण प्रामुख्याने कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनातून उद्भवते, ज्यामध्ये पॅकेजिंग, बाटल्या आणि पिशव्या यांसारख्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचा समावेश होतो. खराब कचरा संकलन प्रणाली आणि कचरा टाकणे यांमुळे नैसर्गिक वातावरणात प्लास्टिकचा संचय होण्यास मोठ्या प्रमाणात हातभार लागतो. तुमच्या शरीरात प्लास्टिक असण्याची लक्षणे कोणती आहेत? मायक्रोप्लास्टिकमुळे आतड्यांमधील मायक्रोबायोममध्ये बदल होऊ शकतात, ज्यामुळे फायदेशीर आणि हानिकारक जीवाणूंमध्ये असंतुलन निर्माण होते, आणि यामुळे पोटदुखी, पोट फुगणे आणि शौचाच्या सवयींमध्ये बदल यांसारखी विविध पचनसंस्थेची लक्षणे उद्भवू शकतात. विनंती संबंध पृथ्वी निसर्ग आणि जीवसृष्टीतील सर्व घटकांचा महाविनाश करणाऱ्या या कॅरीबॅगच्या भस्मासुराला कायमचा निरोप देण्याची वेळ आलेली आहे. म्हणून प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे की आपण आपले आयुष्य जगत असताना पृथ्वीचा, निसर्गाचा, पर्यावरणाचा आणि सबंध जीवसृष्टीचा आपल्या हातून विनाश होऊ नये अशीच जीवनशैली अवलंब करावी. प्लास्टिकच्या कॅरीबॅग ऐवजी कापडी पिशव्या कागदी बॅग, ज्यूट पिशव्या वापराव्यात. आणि पूर्वीच्या काळी प्लास्टिक नव्हते त्यावेळी ही मानवाचे जीवन सुरळीत चालू होतेच, उलट हे प्रदूषण नव्हते. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
महाराष्ट्र
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel





https://shorturl.fm/NboiC
https://shorturl.fm/NVTGt
https://shorturl.fm/8oD2b
https://shorturl.fm/xi1YA