कॅरीबॅग (प्लास्टिक पिशव्या) वापराचे पर्यावरणावर आणि जीवसृष्टीवर मोठे दुष्परिणाम होतात. निसर्गाची न भरून येणारी हानी होते. आज मनुष्याची जीवनशैली अत्यंत सुविधावादी अशी बनलेली आहे. आधुनिकता, प्रगती आणि प्रतिस्पर्धा यातून जाताना मनुष्य जीवसृष्टीवर होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार करताना दिसत नाही. सबंध सृष्टीमध्ये आणि जीवसृष्टीमध्ये मनुष्य मात्र स्वतःचे जीवन कसे अधिक सोयीचे होईल हाच विचार करतो. हा मनुष्याचा निव्वळ स्वार्थ असाच म्हणावा लागेल. आजच्या आधुनिक युगात प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. भाजीपाला खरेदी करण्यापासून ते किराणा सामानापर्यंत सर्व गोष्टींसाठी आपण सर्रास कॅरीबॅगचा (प्लास्टिक पिशव्या) वापर करतो. वापरण्यास सोप्या आणि स्वस्त असल्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर प्रचंड वाढला आहे. परंतु, या सोयीच्या बदल्यात आपण निसर्गाला आणि स्वतःच्या आरोग्याला खूप मोठी किंमत मोजावी लागत. त्वचेचे आजार आणि पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. विघटना न होणारे प्लास्टिक म्हणजेच त्याला भस्मासुर अशीच उपमा द्यावी लागेल.हा प्लास्टिक भस्मासुर रोखण्यासाठी आपल्याला गंभीर पावले उचलणे गरजेचे आहे.कॅरीबॅगऐवजी कापडी, कागदी किंवा ज्यूटच्या पिशव्यांचा वापर करावा.बाजारपेठेत जाताना नेहमी स्वतःची कापडी पिशवी सोबत ठेवावी.प्लास्टिक बंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कॅरीबॅगचा वापर निसर्गाचे शेकडो वर्षे नुकसान करतो. 'प्लास्टिकमुक्त पृथ्वी' हे आपले ध्येय असले पाहिजे. पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व्यापल्यामुळे भूमीची उपजाऊ क्षमता त्या जागी कमी अथवा नष्ट झाली आहे. येणाऱ्या पिढीसाठी एक स्वच्छ आणि हरित वसुंधरा सोडायची असेल, तर आजच आणि आत्ताच कॅरीबॅगला 'नाही' म्हणणे ही काळाची गरज आहे. आणि हे प्रत्येक मानवाचे ते कर्तव्य आहे. कॅरीबॅग वर बंदी तरी वापर प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी (Plastic Ban) असूनही त्यांचा वापर सुरू असण्यामागे अनेक कारणे आहेत. १ जुलै २०२२ पासून भारतात एकदाच वापरल्या जाणाऱ्या (Single-use) प्लास्टिकवर पूर्ण बंदी आहे.कॅरीबॅगचा वापर सुरू राहण्याची प्रमुख कारणे: विक्रेत्यांची सोय : भाजीपाला विक्रेते, छोटे व्यापारी आणि फळविक्रेते अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. प्रशासकीय शिथिलता : सुरुवातीला कडक कारवाई होत होती, पण आता अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई थंडावली आहे. स्वस्त पर्याय: कापडी किंवा कागदी पिशव्यांपेक्षा प्लास्टिक पिशव्या स्वस्त आणि ग्राहकांसाठी सोयीस्कर आहेत. जागरूकतेचा अभाव : नागरिक अजूनही पूर्णपणे कापडी पिशव्या वापरण्यास तयार नाहीत. पुरवठा साखळी : बंदी असूनही प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन आणि विक्री छुप्या मार्गाने सुरू आहे. नियमांनुसार कायदेशीर स्थिती: १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगवर पूर्ण बंदी आहे. ६० GSM पेक्षा कमी नॉन-वोवन प्लास्टिक पिशव्यांवरही बंदी आहे. बंदीचे उल्लंघन केल्यास ५,००० रुपयांपर्यंत दंड आणि कारवाईची तरतूद आहे. पर्यावरण रक्षणासाठी या बंदीची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. प्लास्टिक कॅरीबॅग (Carry bags) वापरण्याचे आरोग्य आणि पर्यावरणावर अत्यंत गंभीर दुष्परिणाम होतात. हे प्लास्टिक विघटनशील (non-biodegradable) नसल्यामुळे शतकानुशतके पर्यावरणात राहते. कॅरीबॅग वापराचे प्रमुख दुष्परिणाम: १: आरोग्यावर गंभीर परिणाम: कर्करोगाचा धोका: प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये विषारी रसायने (उदा. बिस्फेनॉल ए) असतात, जी अन्नपदार्थात मिसळून कर्करोग (Cancer) आणि हार्मोनल असंतुलनासारखे गंभीर आजार होऊ शकतात. मायक्रोप्लास्टिक: प्लास्टिक चॉपिंग बोर्ड किंवा गरम अन्नामुळे सूक्ष्म प्लास्टिकचे कण (Microplastics) शरीरात जातात, जे पचनसंस्था खराब करू शकतात.काळे प्लास्टिक धोकादायक: काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये किंवा बॉक्समध्ये गरम अन्न ठेवल्यास ते अन्नामध्ये मिसळून विषारी ठरू शकते. २: पर्यावरणीय नुकसान: जलप्रदूषण आणि पूर: प्लास्टिक पिशव्या नदी, नाले आणि गटारांमध्ये अडकून जलवाहिन्या रोखतात, ज्यामुळे शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.जमिनीची सुपीकता कमी: जमिनीत प्लास्टिक गाडले गेल्याने मातीची सुपीकता नष्ट होते आणि पाणी मुरण्याची क्षमता कमी होते.हवा प्रदूषण: प्लास्टिक जाळल्याने डायोक्सिनसारखे विषारी वायू बाहेर पडतात, ज्यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात. ३: जीवसृष्टीला धोका: रस्त्यावर पडलेले प्लास्टिक खाल्ल्याने गाई-गुरांसारख्या प्राण्यांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होतो. समुद्रात मिसळलेले प्लास्टिक मासे आणि इतर सागरी जीवांच्या जीवाला धोका निर्माण करते. नद्यांमधील प्लास्टिक जलवाहिन्या रोखू शकते आणि शुद्ध पाण्याचे स्रोत प्रदूषित करू शकते. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू बाहेर पडतात ज्यामुळे आजार होऊ शकतो. लँडफिलमधील प्लॅस्टिक कचरा कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनसह इतर हरितगृह वायू सोडतो, जे हवामान संकटात योगदान देतात. प्लॅस्टिकचा बराचसा कचरा समुद्रात जातो. सागरी जीवनासाठी सर्वात मोठा धोका. प्लास्टिक प्रदूषण सागरी जीवनासाठी धोका आहेच. मासेमारीची जाळी, प्लास्टिक पिशव्या आणि सिक्स-पॅक रिंग यांसारख्या मोठ्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्री कासव, डॉल्फिन, व्हेल आणि पक्षी यांसारख्या सागरी प्राण्यांना अडकतात, ज्यामुळे जखमा, गुदमरणे आणि मृत्यू होतो. अयोग्य व्यवस्थापन :
प्लास्टिक प्रदूषण प्रामुख्याने कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनातून उद्भवते, ज्यामध्ये पॅकेजिंग, बाटल्या आणि पिशव्या यांसारख्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचा समावेश होतो. खराब कचरा संकलन प्रणाली आणि कचरा टाकणे यांमुळे नैसर्गिक वातावरणात प्लास्टिकचा संचय होण्यास मोठ्या प्रमाणात हातभार लागतो. तुमच्या शरीरात प्लास्टिक असण्याची लक्षणे कोणती आहेत? मायक्रोप्लास्टिकमुळे आतड्यांमधील मायक्रोबायोममध्ये बदल होऊ शकतात, ज्यामुळे फायदेशीर आणि हानिकारक जीवाणूंमध्ये असंतुलन निर्माण होते, आणि यामुळे पोटदुखी, पोट फुगणे आणि शौचाच्या सवयींमध्ये बदल यांसारखी विविध पचनसंस्थेची लक्षणे उद्भवू शकतात. विनंती संबंध पृथ्वी निसर्ग आणि जीवसृष्टीतील सर्व घटकांचा महाविनाश करणाऱ्या या कॅरीबॅगच्या भस्मासुराला कायमचा निरोप देण्याची वेळ आलेली आहे. म्हणून प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे की आपण आपले आयुष्य जगत असताना पृथ्वीचा, निसर्गाचा, पर्यावरणाचा आणि सबंध जीवसृष्टीचा आपल्या हातून विनाश होऊ नये अशीच जीवनशैली अवलंब करावी. प्लास्टिकच्या कॅरीबॅग ऐवजी कापडी पिशव्या कागदी बॅग, ज्यूट पिशव्या वापराव्यात. आणि पूर्वीच्या काळी प्लास्टिक नव्हते त्यावेळी ही मानवाचे जीवन सुरळीत चालू होतेच, उलट हे प्रदूषण नव्हते. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel





https://shorturl.fm/NboiC
https://shorturl.fm/NVTGt
https://shorturl.fm/8oD2b
https://shorturl.fm/xi1YA