
Mumbai Rain : ठाण्यात रविवारी रात्रीपासून ते सोमवारी संध्याकाळपर्यंत पाऊसाने दमदार हजेरी लावलीय. धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे ठाणेकरांची, चाकरमान्यांची, प्रशासनाची दाणदाण उडवून दिली. मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेला फटका बसलाय. ठाण्याहून कल्याणचा दिशेने जाणाऱ्या ट्रेन धिम्या गतीने सुरू आहेत. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. मुंबई ते पुणेपर्यंतच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे ठाण्यात डझनभर झाडे कोसळल्याची घटना घडल्यात. रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळी साडेआठ वाजता ठाण्यात २४ तासात १२७ मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. तर सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपासून ते संध्याकाळी साडे वाजेपर्यंत २५.६५ मिमी पाऊसाची नोंद करीत एकूण पाऊस हा १५० मिमी पार झाल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलीय.
|
|
रविवारी सकाळ ते सोमवारी संध्याकाळपर्यंतच्या २४ तासात पडलेल्या मुसळधार पावसाने रेल्वे सेवा ठप्प झालीय. रेल्वे मार्गात पाणी तुंबल्याने लोकल तसेच अनेक लांब पल्याच्या गाड्या खोळंबल्या. परिणामी, ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाश्यांची झुंबड उडाली. रेल्वे ठप्प झाल्याने रिक्षा - टॅक्सी तसेच खासगी वाहनांकडून प्रवाश्यांची लूट सुरू झाली.
रविवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून पावसाने ठाणे शहराला चांगलेच झोडपून काढलंय. धुवाँधार पावसामुळे ठाण्यातील रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतूक मंदावली. शहरातील विविध ठिकाणी पाणी साचल्याने वाहने चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई - अहमदाबाद रोड,मुंबई- नाशिक महामार्ग तसेच घोडबंदर रोड आणि नौपाडा, सिव्हील रुग्णालय परीसरात वाहतूक कोंडी झाली होती.
तर मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. मध्यरेल्वे मार्गावरील भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने ठाणेहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले आहे. काही काळानंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर काही अंशी रेल्वे सेवा सुरू झालीय. परंतु रेल्वे गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावताहेत.
तर ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलही अर्धा ते पाऊण तास उशिराने धावताहेत. कर्जत कसाराहून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकल गाड्या ठाणेपुढे जात नव्हत्या. तर अनेक लांब पल्याच्या गाड्याही खोळंबल्यामुळे ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती. मुंबई येथे होत असलेल्या पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे रेल्वे स्थाकाजवळ थांबविण्यात आल्यात. प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर पाणी साचले आहे त्यामुळे प्रवाश्यांना ट्रेन पकडण्यासाठी त्रास होत आहे.
मुंबई विभागात विविध ठिकाणी पाणी साचले आहे, त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालीय. या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलंय.
या रेल्वेगाड्या रद्द
1007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ
12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ
11009 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ
12123 छत्रपती शिवाजी महाराज – पुणे डेक्कन क्वीन जेसीओ
12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मनमाड पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ
11008 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ
12128 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ
11010 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ
12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन जेसीओ
12110 मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



