महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्रातील आणि जगभरातील मराठी बांधवांना मनापासून शुभेच्छा. आज कामगार दिनसुद्धा आहे. सर्व कामगार बंधू, भगिनींनाही मन:पूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेले राज्य नाही. महाराष्ट्र म्हणजे इतिहास, भूगोल आणि संस्कृतीचा समुच्चय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली स्वराज्याची प्रेरणा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला न्याय आणि प्रज्ञेचा पाया, संतांच्या अभंगवाणीचा दिव्य वारसा, महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेली शिक्षण, समतेची मशाल, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जागवलेली राष्ट्रभावना, देशासाठी अनन्यसाधारण यातना सहन करण्याची ताकद देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्यांच्या विचारांचा एकत्रित संगम म्हणजे महाराष्ट्र. केवळ भौगोलिक रचनेत महाराष्ट्र व्यक्त होत नाही तर महाराष्ट्र धर्मातून महाराष्ट्र प्रकट होतो. सर्वांवर हा महाराष्ट्र धर्म जगभर वर्धिष्णू करण्याची जबाबदारी आहे. यंदाचा महाराष्ट्र दिन विशेष आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंतीचे हे वर्ष आहे, संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीचे वर्ष आहे. चवदार तळ्याच्या ऐतिहासिक लढ्याचे शताब्दी वर्ष आहे. हे वर्ष आपण समता,सामाजिक समरसता वर्ष म्हणून साजरे करतो आहोत. आज जग आखाती देशांतील संघर्षाची झळ सोसत आहे. त्याच वेळी आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी, पर्यायी तेल स्रोतांसाठी व सौर ऊर्जेच्या विस्तारासाठी केलेल्या कामांमुळे अन्य देशांना ज्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले तसे भारतात झाले नाही. महाराष्ट्राची जगातील 30 वी अर्थव्यवस्था म्हणून झेप जगात कितीही आव्हाने असताना महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्र देशाच्या जीडीपीमध्ये 13.5 टक्क्यांहून अधिक योगदान देत आहे. 2024-25 मध्ये महाराष्ट्राने 1,64,875 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली. हे प्रमाण देशातील एकूण एफडीएच्या 39 टक्के इतके आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटींचे सामंजस्य करार केले.यातून 40 लाख रोजगार निर्माण होतील. जगात आर्थिक समस्या असताना महाराष्ट्राने जगातील 30 वी अर्थव्यवस्था म्हणून झेप घेतली आहे. हेच आपल्या राज्याचे सामर्थ्य आहे. हा विकास समतोल असावा. म्हणूनच गडचिरोली, धुळे, नंदुरबार अशी शहरेही गुंतवणुकीच्या नकाशावर आली आहेत. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामांना गती या वर्षी एल निनो परिस्थितीमुळे 2026 च्या हंगामातील पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आपला खरीप हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे हा अंदाज गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. पेरणीची घाई करू नका. कृषी विभागाकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनांकडे लक्ष द्या. त्यातून या संकटापासून बचाव करणे सोपे जाईल. त्याच वेळी मला शेतकरी बांधवांना आश्वस्त करायचे आहे की, राज्य शासन म्हणून आम्ही आधीपासूनच पाणी, चारा याचे नियोजन प्रारंभ केले आहे. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामांना गती देण्यास तसेच त्यासाठी प्राधान्याने निधी देण्यास सांगण्यात आले आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांचा जास्तीत जास्त वापर करा. पाण्याची बचत हे तसेही आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. राज्यात खते आणि बियाण्यांची कोणतीही कमतरता नाही. लिंकिंग करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. घाबरण्याचे काम नाही. राज्य शासन तुमच्यासोबत आहे. शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना गेल्या वर्षी पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर 15,576 कोटी रुपये जमा केले गेले. शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आपण जाहीर केली आहेच. शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे, आता सौरऊर्जेचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नैसर्गिक कितीही संकटे आली तरी महाराष्ट्राच्या विकासाचा रथ थांबणार नाही. विकसित महाराष्ट्राचा आराखडा आपण तयार केला आहे. महाराष्ट्राला 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न आणि त्या दिशेने आपण आत्तापासूनच काम सुरू केले आहे वाढवण येथे चौथे मुंबई बंदर विकसित केले जाणार महाराष्ट्र आज देशातच नाही, जगातही पायाभूत सुविधांच्या निर्मितीत आघाडीवर आहे. सध्या मुंबई, पुणे व नागपूरमध्ये 173 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिका कार्यरत आहेत. दरवर्षी 50 किमीची मेट्रो सेवेत येईल, असे नियोजन आहे. समृद्धीच्या साथीला शक्तिपीठ येतो आहे. वाढवण येथे चौथे मुंबई बंदर विकसित केले जाणार आहे. ते जगातील ‘टॉप टेन’ पैकी असेल. आज महाराष्ट्रदिनी मला अत्यंत आनंदाची बातमी सांगायची आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील 13.3 किमीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आज जनतेसाठी खुला होत आहे. यामुळे दोन शहरांमधील अंतर सुमारे 6 किमीने आणि प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे. आमच्यासाठी विकास केवळ रस्ते आणि मेट्रोपुरता नाही, तर विकास म्हणजे प्रत्येक माणसाचे जीवन उंचावणे हा आहे. लखपती दीदींची संख्या या वर्षी 50 लाखांपर्यंत नेण्याचे नियोजन 40 लाखांहून अधिक महिला आता ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. उमेद अभियानांतर्गत 64 लाखांहून अधिक कुटुंबांना बँक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. लखपती दीदींची संख्या या वर्षी 50 लाखांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. लाडकी बहीण योजनेतून आमच्या बहिणींना मदत केली जाते आहे. महिला असोत की विविध समाजघटक, प्रत्येक घटकासाठी ठोस योजना आहेत. सारथी, बार्टी, महाज्योती, आर्टी, वनार्टी, अमृत अशा विविध संस्थांच्या माध्यमातून समावेशकतेची पायाभरणी केली जाते आहे. उद्योजक आणि स्टार्टअप्सना साहाय्य युवांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नवी मुंबईत आलेली सहा ख्यातिप्राप्त जागतिक विद्यापीठे असोत, आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटीसारख्या संस्था कौशल्य क्रांतीत नवी भर टाकणार आहेत. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्ससारख्या क्षेत्रात विस्तार केला आहे. महाराष्ट्राने स्टार्टअप, उद्योजकता आणि नावीन्यता धोरणाद्वारे पुढील पाच वर्षांत 1.25 लाख उद्योजक आणि 50 हजार स्टार्टअप्सना साहाय्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. युवकांसाठी स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुप्रशासनासाठी अनेक पावले उचलण्यात आली असून शासनाच्या सर्व सेवा व्हॉट्सअॅपवर देण्यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला आहे. गडचिरोली नक्षलमुक्त झाले आहे आणि पोलाद शहर म्हणून नावारूपास येण्यासाठी वेगाने पाऊले टाकते आहे. महाराष्ट्रातील 11 किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची जगाने घेतलेली ही दखल आहे. महाराष्ट्र अधिक मजबूत आहे. अधिक आत्मनिर्भर आहे. अधिक महत्त्वाकांक्षी आहे. शेतकरी, कामगार, महिला, तरुण, उद्योजक प्रत्येकासाठी या राज्य शासनाने आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 च्या स्वप्नात महाराष्ट्र सर्वात पुढे राहील, हे माझे महाराष्ट्रदिनी आपल्याला वचन आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- आळंदीत संतापजनक प्रकार! माऊलींच्या चरणी श्रद्धेला काळिमा; ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीवर सेवेकऱ्यानेच मारला १५ हजारांचा डल्ला
- गरीब नगरमधील 'बुलडोझर' कारवाईनंतर मार्ग मोकळा! मुंबई मेट्रो-११ च्या भुयारी विस्ताराची तयारी सुरू!
- नाशिक टीसीएस प्रकरण! विशेष तपास पथकाकडून (SIT) न्यायालयात तब्बल १५०० पानांचे पहिले आरोपपत्र दाखल; ४ आरोपींवर आवळल्या आवळल्या बेड्या
- मुंबईत रस्त्यावर भीक मागताना आढळला 'भावी डॉक्टर'; मालाड पोलिसांमुळे दीड महिन्यानंतर कुटुंबाशी भावनिक भेट
महाराष्ट्र
- नागपुरात अल्पवयीन प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराला २० वर्षांची सश्रम कारावासाची कठोर शिक्षा
- आळंदीत संतापजनक प्रकार! माऊलींच्या चरणी श्रद्धेला काळिमा; ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीवर सेवेकऱ्यानेच मारला १५ हजारांचा डल्ला
- सोलापूर हादरलं! दीड वर्षाच्या लेकरासाठी डायपर आणायला गेलेला बाप रक्ताच्या थारोळ्यात; पनाश अपार्टमेंट परिसरातील घटनेने खळबळ
- रत्नागिरीत खळबळ! ब्लॅकमेलिंगला कंटाळून ४ पानांची चिठ्ठी लिहून बँक कर्मचारी बेपत्ता; कोळकेवाडी धरणाजवळ दुचाकी सापडल्याने खळबळ
गुन्हा
- आळंदीत संतापजनक प्रकार! माऊलींच्या चरणी श्रद्धेला काळिमा; ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीवर सेवेकऱ्यानेच मारला १५ हजारांचा डल्ला
- नाशिक टीसीएस प्रकरण! विशेष तपास पथकाकडून (SIT) न्यायालयात तब्बल १५०० पानांचे पहिले आरोपपत्र दाखल; ४ आरोपींवर आवळल्या आवळल्या बेड्या
- काळाचा घाला! वीज नसल्याने घराबाहेर झोपलेल्या कुटुंबाला भरधाव डंपरने चिरडलं; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
- फक्त १० सेकंदांच्या फोन कॉलने उघड केला थरार! दाम्पत्याने २ वृद्ध महिलांना संपवले; आणखी ६ सावकारांच्या हत्येचा होता कट!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- राज्य सरकारचा ३ महिन्यांपूर्वीचा गाजावाजा ठरला फुसका! रॉकेल पुरवठा अद्याप कागदावरच; केवळ १ रुपया कमिशनमुळे रेशन दुकानदारांची पाठ!
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड! इवांका ट्रम्प यांच्यावर हल्ल्याची तयारी करणारा आयआरजीसीचा दहशतवादी अटकेत
- भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय! अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात; पीएम मोदींसोबतच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा करार होणार?
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
- सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक सवाल; 'जर आई-वडील दोघेही IAS अधिकारी असतील, तर मुलांना आरक्षणाची काय गरज?'

























Subscribe to my channel




