पुणे - ज्या VSR Ventures कंपनीच्या विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले, त्याच कंपनीच्या विमानातून त्यांचे सुपुत्र आणि खासदार पार्थ पवार यांनी मुंबई ते पुणे प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वाद वाढताच पार्थ पवार यांनी "प्रशासकीय चूक" म्हणत स्पष्टीकरण दिले आणि "अशी चूक पुन्हा होणार नाही" असे आश्वासन दिले. ही घटना मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी घडली.
नेमकी घटना काय?
पुण्यातील मोदी बाग येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची बैठक आणि स्नेहभोजनाचे आयोजन होते. या कार्यक्रमात तातडीने उपस्थित राहण्यासाठी पार्थ पवार यांनी मुंबईहून पुण्याला विमानाने येण्याचे ठरवले. मात्र, शेवटच्या क्षणी बुकिंग झाल्याने VSR Aviation चे विमान त्यांच्यासाठी बुक झाले. विमानतळावर पोहोचेपर्यंत त्यांना हे विमान VSR चेच असल्याची माहिती नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. पार्थ पवारांसह इतर चार जण या विमानात होते.
पार्थ पवारांचे स्पष्टीकरण
वाद वाढताच पार्थ पवार यांनी X (ट्विटर) वर स्पष्टीकरण देत म्हटले, "मोदी बागेत पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने यायचे होते. कार्यालयाला विमान बुक करण्यास सांगितले. शेवटच्या क्षणी VSR चे विमान नकळत बुक झाले. मी विमानात बसल्यावरच हे लक्षात आले. ही केवळ प्रशासकीय चूक आहे. मी गंभीर दखल घेतली असून संबंधित बुकिंग एजंटचा करार तत्काळ रद्द केला आहे. कर्मचाऱ्यांना अशा चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी सूचना दिल्या आहेत."
"VSR Aviation बाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. आमचा विरोध कायम आहे आणि राहील. यावरून राजकारण करणे दुर्दैवी आहे," असेही त्यांनी म्हटले.
कुटुंबातील विरोधाभास
दुसरीकडे, अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी VSR कंपनीवर सातत्याने गंभीर आरोप केले आहेत. अपघातात घातपाताची शक्यता असल्याचे म्हणत त्यांनी सीआयडीकडे पुरावे सादर केले. त्याच दिवशी पार्थ पवार यांचा VSR विमानातून प्रवास झाल्याने free 'योगायोग' म्हणून चर्चा रंगली. सोशल अॅक्टिव्हिस्ट अंजली दामानिया यांनीही यावर प्रश्न उपस्थित केले होते.
VSR वादाची पार्श्वभूमी
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ VSR Ventures च्या Learjet 45 विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवार, त्यांचा सुरक्षा रक्षक, फ्लाइट अटेंडंट आणि दोन पायलट यांचा मृत्यू झाला. DGCA ने कंपनीची अनेक विमाने ग्राउंड केली आहेत. रोहित पवार आणि जय पवार यांनी कंपनीच्या सुरक्षिततेवर आणि देखभालीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel





https://shorturl.fm/tD4yq