कामगार चळवळींच्या गौरवासाठी राखीव दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दरवर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; या दिवशी भारतात आणि भारतबाह्य अनेक देशांमध्ये या निमित्ताने कामगार बंधू भगिनींचा गौरव करण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. कामगार : व्याख्या चलन मुद्रा स्वरूप, वेतन, पगार, किंवा वस्तुरूपाने मोबदला मिळवून शारीरिक वा मानसिक श्रम करणाऱ्या व्यक्तीला कामगार (Worker/Labourer) असे म्हणतात. यामध्ये कारखान्यातील मजूर, कुशल-अकुशल श्रमिक आणि नोकरदार यांचा समावेश होतो.औद्योगिक कलह अधिनियम, १९४७ नुसार, व्यवस्थापकीय काम सोडून इतर सर्व प्रकारचे काम करणारे व्यक्ती कामगार या वर्गात मोडतात. कामगार आणि श्रमाचे महत्त्व : अर्थात कामगार हे स्वतः परिश्रम पुर्वक उपजीविका करतात. खरे तर कामगाराच्या श्रमावरच संपूर्ण जग चाललेलं आहे. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षेत्रामध्ये कामगार नसल्यास कुठलेही कार्य चालण्याची कल्पना केली जाऊ शकत नाही. संपूर्ण भौतिक जग आणि त्यांच्या गरजा या कामगाराच्या परिश्रमातूनच संपूर्ण होतात. म्हणूनच कामगार हा वर्ग पण मला सर्वात महत्त्वाचा वाटतो. श्रमाचे ५ महत्त्व आहेत : १ मे: कामगार दिनाची सुरुवात : या दिवसाची सुरुवात १९ व्या शतकात अमेरिकेतील एका कामगार चळवळीतून झाली. मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने कामगारांना ८ तासांपेक्षा जास्त काम करण्यास भाग पाडू नये, अशी मागणी करणारा एक ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून हा एक महत्त्वाचा कार्यक्रम बनला व आजही १ मे रोजी 'कामगार दिन' म्हणून साजरा केला जातो. कामगारांचे हक्क , अधिकार : कामगार वर्गात जागतिक पातळीवर आणि भारतामध्ये घटनेने काही अधिकार व हक्क दिलेले आहेत. काही हक्कांचे कामगार कायद्यात रूपांतर झालेले आहे. काही मूलभूत हक्क आहेत जे कामगारांच्या मानवीय गरजेनुसार निर्माण केलेले आहेत. काही ठिकाणी काम करत असताना कामगारांना हे मूलभूत हक्क सहज मिळून जातात तर काही ठिकाणी मात्र त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. ही शोकांतिका अनेक ठिकाणी घडत असताना दिसते. कामगार विषयी अनेक कायदे आहेत, या ठिकाणी काही महत्त्वाच्या कायद्यांचे अल्प विश्लेषण केले आहे. भारतातील कामगार हक्क कायदा कामगारांचे शोषण रोखण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित कामाची परिस्थिती, रास्त वेतन व सामाजिक सुरक्षा (PF, ESI) प्रदान करण्यासाठी बनवले आहेत. हे कायदे किमान वेतन, कामाचे तास, बोनस, आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करतात. आता सरकारने अनेक कायद्यांचे एकत्रीकरण करून ४ नवीन कामगार संहिता (Labour Codes) आणल्या आहेत, ज्यामध्ये वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षा यावर भर दिला आहे. कामगारांचे प्रमुख हक्क आणि संबंधित कायदे: १ : किमान वेतन: सर्वांना कायद्याने ठरवून दिलेले किमान वेतन मिळणे हा हक्क आहे. २: कामाचे तास व सुट्ट्या: कारखान्यांच्या कायद्यानुसार (Factories Act, 1948) कामाचे निश्चित तास आणि साप्ताहिक सुट्टी मिळणे आवश्यक आहे. ३: बोनस: 'पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट, १९६५' नुसार कामगारांना बोनस मिळण्याचा हक्क आहे. ४: भविष्य निर्वाह निधी (PF) आणि ESI: सामाजिक सुरक्षेसाठी PF आणि आरोग्य विम्यासाठी ESI सवलती. ५: महिला कामगार: 'मॅटरनिटी बेनिफिट ॲक्ट, १९६१' नुसार गर्भवती महिलांना पगारी सुट्टी आणि इतर लाभ मिळतात ६: बालकामगार बंदी: १८ वर्षांखालील मुलांना धोकादायक कामात लावण्यास 'बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६' नुसार बंदी आहे. कामगार दिनाचा इतिहास १ मे ! हा दिवस कामगारांच्या सन्मानाचा, त्यांच्या अथक कष्टांचा आणि त्यागाचा दिवस आहे. १८८६ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांना दिवसाचे १२ ते १६ तास काम करावे लागत असे. या अन्यायाविरुद्ध कामगार एकत्र आले आणि त्यांनी "८ तास काम, ८ तास विश्रांती आणि ८ तास मनोरंजन" या मागणीसाठी संप पुकारला. या संघर्षात अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला. त्या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. श्रमाचा सन्मान: पृथ्वीवरील सर्व वस्तूंना स्वरूप देणाऱ्या प्रत्येक हातांचा हा गौरव आहे. कारखान्यातील कामगार असो, शेतातील शेतकरी असो, रस्ते बांधणारा मजूर असो किंवा कार्यालयात काम करणारा कर्मचारी, सर्वांच्या कष्टानेच देश घडतो. आजची परिस्थिती:
आज कामगार दिन साजरा करताना, आपण कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. सुरक्षित कामाचे वातावरण, सन्मानजनक वेतन आणि सामाजिक सुरक्षा मिळणे हा प्रत्येक कामगाराचा हक्क आहे. म्हणूनच आजच्या दिवशी श्रमिक बांधवांच्या कष्टाला सलाम.
(संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी!
- पुणे: पुणे-सासवड रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोंढवा ते वाडकी चौक या दरम्यान ९ किलोमीटरचा नवीन लिंक रोड तयार करण्यात येणार असून, यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.
- पुणे: जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे एका वृद्ध महिलेवर भरदिवसा झालेल्या अमानुष हल्ल्याने मोठी खळबळ माजली
- माजी केंद्रीय मंत्रि अरुण शौरी व जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुस्तक लिहून बदनामी केली.
महाराष्ट्र
- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी!
- पुणे: पुणे-सासवड रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोंढवा ते वाडकी चौक या दरम्यान ९ किलोमीटरचा नवीन लिंक रोड तयार करण्यात येणार असून, यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.
- पुणे: जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे एका वृद्ध महिलेवर भरदिवसा झालेल्या अमानुष हल्ल्याने मोठी खळबळ माजली
- माजी केंद्रीय मंत्रि अरुण शौरी व जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुस्तक लिहून बदनामी केली.
गुन्हा
- नाशिक हादरले! ८ वीतील विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग; नराधम शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- अल्पवयीन बलात्कार पीडितेचा गर्भपात: 'एम्स'ची याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; पीडितेच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आदेश
- संभाजीनगरात अवैध गर्भपात रॅकेटचा धक्कादायक पर्दाफाश; बी.कॉम. मीनाक्षी करायची तपासणी-गर्भपात, डॉक्टर-लॅब नेटवर्क उघड
- पुण्यात लग्नासाठी बनाव: ड्रायव्हरने 'आयटी मॅनेजर' बनून तरुणीशी केले लग्न; छळानंतर पोलिसात तक्रार
राजकीय
- बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
- पुणे शिवसेनेत (ठाकरे गट) खांदेपालट: संघटनात्मक बांधणीसाठी संजय राऊत यांचा मोठा निर्णय
- 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
- Political ; मोठी राजकीय घडामोड! ‘इतके’ आमदार भाजपात जाणार – संजय राऊतांचा मोठा दावा, राज्यात पुन्हा खळबळ
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?























Subscribe to my channel




