वर्ष 2012 मध्ये मला फ्रान्सच्या प्रतिष्ठित पाश्चरइन्स्टिट्यूटमध्ये व्हॅक्सिनॉलॉजीचा अभ्यास करण्याची संधीमिळाली. तेथील कोर्स डायरेक्टर्ससोबत माझे चांगले संबंधनिर्माण झाले होते. काही वर्षांनंतर जेव्हा ते भारतात आले,तेव्हा मी त्यांना एका प्रसिद्ध ‘फाइन डायनिंग’ रेस्टॉरंटमध्येरात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले. सर्वकाही व्यवस्थितहोते- जेवण, वातावरण, सेवा- पण एका गोष्टीने संपूर्णअनुभव अस्वस्थ केला : गोंगाट. माझ्या पाहुण्यांना संवादसाधताना अडचण जाणवत होती. त्याच दिवशी मलाजाणीव झाली की आपण सभोवतालच्या गोंगाटाने इतकेसरावलो आहोत की या समस्येकडे आपण लक्षही देत नाही. आज भारतातील शहरांमध्ये गोंगाट ही केवळ एकगदारोळपूर्ण पार्श्वभूमी राहिलेली नाही, तर ती एककायमस्वरूपी वास्तविकता बनली आहे. दिल्लीमध्येआवाजाची सरासरी पातळी जवळपास 75 डेसिबलपर्यंतपोहोचली आहे, तर जागतिक आरोग्य संघटना दिवसा 55डेसिबलची मर्यादा सुरक्षित मानते. मुंबई, कोलकाता,बेंगळुरू यांसारख्या महानगरांमध्येही परिस्थिती काही वेगळीनाही - बहुतांश भागांमध्ये आवाजाची पातळी 65 ते 75डेसिबलच्या दरम्यान असते आणि गर्दीच्या वेळी ती 90 ते100 डेसिबलपर्यंत पोहोचते. चिंतेची बाब म्हणजे आपणहंगामी आव्हानांवर- जसे की हिवाळ्यातील वायुप्रदूषण,उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि उष्णतेची लाट किंवाथंडीच्या हंगामातील शीत लहर यावर तर बोलतो- पणध्वनिप्रदूषण- जे वर्षभर असते- त्याकडे कमी लक्ष दिलेजाते. तर, दीर्घकाळ 70 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्यासंपर्कात राहिल्याने हृदयविकार, उच्च रक्तदाब आणिस्ट्रोकचा धोका वाढतो. प्रत्येक 10 डेसिबलच्या वाढीसोबतहृदयाशी संबंधित धोका जवळपास 8 टक्क्यांपर्यंत वाढूशकतो. मुलांमधील शिकण्याची क्षमता प्रभावित होते,गर्भवती महिलांमध्ये गुंतागुंत वाढते आणि वृद्धांमध्ये झोपेचीसमस्या सामान्य होते. भारतामध्ये 6 कोटींहून अधिक लोकऐकण्याच्या समस्येने त्रस्त आहेत आणि ध्वनिप्रदूषण हे त्याचेएक मोठे कारण बनत आहे. गोंगाटाचा परिणाम केवळआरोग्यापुरता मर्यादित नाही, तर तो आपली उत्पादकता,मानसिक संतुलन व सामाजिक वर्तनावरही होतो. सततच्यागोंगाटात राहणारी व्यक्ती अधिक चिडचिडी, थकलेली,लक्ष केंद्रित करण्यात कमी सक्षम असते. अशा स्थितीतसमाजाच्या एकूण कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. तसेपाहिले तर आपल्याकडे नियमांची कमतरता नाही. पर्यावरणसंरक्षण कायदा 1986 अंतर्गत ध्वनिप्रदूषण (नियमन आणिनियंत्रण) नियम बनवण्यात आले होते. पण समस्यानियमांची नाही, तर त्यांच्या पालनाची आहे. रस्त्यांवरअनावश्यक हॉर्न वाजवणे, रात्री उशिरापर्यंत डीजे किंवालाऊडस्पीकरचा वापर आणि बांधकामाच्या ठिकाणीवेळेच्या मर्यादेचे उल्लंघन- हे सर्व आता सामान्य झालेआहे. कायद्यांचे कठोर पालन सुनिश्चित करावे लागेल.जनजागृती वाढवणेही तितकेच गरजेचे आहे. शाळा आणिमहाविद्यालयांमध्ये हा संदेश द्यावा लागेल की हॉर्न वाजवणेही मजबुरी नाही, तर सवय आहे - आणि ती बदलली जाऊशकते. शहरी नियोजनातही बदल आवश्यक आहे. नॉइजबॅरियर, ग्रीन कॉरिडॉर आणि ईव्हीला चालना देणे या दिशेनेउपयुक्त ठरू शकते. ज्याप्रमाणे आपण हवा गुणवत्तानिर्देशांक (एक्यूआय) नियमितपणे पाहतो, त्याचप्रमाणेआवाजाच्या पातळीचे रिअल-टाइम मॉनिटरिंग देखील सुरूकेले पाहिजे. कारण ध्वनिप्रदूषण हे एक असे सायलेंटसंकट आहे- जे हळूहळू आपल्याला प्रभावित करत आहे.(हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




