विश्वास आणि सातत्य हे असे अदृश्य धागे आहेत, जे मानवी नात्यांना जोडून ठेवतात. जेव्हा तुम्ही स्वतः याचा अनुभव घेता, तेव्हा ते केवळ एक ‘कनेक्शन’ न राहता एक अतूट नाते बनून जाते. माझ्या कारकिर्दीत आणि व्यक्तिगत आयुष्यात मला असे जाणवले आहे की, विश्वास केवळ बोलण्याने निर्माण होत नाही, तर सातत्याच्या आगीत तावून सुलाखून निघाल्यावर तो अधिक मजबूत होतो. अनेक दशकांपूर्वी एका अत्यंत महत्त्वाच्या जॉब इंटरव्ह्यूमध्ये मला सांगण्यात आले की, मी स्वतःचे वर्णन दोन-तीन शब्दांत करावे. अजिबात वेळ न दवडता मी म्हणालो, ‘मी एक फायरफायटर आहे.’ माझी कल्पकता तपासण्यासाठी एचआर हेड अरूप गुप्ता कुत्सितपणे हसले आणि म्हणाले, ‘जर तुला या वाक्यात आणखी एक शब्द जोडायला सांगितला तर तो कोणता असेल?’ साहजिकच, त्यांना ‘डेकोरेटिव्ह’, ‘गुड’ किंवा ‘एफिशिएंट’ सारख्या एखाद्या सामान्य विशेषणाची अपेक्षा होती, परंतु मी त्यांना एक व्यावहारिक सत्य सांगून चकित केले की, ‘मी एक कन्सिस्टंट (सातत्यपूर्ण) फायरफायटर आहे.’ त्यांच्या चेहऱ्यावर आलेली चमक स्पष्ट दिसत होती. जरी त्यांनी मजेशीरपणे असे म्हणत आपले भाव लपवण्याचा प्रयत्न केला की, मी सिटी फायर ब्रिगेडच्या कोणत्याही अनुभवाचा उल्लेख तर केलाच नाही, परंतु खोलीतील वातावरण स्पष्टपणे अनुभवता येत होते. ‘कन्सिस्टंट’— या एका शब्दाने त्यांचा विश्वास जिंकला. तेव्हापासून गेल्या ३५ वर्षांत आमच्यात तसाच विश्वास कायम आहे. एका व्यावसायिक मुलाखतीपासून सुरू झालेले हे नाते जन्मभराच्या मैत्रीत बदलले. हे सिद्ध करते की, सातत्य हाच तो पाया आहे ज्यावर कायमस्वरूपी निष्ठेची इमारत उभी असते. गेल्या शुक्रवारी, मुंबईच्या अंधेरी येथील २२,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या तनिष्क स्टोअरमध्ये उभे असताना मला ही जुनी गोष्ट आठवली. जेव्हा मी ते सजलेले शोरूम पाहत होतो, तेव्हा माझ्या डोक्यात हिंदीतील एक प्रसिद्ध ओळ रुंजी घालत होती— ‘आईना आज फिर रिश्वत लेता पकड़ा गया। दिल में दर्द था और चेहरा हंसता हुआ पकड़ा गया।’ खरे तर मी सुद्धा एका खोटेपणात अडकलो होतो— अगदी तसाच, जसा दशकांपूर्वी अरूप यांनी मजेशीरपणे विषय टाळला होता. खट्याळ नजरेने तनिष्कच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पेल्की त्शेरिंग यांनी मला विचारले, ‘तुम्ही टेन्शनमध्ये आहात का?’ मी म्हणालो, ‘नाही.’ पण आतून मी थोड्या गोंधळात होतो. माझी चिंता त्या वस्तूच्या किमतीबद्दल नव्हती, तर माझ्या भूतकाळातील सत्याबद्दल होती. जर निकाल नकारात्मक आला असता, तर याचा अर्थ असा झाला असता की, दशकानुदशके मी ज्या गोष्टीचा आनंद घेत होतो, ती प्रत्यक्षात एका बनावट वस्तूशिवाय काहीच नव्हती. पेल्की यांनी मला ओळखले. त्या हसल्या आणि मी नजर चोरत हसलो. तेव्हाच मी पाहिले की, लांब उभे असलेले तनिष्कचे सीईओ अरुण नारायण या सायकॉलॉजिकल गेमची मजा घेत होते. माझ्या टेन्शनचे कारण लग्नाची अंगठी होती, जी अनेक वर्षांपूर्वी सासरच्या मंडळींनी भेट दिली होती. त्यात एक छोटासा हिरा होता, अगदी राईच्या दाण्याएवढा. तीस वर्षे मी माझ्या फॅमिली ज्वेलरच्या शब्दावर विश्वास ठेवला होता. आज तीच अंगठी अशा अत्याधुनिक मशीनमध्ये होती, जी नैसर्गिक, लॅबमध्ये बनवलेले आणि बनावट हिरे यांमधील फरक सांगण्यासाठी बनवली आहे. मला तीन मिनिटे वाट पाहावी लागली. ही प्रतीक्षा अंतहीन वाटत होती, जसे एखाद्या ‘सीझन फिनाले’ दरम्यान डिजिटल स्क्रीनची बफरिंग पाहणे असते. तिसऱ्या मिनिटाला मशीनचा निकाल आला— ‘नॅचरल’ (नैसर्गिक). मला दिलासा मिळाला. आरशातील माझे प्रतिबिंब बदलले होते. पेल्की माझा विजय ओळखून जवळ आल्या आणि जोरात म्हणाल्या— ‘दे ताली’. आम्ही ‘हाई-फाइव्ह’ केले. मनातल्या मनात माझ्या फॅमिली ज्वेलरचे आभार मानत मी अरुण यांच्याकडे गेलो आणि माझ्या विश्वासाला वैज्ञानिक आधार दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कदाचित याच कारणामुळे या ब्रँडने असा निर्णय घेतला असावा की, ते त्यांच्या आउटलेटवर येणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाला हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन त्यांना एक वास्तव अनुभव देतील.
फंडा असा की - जेव्हा वचने अनुभवाद्वारे प्रमाणित केली जातात, तेव्हा नाते अतूट बनते— मग ते मित्रांमधील असो किंवा एखाद्या ब्रँड आणि ग्राहकामधील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



