ती तलावाच्या काठावर बसून विचारांत हरवली होती. अचानक पाण्यात तिला चार घोडेस्वारांच्या सावल्या दिसतात. ती क्षणार्धात वळते आणि ओरडते, “चल धन्नो!” घोडीही तत्काळ तिच्याकडे पाहते. जणू आपल्या मालकिणीवर आलेले संकट तिला समजले होते. बसंती टांग्यावर चढण्याआधीच धन्नो वेगाने धावू लागते. टांग्यावर बसताच बसंती म्हणते, “पळ धन्नो, आज तुझ्या बसंतीच्या अब्रूचा प्रश्न आहे...” 51 वर्षांपूर्वीच्या ‘शोले’ चित्रपटातील हा प्रसंग अनेकांना आठवत असेल. काहींना प्रश्नही पडला असेल की एखादी घोडी धोका कसा ओळखू शकते? मात्र मला या प्रसंगाबद्दल कधीच शंका वाटली नाही. कारण माणसांसोबत राहणारे प्राणी आपल्या भावना समजून घेतात. आपला ताण कमी करतात. चिंता शांत करतात. काही रुग्णांत जगण्याची इच्छाही निर्माण करतात. अशा अनेक कथा मी वाचल्या होत्या. वडीलधाऱ्यांकडून ऐकल्या होत्या. पण हे प्रत्यक्ष अनुभवण्याची वेळ आली ती माझ्या आईची ‘सीसू’शी झालेली मैत्री पाहिल्यावर. तो पाळीव कुत्रा होता. त्याला आमच्या घरात येण्याची परवानगी होती. सीसूची ओळख करून देण्यापूर्वी एक गोष्ट मान्य करावी लागेल. माझ्या लग्नात मलाही ‘हुंडा’ मिळाला होता. होय, सीसू. हा आमच्या घरी आलेला पाळीव कुत्रा माझ्या पत्नीसोबतच आला होता. लग्नाच्या वेळी तो आठ वर्षांचा होता. विशेष म्हणजे, नववधू-वरांपेक्षा आधी तोच गाडीच्या पुढच्या आसनावर बसला होता. सासरी पोहोचल्यावर नवदाम्पत्याचे औक्षण होण्यापूर्वीच तो घरात शिरला. प्रत्येक खोलीत जाऊन त्याने वास घेतला. सर्वकाही पाहिले आणि मग बाहेर येऊन औक्षणासाठी सर्वात पुढे बसला. प्रथम त्याच्या कपाळावर टिळा लावण्यात आला आणि त्यानंतर नवदाम्पत्याला. हे दृश्य पाहून उपस्थित सगळ्यांची हसून पुरेवाट झाली. जणू घराची पाहणी करून त्याने मंजुरी दिली होती. माझ्या पत्नीला हे घर सुरक्षित असल्याचा संदेश दिला होता. हळूहळू आमच्या स्वयंपाकघरातील चर्चाही सीसूच्या आवडी-निवडीभोवती फिरू लागल्या. एकदा माझ्या आईने सांगितले की, ‘सीसूला तुपाचा डोसा आवडतो.’ हा सन्मान आम्हाला सहसा हॉटेलमध्येच मिळत असे. मला स्वतःचा वाढदिवसही अनेकदा लक्षात राहत नसे. पण एकदा आईने सीसूच्या वाढदिवसासाठी ३०० रुपये खर्च केल्याचे सांगितले आणि मी थक्क झालो. त्यावर वाद घालण्याचा प्रयत्न केला. पण आईच्या प्रेमळ हट्टापुढे माझे काहीच चालले नाही. आई उपवास करत असे. तेव्हा सीसूही काही खात नसे. तो तिच्यासोबत जवळच्या मंदिरात जाई आणि पूजा पूर्ण होईपर्यंत शांतपणे वाट पाहत बसे. किमोथेरपीनंतर आई तीन-चार दिवस रुग्णालयात दाखल असली तरी तिची सर्वात मोठी चिंता सीसूच्या खाण्यापिण्याचीच असे. आम्ही तिला सांगायचो, ‘तो नीट खात नाही.’ तेव्हा ती म्हणायची, ‘सीसूच्या आधी माझा मृत्यू होऊ नये, एवढीच इच्छा आहे.’ कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यातही तिच्या मनात जगण्याची उमेद शिल्लक होती. त्यामागे सीसूचे अस्तित्व मोठे कारण होते, असे आम्हाला अनेकदा वाटायचे. एकदा डॉक्टरांनीही सांगितले, ‘त्या औषधांना चांगला प्रतिसाद देत आहेत. कारण त्यांना घरी परतून सीसूला भेटायची ओढ आहे.’ आईची प्रकृती खालावत गेली तसतसा सीसू तिचा कायमचा सोबती बनला. त्याच्यासाठी अन्न नेले, तरी आईने ‘खा रे माझ्या बाळा’ असे सांगितल्याशिवाय तो तोंड लावत नसे. तो सतत तिच्या जवळ असे. जिथे तिच्या पायांना वेदना होत असत, तिथे तो आपला पंजा ठेवून बसायचा. कर्करोगामुळे आईच्या पाठीच्या असह्य वेदना वाढल्या की तो स्वतःही खाणे सोडून द्यायचा. आईच्या निधनाच्या एक वर्ष आधीच सीसूचा मृत्यू झाला. त्यानंतर आई जेव्हा त्याच्याशी संबंधित आठवणी सांगायची, तेव्हा त्या कथा आम्हाला हसवायच्याही आणि डोळ्यात पाणीही आणायच्या. फंडा असा की- माणसांसोबत राहणारे प्राणी आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असतात, असे लोक म्हणतात, तेव्हा त्यासाठी मला कधीही पुराव्याची गरज वाटली नाही. कारण सीसूने आम्हाला हे सत्य खूप आधीच शिकवून ठेवले होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



