Akbar And Birbal : अकबर आणि बिरबलाच्या अनेक कथा आज प्रसिद्ध आहे. अनेकदा तुम्ही बिरबल आणि अकबराचे विनोद ऐकले असतील. बिरबलाकडे खूप बुद्धीचातूर्य होते, असे म्हटले जाते. बिरबल हा बादशाहा अकबाराचा अत्यंत विश्वासू माणूस होता. परंतु याच बिरबलाचा मृत्यू कसा झाला, याबाबत अनेकांना कल्पना नाही. इतिहासाच्या पानावर असा एक दुर्दैवी दिवस आहे, ज्या दिवशी बिरबलाचा मृत्यू झाला. बिरबलाच्या मृत्यूनंतर अकबर बादशाहा अत्यंत व्यतिथ झाला होता. बिरबलासोबत नेमकं काय झालं होतं? ते जाणून घेऊ या…
कोण होता बिरबल? त्याचे दरबारात काय महत्त्व होते?
बिरबलचे खरे नाव महेश दास असे होते. मुघल सम्राट अकबराच्या नवरत्नांपैकी एक होते. बुद्धीमत्ता, कूटनीती, हजरजबाबीपणा यामुळे बिरबल प्रसिद्ध होता. लोककथा आणि टीव्हीवरील वेगवेगळ्या कार्यक्रमात बिरबल हा विनोदबुद्धीचा होता, एवढेच दाखवले जाते. परंतु बिरबल एक अत्यंत हुशार राजकारणी होते. तसेच अकबराच्या दराबारात त्यांच्यावर मोठी प्रशासकीय जबाबदारी होती. बिरबल हे अकबराच्या खूपच जवळ होते.
बिरबलचा मृत्यू नेमका कसा झाला?
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात अफगाणिस्तानातील काही भाग हा मुघलांच्या अधिपत्याखाली होता. त्या वेळी स्वात आणि बाजौर या भागात युसफजई कबिल्याचे विद्रोही सक्रीय झाले होते. हे विद्रोही तेथील स्थानिक लोकांना त्रास देत होते. याच विद्रोहींचा बंदोबस्त करण्यासाठी अकबराने सेनापती जैन खान कोका यांना पाठवलं. परंतु पर्वतीय प्रदेशात विद्रोहींचा मुकाबला करणे कठीण झाले होते. म्हणूनच जैन कान कोका याने अतिरिक्त कुमक मागवली होती. त्यानंतर राजा अकबराने बिरबलला सैन्य घेऊन उत्तर पश्चिमेचा भाग सांभाळण्यासाठी पाठवले. बिरबलासोबत 8000 सैनिक होते.
बिरबलाकडे चातुर्य होते. परंतु युद्धकलेत मात्र तो तेवढा निपूण नव्हता. बिरबल आणि त्याची सेना जेवाह मलंदराई या भागात पोहोचली त्यावेळी युसूफजईच्या सैनिकांनी डोंगरावरून हल्ला करायला सुरुवात केली. यातच बिरबलासोबतचे 8000 सैनिक तसेच बिरबलही मारला गेला असे सांगितले जाते. दरम्यान, बिरबलाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर अकबर मात्र खूपच दु:खी झाला होता. पुढच्या काही दिवस ते कोणाशीही बोलत नसत असे म्हटले जाते.
शहर
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
महाराष्ट्र
- सांगली: १० लाखांच्या रोकडसह थेट संपूर्ण 'एटीएम' मशीनच लांबवले, चोरांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान!
- पुणे: लाडक्या बाप्पा आणि दुर्गादेवीच्या सन्मानपूर्वक पुनर्विसर्जनासाठी महापालिका घेणार खाण भाडेतत्त्वावर!
- महाराष्ट्र: मी मनोज जरांगेंवर बोलणे का टाळतोय? छगन भुजबळांनी स्वतःच सांगितलं कारण, सरकारलाही खडा सवाल
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान





























Subscribe to my channel




