उत्तर प्रदेश: कानपूर येथे पांडु नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बर्रा मायापुरम भागातील नागरिक पुराच्या संकटाचा सामना करत आहेत. घरात साचलेलं पाणी आणि आजारांचा धोका या परिस्थितीत मदतीची वाट पाहणाऱ्या नागरिकांना धक्कादायक अनुभव आला आहे. आरोग्य विभागाने वाटप केलेल्या औषधांमध्ये एक्स्पायर्ड सिरप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जुलै २०२६ मध्येच एक्स्पायर्ड झालेलं सिरप प्यायल्याने अनेक लहान मुलांची प्रकृती बिघडल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
औषध प्यायल्यानंतर मुलांना उलट्या सुरू झाल्याने पालकांनी त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेलं. तेथे योग्य उपचार मिळाल्यानंतर मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. सोमवारी दुपारी आरोग्य विभागाचं पथक मायापुरम भागात २० कुटुंबांना औषधं वाटण्यासाठी आलं होतं. पूरग्रस्तांना आजारांपासून वाचवण्यासाठी वाटण्यात आलेल्या औषधांमध्ये एका सिरपचाही समावेश होता. हे सिरप एक्स्पायर्ड झाल्याचा आरोप आहे.
सिरप प्यायल्यानंतर उलट्या सुरू
जयपाल आणि मीना यांच्या चार वर्षांच्या मुलाने हे सिरप प्यायल्यानंतर त्याला उलट्या सुरू झाल्या. मुलाची तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेलं. उपचारानंतर रिषभ नावाच्या या मुलाची प्रकृती स्थिर झाली. याचप्रमाणे सोनम आणि रिंकू यांचा तीन वर्षांचा मुलगा रुद्र, तसेच अंकिता आणि अजय यांचा तीन वर्षांचा मुलगा आयुष यांची प्रकृतीही हे औषध प्यायल्यानंतर बिघडल्याचे समोर आलं आहे.
परिसरात भीतीचं वातावरण
एकाच वेळी अनेक मुलांची प्रकृती बिघडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. संतप्त नागरिकांनी एक्स्पायर्ड सिरप आणि इतर औषधे फेकून दिली. मंगळवारी जेव्हा आरोग्य विभागाचे पथक पुन्हा औषधं घेऊन मायापुरम भागात पोहोचले, तेव्हा पूरग्रस्तांनी औषधं घेण्यास स्पष्ट नकार दिला. मदतीच्या नावाखाली वाटल्या जाणाऱ्या औषधांवरच प्रश्न उपस्थित होत असताना आम्ही आमच्या मुलांचा जीव धोक्यात घालू शकत नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.
उपचारासाठी दिले १०० रुपये; नागरिकांचा घेण्यास नकार
एक्स्पायर्ड सिरपबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मीना यांनी सांगितलं की, आरोग्य विभागाच्या पथकाने चुकून एक्स्पायर्ड सिरप दिल्याचं मान्य केलं आणि मुलाच्या उपचारासाठी १०० रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र पीडित कुटुंबाने हे पैसे घेण्यास नकार दिला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
शहर
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- बीड: चोरीसाठी थेट १९०० किमीचा प्रवास! बीडच्या आष्टी पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई, हरियाणामधील कुख्यात जनावरे चोरांची टोळी जेरबंद!
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
गुन्हा
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
























Subscribe to my channel



