बद्री नारायण यांचा कॉलम:राजकारणात भूतकाळातील‎ नायकच का प्रभावी आहेत?‎

3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारतीय राजकारण अशा वळणावर येऊन ठेपले आहे,‎जिथे सध्याच्या राजकीय कुरूक्षेत्रात भूतकाळ युद्ध लढत‎आहे. भूतकाळ आणि आठवणींची सेना सज्ज झाली‎आहे आणि इतिहासातील नायक जणू पुन्हा जिवंत‎होऊन घोड्यावर स्वार होत आपल्या पक्षासाठी लढत‎आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकीय पटलावर ही घटना‎ठळकपणे दिसून येते.‎

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे‎वातावरण तयार होऊ लागले आहे. सर्व प्रतिस्पर्धी‎राजकीय पक्ष आपापल्या निवडणूक रणनीती‎आखण्यात गुंतले आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते ‎‎राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये 1857 च्या संग्रामातील‎- ज्याला भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्रामही म्हटले जाते‎- दलित नायक वीरा पासी यांच्या पुतळ्याचे अनावरण ‎‎केले. या निमित्ताने त्यांनी दलित आणि उपेक्षित‎समुदायांना राजकीयदृष्ट्या जोडण्याचा प्रयत्न केला.‎त्याच वेळी, एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी ‎‎यांनीही बहराइचमधील आपल्या पहिल्याच सभेत गाझी ‎‎मियाँ यांच्या शौर्याचे आणि महानतेचे वर्णन केले.‎त्यांच्या स्मृतीचा वापर त्यांनी मुस्लिम समाजाच्या‎अस्मितेच्या जागृतीसाठी करण्याचा प्रयत्न केला.‎ओवेसी यांच्या रॅलीपाठोपाठ योगी आदित्यनाथ यांनी‎त्याला प्रत्युत्तर दिले. गाझी मियाँचा पराभव करून त्यांना‎मारणाऱ्या हिंदू सीमावर्ती समूहाच्या महाराजा सुहेलदेव‎यांच्या सन्मानाची मोहीम त्यांनी अधिक तीव्र केली.‎कोणत्याही परकीय आक्रमकाचे उदात्तीकरण करणे‎योग्य नाही आणि याला विरोध केला जाईल, असे ते‎म्हणाले. लखनऊमध्ये राजा बिजली पासी यांच्या‎किल्ल्याशी संबंधित आठवणी आणि त्यातील‎प्रतीकात्मक शक्तीचा वापर राजकीय गटबाजीसाठी‎करण्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी‎पार्टी यांच्यात नेहमीच रस्सीखेच सुरू असते.‎समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजाला‎आपल्याशी जोडण्यासाठी महर्षी परशुराम यांच्या‎प्रतीकांचादेखील वापर करत आहे.‎

हे जाणून घेणे मोठे रंजक आहे की, हे बहुतेक नायक‎वैदिक काळापासून ते 1857 च्या संग्रामापर्यंतचे किंवा‎त्याआधीचे आहेत. गांधी युग किंवा समकालीन‎इतिहासातील नायक यात नाममात्र आहेत. दुसरी गोष्ट‎म्हणजे, या प्रक्रियेत बहुतेक नायक आणि त्यांच्या कथा‎केवळ शैक्षणिक तथ्य न राहता राजकीय तथ्य बनल्या‎आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्याशी संबंधित स्मृती‎विविध सामाजिक समूहांच्या अस्मितेसाठी भावनिक‎खतपाणी घालतात. हा भावनिक आधारच त्यांना‎राजकीय एकत्रीकरणासाठी तयार करतो. यावरून हेही‎सिद्ध होते की, भूतकाळातील काही मुद्दे अजूनही‎सुटलेले नाहीत, जे वर्तमानात एकमेकांत गुंतले आहेत.‎

यावरून असेही वाटते की, विकसित होत असलेल्या‎समाजात जिथे अनेक सामाजिक गट पुढे जाण्याच्या‎स्पर्धेत आहेत, तिथे अस्मिता आणि आठवणींचा संघर्ष‎हा विकास, सत्ता आणि सन्मानातील योग्य‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎भागीदारीसाठी अपरिहार्य बनतो.‎

विकसित समाजातही इतिहास आणि आठवणी आपल्या‎दैनंदिन जीवनाचा भाग असतातच, पण त्यांची भूमिका‎बदलते. राजकीय गटबाजीपेक्षा त्यांची भूमिका तिथे‎अधिक शैक्षणिक आणि ऐतिहासिक राहते. उदाहरणार्थ,‎चीन आणि दक्षिण कोरियासारख्या आशियाई देशांत‎इतिहास आणि आठवणी राजकारणापेक्षा प्रेरणा देण्याचे‎काम करतात.‎

समकालीन राजकारणात भूतकाळाचा राजकीय वापर‎वाढणे हे दर्शवते की, आपल्याकडील विकासाचे‎राजकारण आणि लोकशाहीच्या विस्ताराचा मार्ग अजून‎अनेक संघर्षांतून जाणार आहे. जेव्हा हा भूतकाळ आणि‎अस्मितेचा बोध राजकारणातून बाहेर पडून जीवनदर्शन,‎ज्ञान-चर्चा आणि प्रेरणेचे घटक बनतील, तेव्हा भारताचा‎विकसित होण्याचा प्रवास अधिक सोपा होईल.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

QuoteImage

समकालीन राजकारणात भूतकाळाचा‎राजकीय हस्तक्षेप वाढणे हे दर्शवते की,‎आपल्याकडील विकासाचे राजकारण व‎लोकशाहीच्या विस्ताराचा मार्ग अजूनही‎संघर्षांतून जाणार आहे. उत्तर प्रदेशात जे‎ काही घडत आहे, त्याकडे लक्ष ठेवा.‎

QuoteImage

This post was originally published on this site.



गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *