महाराष्ट्रात यंदा मान्सूनने ओढ दिल्याने गेल्या अनेक दशकांतील कोरडेपणाचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी पुणे शहर आणि परिसरामध्ये पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुण्याच्या शिवाजीनगर वेधशाळेत जूनच्या पहिल्या 15 दिवसांत चक्क “शून्य’ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्ष 1958 नंतर म्हणजेच तब्बल 68 वर्षांनी जूनचा पहिला पंधरवडा पूर्णपणे कोरडा जाण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे शहरावरील पाणीसंकट कमालीचे तीव्र झाले आहे. राज्यभरातच पावसाची कमालीची तूट राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पावसाची तूट कमालीची वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक तूट रायगड उणे 99% आणि मुंबई शहर उणे 98% इतकी नोंदवली गेली आहे. याशिवाय मुंबई उपनगर उणे 96%, सातारा उणे 90%, अहिल्यानगर उणे 88%, संभाजीनगर उणे 87%, रत्नागिरी उणे 84%, पुणे उणे 83%, सिंधुदुर्ग व कोल्हापूर उणे 80%, सांगली उणे 56% आणि सोलापूर जिल्ह्यात उणे 52% पावसाची तूट आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अद्याप मोसमी वारे पोहोचलेले नाहीत. राज्यात अवर्षणाचे सावट; जून महिन्यात मोसमी पावसाची तब्बल 81 टक्के तूट मान्सून आगमन झाले असले, तरी दमदार पावसाने पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण राज्यात अवर्षणाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्याचा निम्मा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप समाधानकारक पाऊस न पडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, 1 जून ते 20 जून या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल उणे 81 टक्के इतका अत्यंत कमी पाऊस झाला आहे. मान्सून पोहोचलेल्या जिल्ह्यांत अद्याप कोरडीठाक परिस्थिती कायम आहे. लवकरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता- अनुपम कश्यप आयएमडी पुण्याचे माजी प्रमुख व हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यप यांच्या मते, महाराष्ट्र आणि लगतच्या भागात कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली कार्यरत नसल्यामुळे मान्सूनची प्रगती थांबली आहे. लवकरच मान्सूनचा प्रवाह पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान, शेजारील केरळममध्ये उणे 24%, कर्नाटकात उणे 37% तर गोव्यात उणे 73% पावसाची तूट आहे. येत्या 23 जूनच्या आसपास मान्सून पुन्हा सक्रिय होऊन तेलंगण, बिहार, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांतून पुढे सरकेल. 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनची महाराष्ट्रात झेप : खुळे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की,तब्बल 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने महाराष्ट्रात घेतलेली झेप, विशेषतः अलिबाग, पुणे, सातारा आणि मराठवाड्यापर्यंत झालेली वाटचाल बळीराजासाठी नक्कीच सुखावणारी आहे. अरबी समुद्रातील अनुकूल बदल आणि हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनला मिळालेली नवी बळकटी यामुळे मुंबईतही पुढील दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस दाखल होईल, हा आशादायी अंदाज मनाला उभारी देतो. मात्र, दुसरीकडे विदर्भात 26 जूनपर्यंत राहणारा रात्रीचा उकाडा व उष्णतेची तीव्र लाट चिंतेची बाब असून, तेथील नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस पडू शकतो, असेही खुळे यांनी सांगितले. पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा घटल्याने पाणीपुरवठ्याचे संकट महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले की, धरणांमधील उपलब्ध जलसाठ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले असून पुण्यातील धरणांमध्ये केवळ चार टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक असल्याने एक दिवसाआड पाणी कपात करण्यात आलेली आहे. पाणी टँकरचे प्रमाणदेखील मागील एक आठवड्यापासून वाढलेले असून सध्या एकूण 1665 पाणी टँकर शहरात कार्यरत आहे. पुण्याची तहान भागवणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार प्रमुख धरणांतील पाणीसाठा वेगाने खालावत आहे. ऐतिहासिक आकडेवारी आणि भूतकाळातील स्थिती हवामान विभागाच्या नोंदीनुसार, यापूर्वी 1915 आणि 1932 मध्येही 20 जूनपर्यंत पुण्यात अशीच कोरडी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर जूनच्या उत्तरार्धात मान्सून सक्रिय झाला होता आणि चांगला पाऊस पडला होता. ऐतिहासिक आकडेवारीनुसार, जून महिन्यात 1915 मध्ये एकूण 362 मिमी, 1932 मध्ये 79 मिमी आणि 1958 मध्ये 65 मिमी पाऊस नोंदवला गेला होता. यंदा मात्र “एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सून कमालीचा कमकुवत झाला असून, वातावरणातील बदलांमुळे नागरिकांना भीषण उष्णता आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे वीज आणि पाण्याची मागणी कमालीची वाढली आहे. दुसऱ्या बाजूला पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, मका, कापूस आणि भात यांसारख्या खरीप पिकांची पेरणी पूर्णपणे ठप्प झाली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- जुलैमध्ये पावसाची दडी! महाराष्ट्रात पाऊस का गायब झाला आणि उकाडा का वाढला? हवामान विभागाचा मोठा खुलासा
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र
- जुलैमध्ये पावसाची दडी! महाराष्ट्रात पाऊस का गायब झाला आणि उकाडा का वाढला? हवामान विभागाचा मोठा खुलासा
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

























Subscribe to my channel




