पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कॉलम निसर्ग व माणूस यांच्यात‎ भावनिक नाते दृढ व्हावे‎

झाडांनाही काही सांगायचे असते. हे निसर्गाच्या समर्थनार्थ बोललेले‎ केवळ आदर्श वाक्य नाही, तर त्यामागे वैज्ञानिक सत्य आहे. 20 ते 100 ‎किलोहर्ट्झ या वारंवार ते वर झाडे व वनस्पती ध्वनी निर्माण करतात.‎ इतर झाडे व काही प्राणी हे ध्वनी ऐकूही शकतात. यासंदर्भात वैज्ञानिक‎ प्रयोगही झाले. शांत वातावरणात झाडे जणू काही गुणगुणत असतात.‎त्यांची फुले तोडली म्हणून ती दुखावतात, असे नाही. मात्र हळूहळू ‎माणसाने वनस्पतींचा आवाज समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. ते‎ शक्यही होऊ शकते. निसर्ग व माणूस यांच्यातील भावनिक नाते‎अधिक दृढ व्हावे . अन्यथा माणसा माणसांतील भावनिक नातेसंबंधही ‎कमकुवत होतील. पूर्वी जघन्य गुन्ह्यांची नोंद प्रामुख्याने पुरुषांच्या ‎नावावर होत असे. आता काही महिला व तरुणीही मर्यादा ओलांडताना ‎दिसतात. गुन्हा घडला तर कायदा आपले काम करतो. मात्र यामुळे एक‎मोठे नुकसान झाले आहे. कुटुंबांतील परस्पर विश्वास,नातेसंबंधांवर‎ संशयाची छाया निर्माण झाली.आपण निसर्गापासून दूर जाऊ, तितके ‎अधिक हिंसक, आक्रमक व नकारात्मक होत जाऊ.‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *