नंदितेश निलय यांचा कॉलम:आता बोलायचे असेल तर फोन उचलू नका, तो एका बाजूला ठेवा‎

‎‎‎‎‎‎‎‎तुम्हालाही असं वाटतं का की, अनेकदा तुमच्याशी‎बोलताना समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा स्वतःच्या फोनकडे‎जास्त बघत असते? घरातही एखादी व्यक्ती तुमच्याशी‎बोलता बोलता मोबाइल फोनमध्ये व्यग्र होऊन जाते.‎यासाठी एक नवा शब्द शोधून काढला आहे- ‘फबिंग’. हा‎शब्द फोन आणि स्नबिंग (दुर्लक्ष करणे) यातून तयार झाला‎आहे. सामाजिक नाती व संवादावर याचा खूप खोल‎परिणाम होत आहे.‎ शरीराने हजर असूनही भावनिकदृष्ट्या दूर राहण्याची ही‎प्रवृत्ती काय सांगते? स्क्रीनवर फिरणारी बोटे आणि‎स्क्रीनमध्ये बुडालेले डोळे यावर विश्वासच ठेवू शकत‎नाहीत की, त्यांच्या जवळ दुसरं कोणीतरी बसलं आहे. ते‎त्यांच्याशी बोलत आहेत व त्यांना त्यांच्यावर लक्ष देण्याची‎गरज आहे. तुमच्यासमोरच कुणाचे तरी फोनमध्ये हरवून‎जाणे किंवा सतत फोन बघत राहणे यातून हेच दिसते की, हे‎छोटेसे यंत्र आता संवाद व भेटीगाठींवर वरचढ ठरत आहे.‎ फोन आणि एआयने मिळून आपले जीवन पूर्णपणे बदलून‎टाकले आहे. जेव्हा कोणी बोलत असेल, तेव्हा त्या व्यक्तीचे‎बोलणे लक्ष देऊन आणि आदराने ऐकणे हा एक मूलभूत‎शिष्टाचार आहे, असे आपल्याला शिकवले जाते. पण हेही‎खरे आहे की, ‘फबिंग’च्या काळात आपले हे वागणे‎कोणाला तरी दुखावू शकते, असा विचार कोणीच करत‎नाही. आणि जेव्हा ही सवय घरापासून ते संस्थांपर्यंत‎सामान्य होते, तेव्हा समाजात व्यक्ती आणि त्याच्या‎नात्याच्या भावनिक पैलूवर खूप मोठा आघात होतो.‎‘फबिंग’ हे वस्तूकडे नव्हे तर व्यक्तीकडे दुर्लक्ष करून‎त्याला एक ‘न्यू नॉर्मल’ सामाजिक व्यवहार बनवून टाकते.‎ प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही गोष्टी नक्कीच‎असतात. नात्यांमधील संवाद हा त्या गोष्टींचाच एक भाग‎असतो. आपली गोष्ट सांगताना एखादी व्यक्ती त्यात पूर्णपणे‎हरवून जाते. तेव्हा समोरच्या व्यक्तीनेही आपल्या भावना व‎शब्दांना तितकेच महत्त्व द्यावे, अशी तिची इच्छा असते.‎तुम्हीही घरात अनुभवले असेल की, मुले अनेकदा‎आई-वडिलांचे बोलणे ऐकत असताना आपले बहुतांश‎लक्ष फोनवरील अशा कामात देतात, जे सहसा पूर्णपणे‎अनावश्यक असते, तर मग ‘फबिंग’ आपल्या भावनिक‎गोष्टींनाही निर्जीव बनवून टाकेल का? कदाचित हो.‎नुकताच एक अभ्यास झाला. त्यात वाचकांना सहा लघुकथा‎दिल्या गेल्या. त्यातील तीन कथा माणसांनी लिहिल्या होत्या‎आणि तीन चॅटजीपीटीने बनवल्या होत्या. एआयच्या‎माध्यमातून लिहिलेल्या कथांचा विषयही माणसांच्या‎कथांसारखाच होता, पण जेव्हा वाचकांना त्या कथांच्या‎रंजकतेच्या आधारावर रेटिंग द्यायला सांगितले, तेव्हा‎एआयने बनवलेल्या कथांना जास्त रेटिंग मिळाले. हा कल‎हेच सांगतो की, सामाजिक संवादात ‘फबिंग’ आल्यामुळे‎नाती आणि त्यांच्या कथांचा भावनिक पैलू कमकुवत झाला‎आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, आपल्या पूर्वजांनी मान‎सरळ ठेवूनच संस्कृतीच्या विकासाची कथा पूर्ण केली‎होती, पण आपले दोन मोकळे हात आता पुन्हा बांधले गेले‎आहेत आणि सरळ असलेली मान फोनकडे पाहताना पुन्हा‎खाली झुकली आहे.‎ या चक्रात अडकून सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत गुलाम‎बनलेल्या स्वतःला आणि इतरांनाही मुक्त करण्याचा प्रयत्न‎करा. कोणी फोनमध्ये व्यग्र होऊन तुमच्याकडे दुर्लक्ष करत‎असेल, तरीही त्यांच्याबद्दल कोणतीही ‘फबिंग’ची भावना‎मनात ठेवू नका. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहा.‎तरच घर, संस्थांमध्ये फोनच्या विळख्यातून मुक्त झालेले‎डोळे, कान आणि मन माणुसकीला ‘फबिंग’च्या ग्रहणातून‎वाचवतील. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *