महाविकास आघाडीची पत्रकार परिषद Image Credit source: टीव्ही 9 मराठी
शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांची अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद पार पडली, विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार घालण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सगळं काही गमती जमतीमध्येच चाललं आहे. जसं इथे उपस्थित असलेल्या सर्वांनी सांगितलं, ग्रामीण भाग असो अथवा शहरी भाग तुम्ही मला एक तरी असा जिल्हा दाखवा, जो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम आहे. आज आपण पाहिलं तर शेतकरी आत्महत्येचा विषय आहे, गेल्या चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, त्याबदल्यात शेतकऱ्यांना एक तरी रुपया भेटला आहे का? पण सगळं काही रेटून न्यायचं विधानसभेत खोटी आश्वासनं द्यायची, असा हल्लाबोल यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये मेट्रो मार्गिकेचं काम सुरू असताना पॅरापेट भिंतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती, यावरून देखील आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हे सगळं एका बाजूला सुरु असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल, दोन ते तीन दिवसांपूर्वीचीच घटना आहे, मुलुंडमध्ये मेट्रोचं काम सुरू असताना पॅरापेट भिंतीचा काही भाग कोसळला, त्याच्याखाली एक रिक्षा चिरडली गेली, एका गाडीचा चुराडा झाला. या दुर्घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. किंमत काय लावली त्याला? तर पाच लाख, म्हणजे आता ही आपल्या जीवाची किंमत झाली आहे. मला वाटतं हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. जे स्वत:ला इफ्रामॅन इफ्रामॅन म्हणतात त्यांच्यामध्ये देखील भांडणं सुरू आहेत, इफ्रामॅन मी की तू मी की तू? दोन वर्षात आम्ही की आता दोन वर्षात तुम्ही? अशी ही भांडणं सुरू आहेत. मला एक तरी उदाहरण दाखवा की यांनी जी पायाभूत सुविधांची कामं केली आहेत, ते त्यांनी एक तरी नीट केलं आहे. कोस्टल रोडवर चला, तिथे त्यांनी म्युझिकल रोड केला त्याला विरोध नाहीच चांगलंच आहे. कोणाला अजून काही गंमत जमंत करायची असेल तर काही हरकत नाही, परंतु त्यावर खरोखर साडेसात कोटी खर्च करण्यासारखं काही केलं आहे का? असा सवालही यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीवर देखील चांगलाच हल्लाबोल केला आहे. एमएमआरडीने एक जबरदस्त पूल तयार केला आहे, बॅटच्या आकाराचा, खरं तर ते जगातील 8 वं आश्चर्य वाटावं असा तो पूल आहे. आता असा पूल कोणी जर करत असेल तर तेवढा खर्च करण्याची त्याच्यावर गरज आहे का? त्याची पुढे काही चौकशी झाली आहे का? आणि हे सर्व होत असताना चालू कामामध्ये तुम्ही पाहात आहात दिल्लीमध्ये कोणी तरी उघड्या गटारात जाऊन पडलं, आणखी एका ठिकाणी कोणी तरी कशात जाऊन पडलं. इथे मुलुंडमध्ये वरतून काही तरी पडतंय. मग आयुष्य जगायचं तरी कसं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, पीक विम्याची तुम्हाला मदत मिळत नाही. शहरात नोकऱ्या मिळत नाहीत. बर जे नोकऱ्या शोधतायेत त्यांच्यावर इफ्रास्टक्चर मॅनच वजन पडतं आणि ते खाली चिरडले जात आहेत, राज्यात नेमकं चाललंय तरी काय? हे सर्व या ठिकाणी सुरू आहे, ते म्हणतात गतीमान सरकार पण हे सरकार नो एन्ट्रीमध्ये गतीमान होत आहे, त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



