तुम्ही तुमच्या लेनमध्ये वाहन चालवत आहात. सुरक्षितअंतर राखले आहे आणि वाहनही निर्धारित वेगात आहे.इतक्यात अचानक दुसरे एखादे वाहन कोणतीहीपूर्वसूचना न देता समोरून कट मारते. एखादादुचाकीस्वार चुकीच्या दिशेने येतो. एखादी कारमहामार्गावरील बाहेर पडण्याचा मार्ग चुकल्यानंतर तिथेचरिव्हर्स घेऊ लागते. एखादा ट्रक वेगवान वाहनांसाठीअसलेली लेन अडवून ठेवतो. इंडिकेटर केवळदिखाव्यासाठी वापरले जातात. समोरून येणाऱ्यावाहनांवर हाय-बीमचा प्रकाश टाकून त्यांना अक्षरशःदिपवले जाते. वाहन चालवताना मोबाईलचा वापरकेल्याने चालकाचे लक्ष रस्त्यावरून विचलित होते. ही दृश्ये इतकी सामान्य झाली आहेत की आता त्यांचेआश्चर्यही वाटत नाही. अनेक बाबतीत ती भारतातीलदैनंदिन वाहनचालक संस्कृतीचाच भाग बनली आहेत.एखादा गंभीर अपघात झाला की सार्वजनिक चर्चेचाकेंद्रबिंदू बहुतेक वेळा रस्त्यांभोवतीच फिरत असतो.रस्त्यावर खड्डा होता का? महामार्गाच्या रचनेत दोष होताका? सुरक्षेसाठी आवश्यक कठडे नव्हते का? हे प्रश्नमहत्त्वाचे आहेत. फलोदी अपघात प्रकरणात सर्वोच्चन्यायालयाने नुकतेच अशा अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधतमहामार्गांची सुरक्षा सुधारण्याचे निर्देश दिले. महामार्गव्यवस्थापन, अतिक्रमण, आपत्कालीन प्रतिसादव्यवस्था,अपघात प्रतिबंधक उपाय अशा अनेक बाबींवरन्यायालयाने विचार केला. हा हस्तक्षेप आवश्यकच होता.कारण चांगले रस्ते, सुरक्षित महामार्ग आणि जलदआपत्कालीन सेवा अनेकांचे प्राण वाचवू शकतात. मात्र,या निर्णयामुळे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो—आपण वाहनचालकांकडेही तेवढेच लक्ष देत आहोतका? रस्ते सुरक्षिततेची सुरुवात महामार्गांपासून होत नाहीतर एखाद्या व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवानामिळतो तेव्हापासून होते. वाहनचालक परवाना हासरकारकडून दिला जाणारा महत्त्वाचा अधिकार आहे.कारण तो एखाद्या व्यक्तीला क्षणार्धात मोठी हानी घडवूशकणारे वाहन चालविण्याची परवानगी देतो. मात्रप्रत्यक्षात वाहनचालक परवाना मिळविण्याची प्रक्रियाकौशल्य, निर्णयक्षमता व जबाबदारी यांचे मूल्यमापनकरण्याऐवजी केवळ प्रशासकीय औपचारिकता बनलीआहे. लेन शिस्त पाळली जात नाही. चुकीच्या बाजूनेओव्हरटेक करणे सामान्य झाले आहे. हे केवळशिस्तभंगाचे प्रकार नाहीत. अनेक वाहनचालकांना हेनियम का आहेत, याचे योग्य प्रशिक्षणच मिळालेले नसते.वाहन सुरू करणे, गिअर बदलणे, रिव्हर्स घेणे किंवापार्किंग करणे ही यांत्रिक कौशल्ये आहेत. मात्र सुरक्षितवाहनचालक होण्यासाठी जागरूकता, निर्णयक्षमताआणि शिस्त आवश्यक असते. संभाव्य धोके ओळखणे,सुरक्षित अंतर राखणे, लेन शिस्त पाळणे, ब्लाइंडस्पॉट्सची जाणीव ठेवणे आणि आपल्या प्रत्येकनिर्णयाचा इतरांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो, याचीजाणीव असणे महत्त्वाचे आहे. भारतात 2024 मध्ये 4.68 लाख रस्ता अपघात झाले.त्यात 1.75 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पैकी61 टक्क्यांहून अधिक अपघात अतिवेगामुळे झाले तर 26टक्के अपघात धोकादायक किंवा निष्काळजीवाहनचालक आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेककेल्यामुळे घडले. बहुतांश अपघातांना ही दोन कारणेचजबाबदार आहेत. अनेक वर्षे आपण रस्ते कसे असावेत,यावर चर्चा केली. आता वाहनचालक परवाना हा खऱ्याअर्थाने पात्रतेचा पुरावा ठरेल. याची खात्री करण्याची वेळआली आहे. वाहनचालक प्रशिक्षण व्यवस्थाही सक्षमहवी. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




