पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:प्रत्येक काम गांभीर्य, चिकाटी,‎ प्रामाणिकपणे करायला हवे‎

सबबी देण्याची सवय लागली की त्या टिकवण्यासाठी खोटे बोलावे‎लागते. त्यामुळे सबबी सांगण्याची सवय टाळा. कोणतेही काम गांभीर्य,‎चिकाटीने व प्रामाणिकपणे करा. सबब ही एक प्रकारची अप्रामाणिकता‎आहे. ती सवय झाली तर पुढे ती चुकीच्या वर्तनाचे रूप घेऊ शकते.‎तुम्ही पुरेसे काम करत नसाल, तर त्यासाठी सबबी शोधाव्याच‎लागतील. याउलट कमी काम केल्यास इतरांना सबबी द्याव्या लागतात‎तर अति काम केल्यास आपण स्वतःलाच सबबी सांगत असतो.मोठे‎ध्येय गाठण्यासाठी सतत व अतिप्रमाणात काम करण्यास ‘हसल‎कल्चर’ म्हटले जाते. यात आपण पाच गोष्टी धोक्यात घालतो—‎आरोग्य, झोप, विश्रांती, सामाजिक संबंध व कौटुंबिक नाती. अनेक‎जण सलग 10 ते 12 तास काम करतात व जास्त कष्ट घेतल्याशिवाय‎यश मिळत नाही, असे मानतात. मात्र, तुम्ही 10 तास काम करत‎असाल, तर त्यातील 8 तास परिणाम मिळवण्यासाठी द्या आणि उर्वरित‎ 2 तास त्या 8 तासांच्या कामाला ऊर्जा देण्यासाठी वापरा. त्यात‎वैयक्तिक आवड, योगाभ्यास किंवा कुटुंबासोबत घालवलेला वेळ‎असू शकतो.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *