तुम्ही तुमच्या लेनमध्ये वाहन चालवत आहात. सुरक्षितअंतर राखले आहे आणि वाहनही निर्धारित वेगात आहे.इतक्यात अचानक दुसरे एखादे वाहन कोणतीहीपूर्वसूचना न देता समोरून कट मारते. एखादादुचाकीस्वार चुकीच्या दिशेने येतो. एखादी कारमहामार्गावरील बाहेर पडण्याचा मार्ग चुकल्यानंतर तिथेचरिव्हर्स घेऊ लागते. एखादा ट्रक वेगवान वाहनांसाठीअसलेली लेन अडवून ठेवतो. इंडिकेटर केवळदिखाव्यासाठी वापरले जातात. समोरून येणाऱ्यावाहनांवर हाय-बीमचा प्रकाश टाकून त्यांना अक्षरशःदिपवले जाते. वाहन चालवताना मोबाईलचा वापरकेल्याने चालकाचे लक्ष रस्त्यावरून विचलित होते. ही दृश्ये इतकी सामान्य झाली आहेत की आता त्यांचेआश्चर्यही वाटत नाही. अनेक बाबतीत ती भारतातीलदैनंदिन वाहनचालक संस्कृतीचाच भाग बनली आहेत.एखादा गंभीर अपघात झाला की सार्वजनिक चर्चेचाकेंद्रबिंदू बहुतेक वेळा रस्त्यांभोवतीच फिरत असतो.रस्त्यावर खड्डा होता का? महामार्गाच्या रचनेत दोष होताका? सुरक्षेसाठी आवश्यक कठडे नव्हते का? हे प्रश्नमहत्त्वाचे आहेत. फलोदी अपघात प्रकरणात सर्वोच्चन्यायालयाने नुकतेच अशा अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधतमहामार्गांची सुरक्षा सुधारण्याचे निर्देश दिले. महामार्गव्यवस्थापन, अतिक्रमण, आपत्कालीन प्रतिसादव्यवस्था,अपघात प्रतिबंधक उपाय अशा अनेक बाबींवरन्यायालयाने विचार केला. हा हस्तक्षेप आवश्यकच होता.कारण चांगले रस्ते, सुरक्षित महामार्ग आणि जलदआपत्कालीन सेवा अनेकांचे प्राण वाचवू शकतात. मात्र,या निर्णयामुळे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो—आपण वाहनचालकांकडेही तेवढेच लक्ष देत आहोतका? रस्ते सुरक्षिततेची सुरुवात महामार्गांपासून होत नाहीतर एखाद्या व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवानामिळतो तेव्हापासून होते. वाहनचालक परवाना हासरकारकडून दिला जाणारा महत्त्वाचा अधिकार आहे.कारण तो एखाद्या व्यक्तीला क्षणार्धात मोठी हानी घडवूशकणारे वाहन चालविण्याची परवानगी देतो. मात्रप्रत्यक्षात वाहनचालक परवाना मिळविण्याची प्रक्रियाकौशल्य, निर्णयक्षमता व जबाबदारी यांचे मूल्यमापनकरण्याऐवजी केवळ प्रशासकीय औपचारिकता बनलीआहे. लेन शिस्त पाळली जात नाही. चुकीच्या बाजूनेओव्हरटेक करणे सामान्य झाले आहे. हे केवळशिस्तभंगाचे प्रकार नाहीत. अनेक वाहनचालकांना हेनियम का आहेत, याचे योग्य प्रशिक्षणच मिळालेले नसते.वाहन सुरू करणे, गिअर बदलणे, रिव्हर्स घेणे किंवापार्किंग करणे ही यांत्रिक कौशल्ये आहेत. मात्र सुरक्षितवाहनचालक होण्यासाठी जागरूकता, निर्णयक्षमताआणि शिस्त आवश्यक असते. संभाव्य धोके ओळखणे,सुरक्षित अंतर राखणे, लेन शिस्त पाळणे, ब्लाइंडस्पॉट्सची जाणीव ठेवणे आणि आपल्या प्रत्येकनिर्णयाचा इतरांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो, याचीजाणीव असणे महत्त्वाचे आहे. भारतात 2024 मध्ये 4.68 लाख रस्ता अपघात झाले.त्यात 1.75 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पैकी61 टक्क्यांहून अधिक अपघात अतिवेगामुळे झाले तर 26टक्के अपघात धोकादायक किंवा निष्काळजीवाहनचालक आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेककेल्यामुळे घडले. बहुतांश अपघातांना ही दोन कारणेचजबाबदार आहेत. अनेक वर्षे आपण रस्ते कसे असावेत,यावर चर्चा केली. आता वाहनचालक परवाना हा खऱ्याअर्थाने पात्रतेचा पुरावा ठरेल. याची खात्री करण्याची वेळआली आहे. वाहनचालक प्रशिक्षण व्यवस्थाही सक्षमहवी. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



