तुम्ही तुमच्या लेनमध्ये वाहन चालवत आहात. सुरक्षितअंतर राखले आहे आणि वाहनही निर्धारित वेगात आहे.इतक्यात अचानक दुसरे एखादे वाहन कोणतीहीपूर्वसूचना न देता समोरून कट मारते. एखादादुचाकीस्वार चुकीच्या दिशेने येतो. एखादी कारमहामार्गावरील बाहेर पडण्याचा मार्ग चुकल्यानंतर तिथेचरिव्हर्स घेऊ लागते. एखादा ट्रक वेगवान वाहनांसाठीअसलेली लेन अडवून ठेवतो. इंडिकेटर केवळदिखाव्यासाठी वापरले जातात. समोरून येणाऱ्यावाहनांवर हाय-बीमचा प्रकाश टाकून त्यांना अक्षरशःदिपवले जाते. वाहन चालवताना मोबाईलचा वापरकेल्याने चालकाचे लक्ष रस्त्यावरून विचलित होते. ही दृश्ये इतकी सामान्य झाली आहेत की आता त्यांचेआश्चर्यही वाटत नाही. अनेक बाबतीत ती भारतातीलदैनंदिन वाहनचालक संस्कृतीचाच भाग बनली आहेत.एखादा गंभीर अपघात झाला की सार्वजनिक चर्चेचाकेंद्रबिंदू बहुतेक वेळा रस्त्यांभोवतीच फिरत असतो.रस्त्यावर खड्डा होता का? महामार्गाच्या रचनेत दोष होताका? सुरक्षेसाठी आवश्यक कठडे नव्हते का? हे प्रश्नमहत्त्वाचे आहेत. फलोदी अपघात प्रकरणात सर्वोच्चन्यायालयाने नुकतेच अशा अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधतमहामार्गांची सुरक्षा सुधारण्याचे निर्देश दिले. महामार्गव्यवस्थापन, अतिक्रमण, आपत्कालीन प्रतिसादव्यवस्था,अपघात प्रतिबंधक उपाय अशा अनेक बाबींवरन्यायालयाने विचार केला. हा हस्तक्षेप आवश्यकच होता.कारण चांगले रस्ते, सुरक्षित महामार्ग आणि जलदआपत्कालीन सेवा अनेकांचे प्राण वाचवू शकतात. मात्र,या निर्णयामुळे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो—आपण वाहनचालकांकडेही तेवढेच लक्ष देत आहोतका? रस्ते सुरक्षिततेची सुरुवात महामार्गांपासून होत नाहीतर एखाद्या व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवानामिळतो तेव्हापासून होते. वाहनचालक परवाना हासरकारकडून दिला जाणारा महत्त्वाचा अधिकार आहे.कारण तो एखाद्या व्यक्तीला क्षणार्धात मोठी हानी घडवूशकणारे वाहन चालविण्याची परवानगी देतो. मात्रप्रत्यक्षात वाहनचालक परवाना मिळविण्याची प्रक्रियाकौशल्य, निर्णयक्षमता व जबाबदारी यांचे मूल्यमापनकरण्याऐवजी केवळ प्रशासकीय औपचारिकता बनलीआहे. लेन शिस्त पाळली जात नाही. चुकीच्या बाजूनेओव्हरटेक करणे सामान्य झाले आहे. हे केवळशिस्तभंगाचे प्रकार नाहीत. अनेक वाहनचालकांना हेनियम का आहेत, याचे योग्य प्रशिक्षणच मिळालेले नसते.वाहन सुरू करणे, गिअर बदलणे, रिव्हर्स घेणे किंवापार्किंग करणे ही यांत्रिक कौशल्ये आहेत. मात्र सुरक्षितवाहनचालक होण्यासाठी जागरूकता, निर्णयक्षमताआणि शिस्त आवश्यक असते. संभाव्य धोके ओळखणे,सुरक्षित अंतर राखणे, लेन शिस्त पाळणे, ब्लाइंडस्पॉट्सची जाणीव ठेवणे आणि आपल्या प्रत्येकनिर्णयाचा इतरांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो, याचीजाणीव असणे महत्त्वाचे आहे. भारतात 2024 मध्ये 4.68 लाख रस्ता अपघात झाले.त्यात 1.75 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पैकी61 टक्क्यांहून अधिक अपघात अतिवेगामुळे झाले तर 26टक्के अपघात धोकादायक किंवा निष्काळजीवाहनचालक आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेककेल्यामुळे घडले. बहुतांश अपघातांना ही दोन कारणेचजबाबदार आहेत. अनेक वर्षे आपण रस्ते कसे असावेत,यावर चर्चा केली. आता वाहनचालक परवाना हा खऱ्याअर्थाने पात्रतेचा पुरावा ठरेल. याची खात्री करण्याची वेळआली आहे. वाहनचालक प्रशिक्षण व्यवस्थाही सक्षमहवी. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA चा छापा; ₹८ लाखांचा माल जप्त
- रत्नागिरी: लग्नानंतरचा पहिलाच प्रवास ठरला अखेरचा; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
- महाराष्ट्र: MPSC उमेदवारांना मोठा दिलासा, यंदा ऑनलाईन परीक्षा नाही; पुढील वर्षापासूनच नवा निर्णय लागू
- पुणे: 'हॉटेलचे बिल देतो' म्हणत बोलावलं अन् लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
महाराष्ट्र
- पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA चा छापा; ₹८ लाखांचा माल जप्त
- रत्नागिरी: लग्नानंतरचा पहिलाच प्रवास ठरला अखेरचा; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
- महाराष्ट्र: MPSC उमेदवारांना मोठा दिलासा, यंदा ऑनलाईन परीक्षा नाही; पुढील वर्षापासूनच नवा निर्णय लागू
- पुणे: 'हॉटेलचे बिल देतो' म्हणत बोलावलं अन् लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
गुन्हा
- अमरावती: भरदिवसा थरार; तरुणाची चाकूने भोसकून हत्या; पाच संशयित CCTV मध्ये कैद
- गुजरात: आंघोळीचा व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंगचा बदला, गांधीनगरमध्ये पती-पत्नीने केला विद्यार्थ्याचा गेम.
- इगतपुरीच्या भावली धबधब्यावर पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; महिलांची छेड काढत ३० किलोमीटरपर्यंत केला पाठलाग!
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
राजकीय
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- झारखंड: लग्नाआधीच प्रेयसीने मेहुण्यासोबत मिळून मंगेतराची हत्या केल्याचा आरोप
- आता गॅस सिलेंडरही घरपोच इन्स्टामार्ट आणि एचपीसीएलची देशातील पहिली 'ऑन-डिमांड' एलपीजी डिलिव्हरी सेवा सुरू.
- देश: रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची नवीन बीटा वेबसाइट लाँच, आता 'तत्काळ' तिकीट बुक करणे होणार अधिक सोपे.
- मध्य प्रदेश: मृत्यूही वेगळे करू शकला नाही, मालकाच्या निधनानंतर लाडक्या 'डुग्गू' नेही सोडला प्राण; अंत्ययात्रेतच घेतला शेवटचा श्वास.

























Subscribe to my channel



