9 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

नीटची पुनर्परीक्षा पहिल्या अपयशानंतर अडचणीशिवाय पार पडली. मात्र भारतातील परीक्षा व्यवस्थेचे संकट केवळ पेपरफुटीपुरते मर्यादित नाही.त्याकडे व्यवस्थात्मक अपयश म्हणून पाहण्याची गरजआहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) 12 मे रोजीनीट-यूजी परीक्षा रद्द केली होती. त्याआधी काहीदिवसांपूर्वीच 22.7 लाख उमेदवारांनी ती परीक्षा दिलीहोती. दोन वर्षांत अशी घटना दुसऱ्यांदा घडली. काहीवेळा परीक्षा रद्द करणे अपरिहार्य असते. पण त्याचाफटका नियम पाळणाऱ्या विद्यार्थ्यांनाच बसतो.
आजही भारत जगातील सर्वात मोठ्या आणिमहत्त्वाच्या परीक्षा अशा व्यवस्थेद्वारे घेण्याचा प्रयत्नकरत आहे. ती सध्याचे प्रमाण, गुंतागुंत व आव्हानांनुसार अद्ययावत झालेली नाही. ही समस्या केवळ तात्पुरत्या देखरेखीच्या उपायांनी सुटणारी नाही. भारतामध्येएवढ्या परीक्षा घेतल्या जातात, त्याबाबतीत जगातदुसरे उदाहरण नाही. 2018 ते 2023 या काळात एनटीएने 244 परीक्षा घेतल्या. या कालावधीत उमेदवारांचीसंख्या सुमारे 67 लाखांवरून 1.22 कोटींवर पोहोचली. केवळ नीट परीक्षेतच एका वेळी 22 ते 24 लाखविद्यार्थी सहभागी होतात. 2024 मध्ये चीनच्यागाओकाओ परीक्षेसाठी 1.34 कोटी नोंदणीकृतउमेदवार होते, तर दक्षिण कोरियाच्या सीएसएटीपरीक्षेसाठी 2026 मध्ये सुमारे 5.54 लाख अर्जदार होते.भारतातील नीट परीक्षा गाओकाओपेक्षा लहान असली,तरी कोरियाच्या एकमेव राष्ट्रीय परीक्षेपेक्षा खूप मोठीआहे. शिवाय चीन किंवा कोरियाप्रमाणे भारतात दरवर्षीफक्त एकच केंद्रीय परीक्षा घेतली जात नाही. आपलीपरीक्षा व्यवस्था सातत्याने चालणारी, संघराज्यीय,बहुभाषिक आणि व्यापक स्वरूपाची आहे.
म्हणूनच चीन किंवा कोरियाचे मॉडेल भारतात तंतोतंतलागू होऊ शकत नाही. तेथे संपूर्ण सरकारी यंत्रणा एकानिर्णायक परीक्षेभोवती उभी राहू शकते; भारतात मात्रवर्षातून अनेकदा संपूर्ण व्यवस्था परीक्षा सुरक्षेसाठीवळवणे शक्य नाही. भारतीय परिस्थितीनुसार मजबूत,विभागीय पातळीवर कार्यक्षम, तंत्रज्ञानाधारित आणिमानकांमध्ये केंद्रीकृत अशी नवी प्रणाली आवश्यकआहे. 2024 मधील वादांनंतर डॉ. के. राधाकृष्णनयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या उच्चस्तरीयसमितीने हाच मुद्दा अधोरेखित केला. एनटीएमार्फतपरीक्षा अधिक पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्षपणेघेण्यासाठी व्यापक सुधारणांचा आराखडा समितीनेसुचवला. संदेश स्पष्ट होता—देशाला परीक्षांसाठीनव्या व्यवस्थेची गरज आहे. पहिली सुधारणासंस्थात्मक पातळीवर व्हायला हवी. तंत्रज्ञान कमकुवतसंस्थेची भरपाई करू शकत नाही; ते जास्तीत जास्ततिच्या उणिवांना डिजिटल स्वरूप देऊ शकते.एनटीएला सायकोमेट्रिक्स, सायबर सुरक्षा,लॉजिस्टिक्स, डेटा विश्लेषण, प्रश्नपत्रिका निर्मिती,विक्रेता व्यवस्थापन आणि कायदा अंमलबजावणीयांसारख्या क्षेत्रांत मजबूत अंतर्गत क्षमता असलेलीकायमस्वरूपी, व्यावसायिक आणि ध्येयाधारितमूल्यांकन संस्था बनवणे आवश्यक आहे. खासगीपुरवठादार, तात्पुरते निरीक्षक आणि बाह्य यंत्रणांवरमोठ्या प्रमाणात अवलंबून असलेली मर्यादित क्षमताअसलेली संस्था देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षांचाभार पेलू शकत नाही. दुसरी सुधारणा प्रश्नपत्रिका तयारकरण्याच्या प्रक्रियेत व्हायला हवी. कोणत्याही व्यक्तीनेपूर्णपणे पाहिलेली नसते. तीच सर्वात सुरक्षितप्रश्नपत्रिका असते. याच कारणामुळे यूपीएससी आणिजेईई अॅडव्हान्स्ड परीक्षांमध्ये मोठी व गोपनीय तज्ज्ञमंडळे, टप्प्याटप्प्याने विभागलेली प्रक्रिया, अनेकसमांतर प्रश्नसंच, खासगी मध्यस्थांना अत्यल्प प्रवेशयांसारख्या उपाययोजना प्रभावी ठरतात. त्यामुळे एखादीकडी तुटली तरी संपूर्ण परीक्षा धोक्यात येत नाही. तिसरीसुधारणा तांत्रिक असावी.राधाकृष्णन समितीनेसुचविल्याप्रमाणे 1 हजार केंद्रीय विद्यालये व इतरविश्वासार्ह सार्वजनिक संस्थांना सुरक्षित परीक्षा केंद्रेम्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव अमलात आणलापाहिजे. ओळख पडताळणी आणि देखरेख यंत्रणाहीअधिक मजबूत करावी लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचावापर न्यायवैज्ञानिक तपासासाठीही केला जाऊ शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)

एखाद्या विद्यार्थ्याचे भविष्य एकासकाळी होणाऱ्या एका परीक्षेवरअवलंबून असू शकत नाही. बहुपदरीपरीक्षा, अधिक संधी, प्रमाणित गुणांकनव पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्थाआवश्यक आहे. एका प्रश्नपत्रिकेचेकाळ्या बाजारातील मूल्य कमी करूनसंपूर्ण परीक्षा व्यवस्था अधिक सक्षमबनवू शकतो.

शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



