पुण्यात तापमानाचा पारा वाढला आहे. यंदा विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाकडून पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहेत. तसेच यंदाची उष्णतेची लाट तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
पुणे : पुणे शहरात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल सुरू आहेत. विशेषतः लोहगाव परिसरात तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून मागील तीन दिवसांपासून सातत्याने उष्णतेची तीव्रता कायम आहे.
लोहगाव येथे यंदाच्या एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः ओस पडत असून कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडताना दोनदा विचार करत आहेत. सकाळी 10 नंतरच सूर्याचा चटका वाढू लागतो आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत परिस्थिती अधिक गंभीर होते.
हवामान विभागाने स्पष्ट सूचना दिली आहे की, या कालावधीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. जर अत्यावश्यक कारण असेल तर छत्री, टोपी, गॉगल्स आणि पुरेसे पाणी सोबत ठेवावे. उष्माघाताचा धोका वाढल्याने लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गेल्या 30 वर्षांच्या नोंदींमध्ये एप्रिल महिन्यात पुण्याचे तापमान 42 अंशांपेक्षा जास्त फक्त पाच वेळा गेले आहे. त्यामुळे यंदाची उष्णतेची लाट ही तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर मानली जात आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, 18 एप्रिलपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत पुण्यातील तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, 18 ते 19 एप्रिलनंतर राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.
सध्या पुणेकरांनी जास्तीत जास्त पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि दुपारच्या वेळेत घरातच राहणे हेच सुरक्षित ठरेल. उष्णतेची ही लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
दरम्यान, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. या काळात नागरिकांना आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
तसेच चार दिवसांनी म्हणजे 19 एप्रिलपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे 19 एप्रिलला तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




